शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अयोध्या प्रकरण: दोन आठवड्यात प्रगती अहवाल द्या; सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थी समितीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 11:24 IST

अयोध्या जमीन वाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

नवी दिल्ली: अयोध्या जमीन वाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थी समितीला दोन आठवड्यांत प्रगती अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. २५ जुलैपर्यंत प्रगती अहवाल द्या, अशी सूचना न्यायालयाकडून करण्यात आली आहे. अयोध्या जमीन वाद प्रकरणात मध्यस्थी समितीचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्यानं न्यायालयानं जलद सुनावणी घ्यावी, अशी मागणी हिंदू पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी याचिकेच्या माध्यमातून केली होती. त्यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या मध्यस्थांच्या समितीच्या कामात विशेष प्रगती नसल्याचा आक्षेप सिंह यांनी घेतला होता. त्यांच्या वतीनं वरिष्ठ वकील के. परासरन यांनी बाजू मांडली. मध्यस्थांच्या कामात कोणतीही प्रगती नसल्यानं न्यायालयानं या प्रकरणी सुनावणीची तारीख द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मुस्लिम पक्षकारांच्या वतीनं डॉ. राजीव धवन यांनी प्रतिवाद केला. मध्यस्थांच्या समितीवर टीका करायची ही वेळ नाही, असं धवन म्हणाले. दोन्ही पक्षकारांनी बाजू मांडल्यावर न्यायालयानं आपली भूमिका स्पष्ट केली. 'या प्रकरणी आपण मध्यस्थांच्या समितीची स्थापना केलेली आहे. त्यांच्या अहवालाची वाट पाहावी लागेल. आधी त्यांना त्यांचा अहवाल सादर करू दे,' असं न्यायालयानं म्हटलं. मध्यस्थी समितीनं २५ जुलैला अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयानं दिले. त्याआधी न्यायालयानं या समितीला १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. माजी न्यायमूर्ती एफ. एम. कलीफुल्ला या समितीचे अध्यक्ष असून आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर आणि वरिष्ठ अधिवक्ते श्रीराम पंचू सदस्य आहेत. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय