शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

बांग्लादेश उच्चायुक्तालयावर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता, सुरक्षाही वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 20:29 IST

बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हा हल्ला करण्यात आला आहे.

Attack on Bangladesh High Commission : त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तालयावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबद्दल भारताने तीव्र दु:ख व्यक्त केले असून, या परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांग्लादेशात इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण दास यांची अटक आणि हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आला होता. 

त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे विश्व हिंदू परिषदेचा (विहिंप) भाग असलेल्या हिंदू संघर्ष समितीच्या बॅनरखाली हजारो लोकांच्या जमावाने चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा निषेध आणि हिंदूंवरील हल्ले थांबवण्याच्या मागणीसाठी रॅलीये आयोजन केले होते. यावेळी काही लोकांनी बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तावर हल्ला आणि आत घुसण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (2 डिसेंबर 2024) म्हटले की, आगरतळा येथील बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या आवारात झालेली घुसखोरी "अत्यंत खेदजनक" आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदनपरराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर एक निवेदन जारी करून म्हटले की, "कोणत्याही परिस्थितीत राजनैतिक आणि वाणिज्य दूतावासाच्या मालमत्तेला लक्ष्य केले जाऊ नये. बांग्लादेश उच्चायुक्तालय आणि त्याच्या उप/सहाय्यक उच्चायुक्तांच्या सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे." दरम्यान, त्रिपुरा विहिंपचे सचिव शंकर रॉय म्हणाले की, शेख हसीना सरकार पडल्यापासून बांगलादेशात हिंदू मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर हल्ले होत आहेत आणि हिंदू व्यावसायिकांना लुटले जात आहे. चिन्मय प्रभू यांनाही हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला म्हणून तुरुंगात डांबण्यात आले. चिन्मय दास यांच्या सुटकेसाठी भारत सरकराने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतHinduहिंदू