शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

तडकाफडकी लष्करी कारवाई टाळा - कमांडर्सचा सरकाला सल्ला

By admin | Updated: September 20, 2016 11:20 IST

१८ जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानावर लष्करी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - उरी येथील लष्करी तळावरील पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानावर लष्करी कारवाई करण्याची मागणी होत आहे. पण भारताकडून तडकाफडकी अशी कोणतीही लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता कमी आहे. 
 
सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्र्यांना अशी तात्काळ धडक कारवाई न करण्याचा सल्ला मिळाल्याची माहिती आहे. भारताकडून प्रत्युत्तर म्हणून अशा लष्करी  कारवाईची शक्यता लक्षात घेऊन नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी सैन्यही सर्तक झाले आहे.  त्यामुळे तूर्तास लष्करी कारवाईचा पर्याय टाळण्याचा सल्ला दिला आहे. 
 
आणखी वाचा 
कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज - राहील शरीफ
पाकिस्तानला धडा शिकवण्याचे भारतासमोर 'हे' सहा पर्याय
 
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी दीर्घकालीन उपायांवर भर देण्याचा भारत सरकारचा विचार आहे. सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग सहभागी झाले होते. भविष्यात भारत पाकिस्तानी लष्कराच्या पायाभूत केंद्रांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. भारतीय लष्करानेही उरी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू असे स्पष्ट केले आहे.