शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

देशात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 12:33 IST

अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे याचे उत्तर द्या असं आव्हान खासदार संजय राऊतांनी मोदींना दिले. 

नवी दिल्ली - देशाची ताकद प्रचंड आहे. विरोधी पक्षांची ताकद प्रचंड आहे. सत्ताधाऱ्यांना हा देश गुलाम करून आम्हाला बंधनात पकडायचं आहे. ही बंधने तोडण्याची वेळ आलीय. दिल्लीत काँग्रेस पक्षाने जो मोर्चा काढला, महिला खासदार, महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन दिल्ली पोलिसांनी केले. ही हुकुमशाही आणि गुलामगिरी लादण्याचा हा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, या देशात विरोधकांचा आवाज दाबण्याची, आंदोलन होऊच द्यायची नाहीत हे ठरवलेले आहे. निवडणूकसुद्धा हे भ्रष्टमार्गाने जिंकले का असा प्रश्न निर्माण होतोय. देशातील जनता रस्त्यावर उतरताना दिसतेय त्यावरून यांना लोकांनी मतदान केले नाही हे स्पष्ट होते. शरद पवारांनी EVM बाबत बैठक घेऊन प्रश्न उभे केले. त्याबाबत आम्ही पुढे जाऊ असं त्यांनी सांगितले. 

अदानींचे २० हजार कोटी कुणाचे? बदल्याचं राजकारण सुरूच आहे. बदला कुणाशी आणि का घेतायेत, तसेच त्यासाठी देश लुटणाऱ्या गौतम अदानींच्या मागे का उभे आहेत याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत केलेले भाषण पुरेसे बोलके आहे. अदानी हा चेहरा आहे त्यांचे पैसे मोदींचे आहेत याचा तपास व्हायला हवा. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यापासूनच अदानींचा उदय झाला. हजारो-शेकडो कोटींचा भ्रष्टाचार सुरू असताना आजही मोदी सर्व विषयावर बोलतात. विरोधकांशी संघर्ष करतात पण यावर बोलत नाहीत. अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे याचे उत्तर द्या असं आव्हान खासदार संजय राऊतांनी मोदींना दिले. 

सावरकर हा विषय संपलासावरकर विषय आमच्यासाठी संपलेला आहे. शरद पवारांनी एक भूमिका घेतली. काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा झालीय. भविष्यात काय होतंय ते पाहा असं सांगत खासदार संजय राऊतांनी सावरकर वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधी