शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

तडकाफडकी लष्करी कारवाई टाळा - कमांडर्सचा सरकाला सल्ला

By admin | Updated: September 20, 2016 11:20 IST

१८ जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानावर लष्करी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - उरी येथील लष्करी तळावरील पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानावर लष्करी कारवाई करण्याची मागणी होत आहे. पण भारताकडून तडकाफडकी अशी कोणतीही लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता कमी आहे. 
 
सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्र्यांना अशी तात्काळ धडक कारवाई न करण्याचा सल्ला मिळाल्याची माहिती आहे. भारताकडून प्रत्युत्तर म्हणून अशा लष्करी  कारवाईची शक्यता लक्षात घेऊन नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी सैन्यही सर्तक झाले आहे.  त्यामुळे तूर्तास लष्करी कारवाईचा पर्याय टाळण्याचा सल्ला दिला आहे. 
 
आणखी वाचा 
कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज - राहील शरीफ
पाकिस्तानला धडा शिकवण्याचे भारतासमोर 'हे' सहा पर्याय
 
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी दीर्घकालीन उपायांवर भर देण्याचा भारत सरकारचा विचार आहे. सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग सहभागी झाले होते. भविष्यात भारत पाकिस्तानी लष्कराच्या पायाभूत केंद्रांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. भारतीय लष्करानेही उरी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू असे स्पष्ट केले आहे.