शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

देशात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 12:33 IST

अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे याचे उत्तर द्या असं आव्हान खासदार संजय राऊतांनी मोदींना दिले. 

नवी दिल्ली - देशाची ताकद प्रचंड आहे. विरोधी पक्षांची ताकद प्रचंड आहे. सत्ताधाऱ्यांना हा देश गुलाम करून आम्हाला बंधनात पकडायचं आहे. ही बंधने तोडण्याची वेळ आलीय. दिल्लीत काँग्रेस पक्षाने जो मोर्चा काढला, महिला खासदार, महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन दिल्ली पोलिसांनी केले. ही हुकुमशाही आणि गुलामगिरी लादण्याचा हा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, या देशात विरोधकांचा आवाज दाबण्याची, आंदोलन होऊच द्यायची नाहीत हे ठरवलेले आहे. निवडणूकसुद्धा हे भ्रष्टमार्गाने जिंकले का असा प्रश्न निर्माण होतोय. देशातील जनता रस्त्यावर उतरताना दिसतेय त्यावरून यांना लोकांनी मतदान केले नाही हे स्पष्ट होते. शरद पवारांनी EVM बाबत बैठक घेऊन प्रश्न उभे केले. त्याबाबत आम्ही पुढे जाऊ असं त्यांनी सांगितले. 

अदानींचे २० हजार कोटी कुणाचे? बदल्याचं राजकारण सुरूच आहे. बदला कुणाशी आणि का घेतायेत, तसेच त्यासाठी देश लुटणाऱ्या गौतम अदानींच्या मागे का उभे आहेत याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत केलेले भाषण पुरेसे बोलके आहे. अदानी हा चेहरा आहे त्यांचे पैसे मोदींचे आहेत याचा तपास व्हायला हवा. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यापासूनच अदानींचा उदय झाला. हजारो-शेकडो कोटींचा भ्रष्टाचार सुरू असताना आजही मोदी सर्व विषयावर बोलतात. विरोधकांशी संघर्ष करतात पण यावर बोलत नाहीत. अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे याचे उत्तर द्या असं आव्हान खासदार संजय राऊतांनी मोदींना दिले. 

सावरकर हा विषय संपलासावरकर विषय आमच्यासाठी संपलेला आहे. शरद पवारांनी एक भूमिका घेतली. काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा झालीय. भविष्यात काय होतंय ते पाहा असं सांगत खासदार संजय राऊतांनी सावरकर वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधी