शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

बांग्लादेश उच्चायुक्तालयावर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता, सुरक्षाही वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 20:29 IST

बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हा हल्ला करण्यात आला आहे.

Attack on Bangladesh High Commission : त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तालयावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबद्दल भारताने तीव्र दु:ख व्यक्त केले असून, या परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांग्लादेशात इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण दास यांची अटक आणि हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आला होता. 

त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे विश्व हिंदू परिषदेचा (विहिंप) भाग असलेल्या हिंदू संघर्ष समितीच्या बॅनरखाली हजारो लोकांच्या जमावाने चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा निषेध आणि हिंदूंवरील हल्ले थांबवण्याच्या मागणीसाठी रॅलीये आयोजन केले होते. यावेळी काही लोकांनी बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तावर हल्ला आणि आत घुसण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (2 डिसेंबर 2024) म्हटले की, आगरतळा येथील बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या आवारात झालेली घुसखोरी "अत्यंत खेदजनक" आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदनपरराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर एक निवेदन जारी करून म्हटले की, "कोणत्याही परिस्थितीत राजनैतिक आणि वाणिज्य दूतावासाच्या मालमत्तेला लक्ष्य केले जाऊ नये. बांग्लादेश उच्चायुक्तालय आणि त्याच्या उप/सहाय्यक उच्चायुक्तांच्या सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे." दरम्यान, त्रिपुरा विहिंपचे सचिव शंकर रॉय म्हणाले की, शेख हसीना सरकार पडल्यापासून बांगलादेशात हिंदू मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर हल्ले होत आहेत आणि हिंदू व्यावसायिकांना लुटले जात आहे. चिन्मय प्रभू यांनाही हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला म्हणून तुरुंगात डांबण्यात आले. चिन्मय दास यांच्या सुटकेसाठी भारत सरकराने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतHinduहिंदू