शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

अयोध्या खटला : तिसऱ्या न्यायमूर्तींनाही लाभाचे पद, बनले राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:56 IST

सुरेश भुसारी लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २०१९ मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा निर्णय देणाऱ्या ...

सुरेश भुसारीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०१९ मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा निर्णय देणाऱ्या पाच न्यायाधीशांपैकी तिघांना केंद्र सरकारने आतापर्यंत लाभाच्या पदावर नियुक्त केले आहे. या पाच सदस्यीय खंडपीठात असलेले अब्दुल नझीर गेल्या महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात त्यांना राज्यपालपद बहाल करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील  रामजन्मभूमी न्यासाच्या खटल्याचा निकाल ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये लागला. यात केंद्र सरकारने तयार केलेल्या ट्रस्टला २.७७ एकर  जागा देण्याचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला. या खंडपीठात न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. अब्दुल नझीर यांचा समावेश होता. हा निर्णय दिल्यानंतर रंजन गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर चार महिन्यांनी १६ मार्च २०२० मध्ये त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केली.

अशोक भूषण व अब्दुल नझीर यांची नियुक्ती...या खंडपीठातील न्या. अशोक भूषण गेल्या जुलै २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांचीही चार महिन्यांनंतर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. आता याच खंडपीठात समाविष्ट असलेले अब्दुल नझीर गेल्या ४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून  सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर एक महिन्यानंतरच त्यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. 

कोण होते खंडपीठातया खंडपीठात माजी सरन्यायाधीश शरद बोबडेसुद्धा होते. ते २३ एप्रिल २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु, त्यांची केंद्र सरकारने अद्याप तरी कोणत्याही उच्चपदावर नियुक्ती केलेली नाही. याच खंडपीठात डॉ. धनंजय चंद्रचूड यांचाही समावेश होता. ते सध्या देशाचे सरन्यायाधीश आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिर