शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

प. बंगाल व उत्तर भारतावर सर्वच नेत्यांचे लक्ष; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मताधिक्य वाढविण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 04:34 IST

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात पंतप्रधान मोदी ...

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी मतदारसंघही आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट असून, आतापर्यंत बिहार व उत्तर प्रदेशात ५0 टक्क्यांपर्यंत मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात अधिक मतदान व्हावे व पंतप्रधान मोदी यांचे मताधिक्य गेल्या वेळपेक्षा अधिक असावे, असा भाजपचा प्रयत्न आहे.

या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, व भाजपचे नेते अधिक सक्रिय झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सभांचा धडाका लावला आहे. सॅम पित्रोडा यांच्या शीखविरोधी दंगलींबाबत विधानाचा पंजाबमध्ये फटका बसू नये, यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. त्याचमुळे राहुल गांधी यांनी सोमवारीही पित्रोडा यांच्या विधानाचा जाहीरपणे निषेध केला.

काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील दलित महिलेवरील बलात्काराचे प्रकरण हा पंतप्रधान मोदींनी प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. या प्रश्नावरून मायावती यांनी गेहलोत सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे मोदी म्हणत आहेत. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यांच्या आघाडीचा सामना करणे शक्य नसल्याचे भाजपच्या लक्षात आल्याने तिथे त्या पक्षांवरच मोदी हल्ला चढवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मोदी व अमित शहा आणखी सभा घेणार असून, त्यामुळे तिथे भाजप व तृणमूल यांच्यातील कटुता वाढेल, असे दिसते.

या राज्यांमध्ये १९ मे रोजी मतदानया टप्प्यात उत्तर प्रदेश (१३ जागा), बिहार (८), पश्चिम बंगाल (९), मध्य प्रदेश (८), झारखंड (३), पंजाब (१३) हिमाचल प्रदेश (४) व चंदीगड (१) येथे आहे. पंजाब व हिमाचल प्रदेशातील सर्व जागांवर त्या दिवशी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. बिहारमध्ये लढाई भाजप व राष्ट्रीय जनता दल यांच्यातच दिसत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019