शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बांग्लादेश उच्चायुक्तालयावर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता, सुरक्षाही वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 20:29 IST

बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हा हल्ला करण्यात आला आहे.

Attack on Bangladesh High Commission : त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तालयावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबद्दल भारताने तीव्र दु:ख व्यक्त केले असून, या परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांग्लादेशात इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण दास यांची अटक आणि हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आला होता. 

त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे विश्व हिंदू परिषदेचा (विहिंप) भाग असलेल्या हिंदू संघर्ष समितीच्या बॅनरखाली हजारो लोकांच्या जमावाने चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा निषेध आणि हिंदूंवरील हल्ले थांबवण्याच्या मागणीसाठी रॅलीये आयोजन केले होते. यावेळी काही लोकांनी बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तावर हल्ला आणि आत घुसण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (2 डिसेंबर 2024) म्हटले की, आगरतळा येथील बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या आवारात झालेली घुसखोरी "अत्यंत खेदजनक" आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदनपरराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर एक निवेदन जारी करून म्हटले की, "कोणत्याही परिस्थितीत राजनैतिक आणि वाणिज्य दूतावासाच्या मालमत्तेला लक्ष्य केले जाऊ नये. बांग्लादेश उच्चायुक्तालय आणि त्याच्या उप/सहाय्यक उच्चायुक्तांच्या सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे." दरम्यान, त्रिपुरा विहिंपचे सचिव शंकर रॉय म्हणाले की, शेख हसीना सरकार पडल्यापासून बांगलादेशात हिंदू मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर हल्ले होत आहेत आणि हिंदू व्यावसायिकांना लुटले जात आहे. चिन्मय प्रभू यांनाही हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला म्हणून तुरुंगात डांबण्यात आले. चिन्मय दास यांच्या सुटकेसाठी भारत सरकराने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतHinduहिंदू