शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लक्ष २०२४! भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस खा. राहुल गांधींचा काय आहे नवा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:00 IST

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपायच्या आधीच काँग्रेसनं दुसरं अभियान सुरू केले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी श्रीनगरमध्ये संपली. २०१४ ला काँग्रेस देशातील सत्तेतून बाहेर गेली. निसटता जनाधार आणि कमकुवत होत असलेल्या पक्षसंघटनेला पुन्हा नवजीवन देण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ४ हजार किमीहून जास्त पदयात्रा काढली. यावेळी राहुल गांधींनी बेरोजगारी, आर्थिक आणि सामाजिक असंतुलनसारखे मुद्दे पुढे आणले. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर आता राहुल गांधींचा पुढचा प्लॅन काय असा प्रश्न उभा राहिला.

५ महिने चाललेल्या भारत जोडो यात्रेत ही अराजकीय होती असं म्हटलं जात होते. परंतु कुठल्याही पक्षाच्या नेत्याने काढलेली यात्रा नेहमी राजकारणाशी जोडलेली असते. त्यामुळे राहुल गांधींच्या या यात्रेचा काँग्रेसच्या राजकारणाशी संबंध आहेच. राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात पदयात्रेचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. २०२४ पर्यंत काँग्रेसनं स्वत:ला सक्रीय ठेवण्यासाठी ग्राऊंडवर उतरून वातावरण निर्मिती करण्याचा खास प्लॅन बनवला आहे. 

काँग्रेसचं हाथ से हाथ जोडो अभियानराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपायच्या आधीच काँग्रेसनं दुसरं अभियान सुरू केले आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेसनं हाथ से हाथ जोडो अभियान सुरू केले आहे. हे अभियान ३ महिने चालेल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील अनुभव असलेले पत्र घेऊन काँग्रेस नेते-कार्यकर्ते गावोगावी, घरोघरी जात लोकांना भेटतील. त्याअंतर्गत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय संमेलन आणि रॅली आयोजित करण्यात येणार आहे. 

राहुल गांधी पुन्हा पदयात्रा काढणारहाथ से हाथ जोडो अभियानानंतर काँग्रेस भारत जोडो यात्रा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा प्लॅन करत आहे. काँग्रेस महासचिव के. सी वेणुगोपाळ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींच्या नेतृत्वात पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू होईल. या पदयात्रेचा फायनल रोडमॅप बनला नाही. परंतु दुसरा टप्पा नक्कीच निघेल ज्यात राहुल गांधी सहभागी होतील. 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दुसऱ्या टप्प्यात पदयात्रा तेव्हा निघेल जेव्हा देशातील महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण असेल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान , कर्नाटकसारख्या राज्यात निवडणुका आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. २०२३ हे पूर्ण वर्ष काँग्रेस एक्टिव्ह राहण्याचा प्लॅन बनवला आहे. काँग्रेस छत्तीसगडच्या रायपूर इथं २४ ते २६ फेब्रुवारीपर्यंत अधिवेशन आयोजित करेल. ज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संघटनात्मक निर्णय घेतील. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस