शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

देशभरातील सात लाख बनावट कंपन्यांना लागणार टाळं

By admin | Updated: February 28, 2017 12:18 IST

काळ्या पैशाविरोधातील आपला लढा अधिक तीव्र करत केंद्र सरकारने आता आपला मोर्चा बनावट कंपन्यांकडे वळवला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - काळ्या पैशाविरोधातील आपला लढा अधिक तीव्र करत केंद्र सरकारने आता आपला मोर्चा बनावट कंपन्यांकडे वळवला आहे. या कंपन्यांची संख्या सहा ते सात लाखापर्यंत आहे. नोटाबंदीच्या काळात या बनावट कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात बँक व्यवहार केला असून बँकेतून पैसेही काढून घेतले आहेत. 
 
देशभरात एकूण 15 लाख नोंदणीकृत कंपन्या असून यामधील 40 टक्के कंपन्या बनावट असून संशयाच्या भोव-यात आहेत. त्यामुळे या 15 लाखांमधून त्या संशयित कंपन्यांचा शोध घेणे खूप अवघड काम असणार आहे. सरकारने या प्रक्रियेत अनेक संस्थेंचा समावेश करुन घेतला असून केंद्रीय प्रत्यक्ष कर (CBDT) महत्वाची भूमिका बजावणार आहे. 
 
'नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर दोन महिन्याच्या कार्यकाळात जेव्हा चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बँकेत जमा करण्याची परवानगी देण्यात आली होती, तेव्हा या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा बँकेत जमा केला होता', अशी माहिती आयकर विभागाच्या अधिका-याने दिली आहे.
 
आयकर विभागाने या बनावट कंपन्यांच्या संपत्तीचीदेखील पुर्ण माहिती मिळवली आहे.  या कंपन्यांनी आतापर्यंत वार्षिक करपरतावा न भरल्याने त्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या बनावट कंपन्यांकडून वसुली करण्यासाठी सरकारने सर्व महत्वाच्या महसूल गुप्तचर संस्थांना सामाविष्ट करुन घेतलं असून यामध्ये सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, आरबीआय, आयबी आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं आहे.
 
या बनावट कंपन्या असून यांच्याकडून कोणताही थेट व्यवहार होत नसून आपल्या ग्राहकांचा काळा पैसा करण्यासाठी यांचा वापर केला जातो.