शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार लाख बेरोजगारांसाठी अवघे ९२३ रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:38 IST

गेल्या दीड वर्षांत अवघ्या अडीच हजार व्यक्तींनाच रोजगार

नवी दिल्ली : सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्रालयाच्या (एमएसएमइ) वतीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या संपर्क पोर्टलवर डिसेंबरअखेरीस तब्बल ४ लाख ६० हजार बेरोजगार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. मात्र, त्या पैकी अवघ्या ९२३ जणांना रोजगार संधी उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, गेल्या दीड वर्षांत अवघ्या अडीच हजार व्यक्तींनाच या पोर्टलद्वारे रोजगार उपलब्ध झाला आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जून २०१८मधे या पोर्टलची सुरुवात करण्यात आली होती. कंपन्या आणि काम शोधू इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये संपर्काचा पूल या निमित्ताने बांधला गेला होता. बेरोजगार आणि शिक्षण घेत असलेल्या १८ वर्षे वयाच्या उमेदवारांना या पोर्टलवर नोंदणी करता येते. त्यावर आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार मिळविण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, डिसेंबरअखेरीस २ हजार ५२८ व्यक्तींना या पोर्टलद्वारे रोजगार मिळाला आहे. म्हणजेच महिना सरासरी दीडशेहून कमी व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. या पोर्टलवर पाच हजारांहून अधिक कंपन्यांनी नोदणी केलेली आहे. मात्र, मोठे उद्योग अथवा संस्था, तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या त्यावर नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच तुलनेने कमी रोजगार उपलब्ध होत असल्याचे सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्रालातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.