शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अयोध्या खटला : तिसऱ्या न्यायमूर्तींनाही लाभाचे पद, बनले राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:56 IST

सुरेश भुसारी लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २०१९ मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा निर्णय देणाऱ्या ...

सुरेश भुसारीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०१९ मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा निर्णय देणाऱ्या पाच न्यायाधीशांपैकी तिघांना केंद्र सरकारने आतापर्यंत लाभाच्या पदावर नियुक्त केले आहे. या पाच सदस्यीय खंडपीठात असलेले अब्दुल नझीर गेल्या महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात त्यांना राज्यपालपद बहाल करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील  रामजन्मभूमी न्यासाच्या खटल्याचा निकाल ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये लागला. यात केंद्र सरकारने तयार केलेल्या ट्रस्टला २.७७ एकर  जागा देण्याचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला. या खंडपीठात न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. अब्दुल नझीर यांचा समावेश होता. हा निर्णय दिल्यानंतर रंजन गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर चार महिन्यांनी १६ मार्च २०२० मध्ये त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केली.

अशोक भूषण व अब्दुल नझीर यांची नियुक्ती...या खंडपीठातील न्या. अशोक भूषण गेल्या जुलै २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांचीही चार महिन्यांनंतर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. आता याच खंडपीठात समाविष्ट असलेले अब्दुल नझीर गेल्या ४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून  सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर एक महिन्यानंतरच त्यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. 

कोण होते खंडपीठातया खंडपीठात माजी सरन्यायाधीश शरद बोबडेसुद्धा होते. ते २३ एप्रिल २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु, त्यांची केंद्र सरकारने अद्याप तरी कोणत्याही उच्चपदावर नियुक्ती केलेली नाही. याच खंडपीठात डॉ. धनंजय चंद्रचूड यांचाही समावेश होता. ते सध्या देशाचे सरन्यायाधीश आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिर