शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अयोध्या भूसंपादन कायद्यास सुप्रीम कोर्टात नव्याने आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 06:31 IST

अयोध्येतील बाबरी मशीद-राम जन्मभूमीची वादग्रस्त जागा सोडून त्या भोवतालची ६३ एकर जमीन संपादित करण्यासाठी केंद्र सरकारने २५ वर्षांपूर्वी केलेल्या कायद्यास सर्वोच्च न्यायालयात नव्याने आव्हान देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - अयोध्येतील बाबरी मशीद-राम जन्मभूमीची वादग्रस्त जागा सोडून त्या भोवतालची ६३ एकर जमीन संपादित करण्यासाठी केंद्र सरकारने २५ वर्षांपूर्वी केलेल्या कायद्यास सर्वोच्च न्यायालयात नव्याने आव्हान देण्यात आले आहे. हीच जमीन रामजन्मभूमी न्यासासह अन्य मूळ मालकांना परत करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या अजार्नंतर लगेचच ही नवी याचिका दाखल झाली आहे.केंद्र सरकारने १९९३ मध्ये हा भूसंपादन कायदा केला, तेव्हा डॉ. इस्माईल फारुकी या मुस्लिम पक्षकाराने त्यास आव्हान दिले होते. ती याचिका १९९४ मध्ये फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने भूसंपादन वैध ठरविले होते. नंतर न्यायालयाने वादग्रस्त जागेसह या अतिरिक्त संपादित जमिनीवरही ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला व तो अद्याप लागू आहे. आताची आव्हान याचिका लखनऊमधील सात हिंदूंनी केली आहे. या संपादित जागेत हिंदूंची अनेक मंदिरे, आश्रम व धर्मशाळा आहेत. या ठिकाणी पूजा-अर्चा करून नंतर जन्मभूमी स्थळावर जाऊन रामलल्लांचे दर्शन घेण्याची हिंदूंची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. परंतु ही जमीन सरकारने संपादित करून तेथे काहीही करण्यास मज्जाव असल्याने हिंदूंच्या स्वधर्म पालनाच्या हक्कावर गदा येत आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. अंकुर एस. कुसकर्णी यांनी केले आहे.या जमिनीवरील धार्मिक स्थळे पुरातत्व वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली नसल्याने ही जमीन संपादित करण्याचा केंद्राला अधिकार नाही, हा महत्वाचा मुद्दा या याचिकेत मांडण्यात आला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्या