शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

‘तिरुवनंतपूरम’मध्ये शशी थरूर यांना घेरण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 05:52 IST

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपा सरकारला वारंवार खिंडीत पकडणाऱ्या काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी भाजपासह डाव्यांनीही व्यूहरचना आखली आहे.

- पोपट पवारतिरुवनंतपूरम : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपा सरकारला वारंवार खिंडीत पकडणाऱ्या काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी भाजपासह डाव्यांनीही व्यूहरचना आखली आहे. एलडीएफप्रणित भाकपने आमदार सी. दिवाकरन यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. भाजपाने शशी थरूर यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्यासाठी अनेक नावांची चाचपणी सुरू केली आहे. मिझोरमच्या राज्यपालपदाचा नुकताच राजीनामा देणारे कुम्मानम राजशेखरन यांचे नाव सर्वात पुढे आहे. किंबहुना त्यांनी निवडणूक लढवण्यासाठीच राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी तिरूवनंतपूरममधून सलग दोनदा विजयी झालेल्या थरूर यांना यंदा 'हॅटट्रिक' करण्यासाठी झगडावे लागण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसने केरळ लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. मात्र राष्ट्रीय राजकारणात स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या उच्चशिक्षित शशी थरुर यांची तिरूवनंतपूरममधील उमेदवारी निश्चित मानली जात आहे.तिरूवनंतपूरम हा केरळमधील हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तिरूवनंतपूरम मतदारसंघ १९७१ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे झालेल्या लोकसभेच्या ११ पैकी तब्बल ७ निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (सीपीआय) ४ वेळा विजय मिळवला. केरळची राजधानी असलेल्या तिरूवनंतपूरमध्ये गेल्या तीन दशकांहून डावे आणि काँग्रेसमधील सत्तासंघर्ष नेहमीच अटातटीचा राहिला आहे. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने येथे काँग्रेसला निकराची लढत दिली. त्यामुळे भाजपालाही हा मतदारसंघ महत्त्वाचा बनला आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत शशी थरूर यांनी भाजपच्या ओ. राजगोपाल यांच्यावर अवघ्या १५ हजार ४७० मतांनी विजय मिळविला होता. थरूर यांना २ लाख ९७ हजार ८०६ मते, तर कडवी झुंज देणा-या राजगोपाल यांना २ लाख ८२ हजार ३३६ मते मिळाली होती. याच निवडणुकीत बेनेट अब्राहम यांनीही अडीच लाख मते घेत तिरूवनंतपूरम मतदारसंघात सीपीआयचे स्थान भक्कम असल्याचे दाखवून दिले होते.त्याआधी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तिरूवनंतपूरममधून सीपीआयच्या उमेदवाराचा तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी पराभव करणाºया थरूर यांचे २०१४ च्या निवडणुकीत मताधिक्य घटल्याने काँग्रेससाठी चिंतेची बाब ठरली आहे. याचाच लाभ उठवण्यासाठी भाजपासह डाव्या पक्षांनीही थरूर यांना खिंडीत गाठण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.गेल्या निवडणुकीत दुसºया स्थानाची मते मिळाल्याने आत्मविश्वास उंचावलेल्या भाजपाने या मतदारसंघातून केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाची ‘हवा’ करून, थरूर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नावाला वरिष्ठ पातळीवरून संमती न मिळाल्याने भाजपाने मिझोरामचे राज्यपाल कुम्मानम राजशेखरन यांनाच आखाड्यात उतरवण्याची तयारी चालविली आहे. राजशेखरन हे केरळ भाजपचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांच्या जनसंपर्काचा फायदा थरूर यांना पराभूत करण्यात हातभार लावेल, असा भाजपाचा व्होरा आहे.भाकपमुळे इतरांना डोकेदुखीगेल्या निवडणुकीत तिरूवनंतपूरममध्ये तिसºया स्थानाची मते घेणाºया भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (सीपीआय) विद्यमान आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री सी. दिवाकरन यांनाच मैदानात उतरवल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दिवाकरन हे ‘मास लीडर’ म्हणून ओळखले जात असल्याने त्यांची उमेदवारी काँग्रेसह भाजपलाही डोकेदुखी ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShashi Tharoorशशी थरूर