शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

लक्ष २०२४! भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस खा. राहुल गांधींचा काय आहे नवा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:00 IST

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपायच्या आधीच काँग्रेसनं दुसरं अभियान सुरू केले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी श्रीनगरमध्ये संपली. २०१४ ला काँग्रेस देशातील सत्तेतून बाहेर गेली. निसटता जनाधार आणि कमकुवत होत असलेल्या पक्षसंघटनेला पुन्हा नवजीवन देण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ४ हजार किमीहून जास्त पदयात्रा काढली. यावेळी राहुल गांधींनी बेरोजगारी, आर्थिक आणि सामाजिक असंतुलनसारखे मुद्दे पुढे आणले. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर आता राहुल गांधींचा पुढचा प्लॅन काय असा प्रश्न उभा राहिला.

५ महिने चाललेल्या भारत जोडो यात्रेत ही अराजकीय होती असं म्हटलं जात होते. परंतु कुठल्याही पक्षाच्या नेत्याने काढलेली यात्रा नेहमी राजकारणाशी जोडलेली असते. त्यामुळे राहुल गांधींच्या या यात्रेचा काँग्रेसच्या राजकारणाशी संबंध आहेच. राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात पदयात्रेचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. २०२४ पर्यंत काँग्रेसनं स्वत:ला सक्रीय ठेवण्यासाठी ग्राऊंडवर उतरून वातावरण निर्मिती करण्याचा खास प्लॅन बनवला आहे. 

काँग्रेसचं हाथ से हाथ जोडो अभियानराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपायच्या आधीच काँग्रेसनं दुसरं अभियान सुरू केले आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेसनं हाथ से हाथ जोडो अभियान सुरू केले आहे. हे अभियान ३ महिने चालेल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील अनुभव असलेले पत्र घेऊन काँग्रेस नेते-कार्यकर्ते गावोगावी, घरोघरी जात लोकांना भेटतील. त्याअंतर्गत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय संमेलन आणि रॅली आयोजित करण्यात येणार आहे. 

राहुल गांधी पुन्हा पदयात्रा काढणारहाथ से हाथ जोडो अभियानानंतर काँग्रेस भारत जोडो यात्रा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा प्लॅन करत आहे. काँग्रेस महासचिव के. सी वेणुगोपाळ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींच्या नेतृत्वात पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू होईल. या पदयात्रेचा फायनल रोडमॅप बनला नाही. परंतु दुसरा टप्पा नक्कीच निघेल ज्यात राहुल गांधी सहभागी होतील. 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दुसऱ्या टप्प्यात पदयात्रा तेव्हा निघेल जेव्हा देशातील महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण असेल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान , कर्नाटकसारख्या राज्यात निवडणुका आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. २०२३ हे पूर्ण वर्ष काँग्रेस एक्टिव्ह राहण्याचा प्लॅन बनवला आहे. काँग्रेस छत्तीसगडच्या रायपूर इथं २४ ते २६ फेब्रुवारीपर्यंत अधिवेशन आयोजित करेल. ज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संघटनात्मक निर्णय घेतील. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस