शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद कोर्टाला 10 दिवसांत नवा पर्यवेक्षक नियुक्त करण्याचे दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 17:45 IST

अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांना दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाला निरीक्षक बनवण्याचे निर्देश दिले आहेत. 10 दिवसांच्या आत नव्या पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सद्यस्थितीतील पर्यवेक्षक हे सेवानिवृत्तीमुळे पुढे कार्यरत राहू शकत नाहीयेत.

नवी दिल्ली, दि. 11 - अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांना दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाला निरीक्षक बनवण्याचे निर्देश दिले आहेत. 10 दिवसांच्या आत नव्या पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सद्यस्थितीतील पर्यवेक्षक हे सेवानिवृत्तीमुळे पुढे कार्यरत राहू शकत नाहीयेत.अयोध्या प्रकरणात सर्व पक्षकारांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात एक विशेष परवानगी याचिका दाखल करण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणात उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला होता. त्यानंतर सर्व पक्षकारांनी एकत्र येत सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी याचिका(SLP) दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयात जवळपास 6 वर्षांपासून प्रलंबित होती. या प्रकरणात गेल्या वर्षी 26 फेब्रुवारीला सुब्रमण्यम स्वामी यांना पक्षकार बनवण्यात आलं होतं. स्वामी यांनी राम मंदिर निर्माणासाठी याचिका दाखल केली होती. इस्लामिक देशात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असलेली मशीद हटवण्याची तरतूद आहे. तसेच ती मशीद दुस-या ठिकाणीही पुन्हा बनवता येऊ शकते, असा युक्तिवादही त्यावेळी स्वामी यांनी केला होता काय आहे प्रकरण ?राम मंदिरासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर 6 डिसेंबर 1992 या दिवशी अयोध्येत मशीद पाडण्यात आली. या प्रकरणी फौजदारी खटल्यासह दिवाणी खटलाही चालला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयानं 30 डिसेंबर 2010ला मालकीप्रकरणी निर्णय दिला होता. वादग्रस्त जमिनीचे वाटप समान तीन भागांत करावे, असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला होता. रामलल्लाची मूर्ती असलेलं ठिकाण रामलल्लासाठी द्यावे. तसेच सीता रसोई व राम चबुतरा निर्मोही आखाड्याला देण्यात यावेत आणि उर्वरित एक तृतीयांश जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला दिली जावी, असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.या प्रकरणी रामलल्ला विराजमान आणि हिंदू महासभेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे सुन्नी वक्फ बोर्डाने देखील उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयानं 9 मे 2011ला या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती दिली. यात सर्वोच्च न्यायालयानं 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. तेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.