शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कोळसा खाणींचा डिसेंबरमध्ये लिलाव

By admin | Updated: November 2, 2014 01:23 IST

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या कोळसा खाणपटय़ांचा लवकरात लवकर म्हणजे डिसेंबरमध्येही लिलाव करण्याची तयारी कोळसा मंत्रलयाने सुरू केली आहे.

नवी दिल्ली : कोळशाच्या बेभरवशाच्या पुरवठय़ामुळे जुने औष्णिक वीज प्रकल्प ठप्प होण्याने आणि नव्याने उभारले जायचे प्रकल्प रखडल्याने देशात निर्माण झालेल्या वीज टंचाईच्या भीषण संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या कोळसा खाणपटय़ांचा लवकरात लवकर म्हणजे डिसेंबरमध्येही लिलाव करण्याची तयारी कोळसा मंत्रलयाने सुरू केली आहे.
वरिष्ठ सरकारी सूत्रंनी सांगितले की, या लिलावाच्या बाबतीत मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबींविषयक समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली की, लगेच म्हणजे अगदी डिसेंबरमध्येही लिलावाचे आयोजन करण्याची कोळसा मंत्रलयाची तयारी आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ज्या 214 कोळसा खाणपट्टय़ांचे वाटप रद्द केले त्यापैकी 79 कोळसा खाणपट्टे वीज कंपन्यांना त्यांच्या उपयोगासाठी दिलेले होते. त्यामुळे या कंपन्यांनी लिलावात हे कोळसा खाणपट्टे प्राधान्याने घ्यावेत, अशी अपेक्षा आहे. ज्या वीज कंपन्यांना लिलावात कोळसा खाणपट्टे मिळणार नाहीत त्यांना कोल इंडियाच्या ताब्यातील खाणपट्टे देण्याचा विचार केला जाईल.
यामुळे 4क् हजार मे.व्ॉ. स्थापित क्षमता असलेल्या वीज प्रकल्पांना चालना मिळेल व वीजपुरवठय़ाची परिस्थिती सुधारल्यावर मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या सरकारच्या एकूणच प्रयत्नांना हातभार लागेल, असा सरकारी पातळीवर विचार आहे.
कोळशाअभावी अर्धवट उभारणी झालेल्या किंवा उभारणीनंतरही ठप्प राहिलेल्या वीज प्रकलांमध्ये दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अडकून पडली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रतील वीज प्रकल्पांना बँकांनी दिलेली पाच लाख रुपयांची कज्रेही अडचणीत आली आहेत.
देशातील वीजनिर्मितीची एकूण स्थापित क्षमता 2.5क् लाख मे.व्ॉ. एवढी आहे. त्यापैकी 65 टक्के क्षमता औष्णिक वीज प्रकल्पांची आहे. गेल्या पाच वर्षात कोळशाची मागणी 87 टक्क्यांनी वाढली आहे; पण कोळशाच्या उत्पादनात मात्र फक्त 15 टक्के वाढ झाली आहे. आजच्या तारखेला कोल इंडियाने एकूण 74 हजार मे.व्ॉ. वीजनिर्मितीसाठी कोळसा पुरवठा करण्याची हमी देणारे करार वीज कंपन्यांशी केले आहेत. प्रत्यक्षात एवढा कोळसा कोल इंडिया एकटय़ाने पुरवू शकत नाही, अशी स्थिती आहे. परिणामी, याआधीच सुरू झालेल्या किंवा 12 व्या पंचवार्षिक योजनेत सुरू व्हायच्या एकूण 14,5क्क् मेवॉ क्षमतेच्या औष्णिक विद्युत प्रकल्पांना देशी कोळसा पुरवठय़ाची कोणतीही व्यवस्था नाही, अशी स्थिती आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)