शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

‘तिरुवनंतपूरम’मध्ये शशी थरूर यांना घेरण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 05:52 IST

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपा सरकारला वारंवार खिंडीत पकडणाऱ्या काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी भाजपासह डाव्यांनीही व्यूहरचना आखली आहे.

- पोपट पवारतिरुवनंतपूरम : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपा सरकारला वारंवार खिंडीत पकडणाऱ्या काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी भाजपासह डाव्यांनीही व्यूहरचना आखली आहे. एलडीएफप्रणित भाकपने आमदार सी. दिवाकरन यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. भाजपाने शशी थरूर यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्यासाठी अनेक नावांची चाचपणी सुरू केली आहे. मिझोरमच्या राज्यपालपदाचा नुकताच राजीनामा देणारे कुम्मानम राजशेखरन यांचे नाव सर्वात पुढे आहे. किंबहुना त्यांनी निवडणूक लढवण्यासाठीच राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी तिरूवनंतपूरममधून सलग दोनदा विजयी झालेल्या थरूर यांना यंदा 'हॅटट्रिक' करण्यासाठी झगडावे लागण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसने केरळ लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. मात्र राष्ट्रीय राजकारणात स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या उच्चशिक्षित शशी थरुर यांची तिरूवनंतपूरममधील उमेदवारी निश्चित मानली जात आहे.तिरूवनंतपूरम हा केरळमधील हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तिरूवनंतपूरम मतदारसंघ १९७१ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे झालेल्या लोकसभेच्या ११ पैकी तब्बल ७ निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (सीपीआय) ४ वेळा विजय मिळवला. केरळची राजधानी असलेल्या तिरूवनंतपूरमध्ये गेल्या तीन दशकांहून डावे आणि काँग्रेसमधील सत्तासंघर्ष नेहमीच अटातटीचा राहिला आहे. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने येथे काँग्रेसला निकराची लढत दिली. त्यामुळे भाजपालाही हा मतदारसंघ महत्त्वाचा बनला आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत शशी थरूर यांनी भाजपच्या ओ. राजगोपाल यांच्यावर अवघ्या १५ हजार ४७० मतांनी विजय मिळविला होता. थरूर यांना २ लाख ९७ हजार ८०६ मते, तर कडवी झुंज देणा-या राजगोपाल यांना २ लाख ८२ हजार ३३६ मते मिळाली होती. याच निवडणुकीत बेनेट अब्राहम यांनीही अडीच लाख मते घेत तिरूवनंतपूरम मतदारसंघात सीपीआयचे स्थान भक्कम असल्याचे दाखवून दिले होते.त्याआधी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तिरूवनंतपूरममधून सीपीआयच्या उमेदवाराचा तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी पराभव करणाºया थरूर यांचे २०१४ च्या निवडणुकीत मताधिक्य घटल्याने काँग्रेससाठी चिंतेची बाब ठरली आहे. याचाच लाभ उठवण्यासाठी भाजपासह डाव्या पक्षांनीही थरूर यांना खिंडीत गाठण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.गेल्या निवडणुकीत दुसºया स्थानाची मते मिळाल्याने आत्मविश्वास उंचावलेल्या भाजपाने या मतदारसंघातून केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाची ‘हवा’ करून, थरूर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नावाला वरिष्ठ पातळीवरून संमती न मिळाल्याने भाजपाने मिझोरामचे राज्यपाल कुम्मानम राजशेखरन यांनाच आखाड्यात उतरवण्याची तयारी चालविली आहे. राजशेखरन हे केरळ भाजपचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांच्या जनसंपर्काचा फायदा थरूर यांना पराभूत करण्यात हातभार लावेल, असा भाजपाचा व्होरा आहे.भाकपमुळे इतरांना डोकेदुखीगेल्या निवडणुकीत तिरूवनंतपूरममध्ये तिसºया स्थानाची मते घेणाºया भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (सीपीआय) विद्यमान आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री सी. दिवाकरन यांनाच मैदानात उतरवल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दिवाकरन हे ‘मास लीडर’ म्हणून ओळखले जात असल्याने त्यांची उमेदवारी काँग्रेसह भाजपलाही डोकेदुखी ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShashi Tharoorशशी थरूर