शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

‘अ‍ॅट्रॉसिटी’ निकालास स्थगिती नाही, फेरविचार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:45 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याख़ालील तक्रारीची शहानिशा केल्याखेरीज गुन्हा नोंदविण्यास वा आरोपींना अटक करण्यास मनाई करणाऱ्या निकालाच्या फेरविचारासाठी खुली सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय मंगळवारी राजी झाले.

नवी दिल्ली - अ‍ॅट्रॉसिटी कायद्याख़ालील तक्रारीची शहानिशा केल्याखेरीज गुन्हा नोंदविण्यास वा आरोपींना अटक करण्यास मनाई करणाऱ्या निकालाच्या फेरविचारासाठी खुली सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय मंगळवारी राजी झाले. मात्र या निकालास स्थगिती देण्यास नकार देताना, आम्ही ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा’ शिथिल केला नाही वा या निकालाने अनुसूचित जाती-जमातींच्या हक्कांचा संकोच झालेला नाही, असे नमूद केले.न्या. आदर्श कुमार गोयल व न्या. उदय उमेश लळित यांच्या खंडपीठाने सर्व पक्षकारांना फेरविचारासंबंधीचे लेखी म्हणणे सादर करण्यास सांगितले. सुनावणी नंतर खुल्या न्यायालयात होईल. या निकालाच्या निषेधार्थ दलित संघटनांच्या ‘भारत बंद’ला सोमवारी हिंसक वळण लागले असताना केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली. ती तातडीने सुनावणीसाठी घेतली जावी यासाठी अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी धावपळ केली. फेरविचार याचिकेवर मूळ निकाल देणाºया न्यायाधीशांपुढेच सुनावणी होते. मात्र आता खंडपीठांची फेररचना झाल्याने न्या. गोयल व न्या. लळित वेगवेगळ्या खंडपीठांवर आहेत.वेणुगोपाल यांनी देशभर झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करत याचिकेवर तातडीने विचार करण्याची विनंती केली. त्यावर न्या. गोयल म्हणालेकी, सरन्यायाधीशांनी माझे व न्या. लळित यांचे विशेष खंडपीठ लगेच गठित केले तर हा विषय हाताळता येईल. यानंतर वेणुगोपाळ सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्यासमोर गेले व त्यांनी निकड विषद केली. त्यावर, न्या. गोयल व न्या. लळित यांचे खंडपीठ दु. २ वाजता बसेल त्यांच्याकडे जा, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.दुपारी हे विशेष खंडपीठ बसले तेव्हा खचाखच गर्दी झालेली होती. केंदातर्फे अ‍ॅटर्नी जनरल व महाराष्ट्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीे निकालास स्थगितीची विनंती केली. मूळ सुनावणीतील ‘अ‍ॅमायकस क्युरी’ अमरेंद्र शरण यांनी त्यास विरोध केला. अल्प सुनावणीनंतर खंडपीठाने, या याचिकेवर खुली सुनावणी घेण्याचे मान्य केले. त्यासाठी तारीख ठरलेली नाही.आधी गाफिलपणा, नंतर जागडॉ. सुभाष महाजन वि. महाराष्ट्र या अपिलावर २० मार्च रोजी्र-१ँ निकालावरून हे रणकंदन सुरू आहे. फिर्याद हे ब्रह्मवाक्य मानून आरोपीला अटक करणे योग्य आहे का, हा मुद्दा न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी विचारार्थ घेतला. या अपिलात केंद्र सरकार प्रतिवादी नव्हते. मात्र केंद्रीय कायदा असल्याने न्यायालयाने त्यावेळी अ‍ॅटर्नी जनरलना नोटीस काढली. आता फेरविचारासाठी धावपळ करणारे अ‍ॅटर्नी जनरल त्यावेळी कोर्टापुढे आले नाहीत. केंद्रातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग उभे राहिले. त्याचा युक्तिवाद न्यायालयाने निकालपत्रात नोंदविला.न्यायाधीशांची भाष्ये

आम्ही ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा’ शिथिलकेला नाही. विनाकारण अटक टाळण्यासाठी खबरदारी या कायद्यातही घ्यावी, एवढेच म्हटले आहे.आम्ही ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याविरोधातनाही. परंतु निष्पापांच्या हक्कांचेही रक्षण व्हावे यासाठी पद्धत ठरवली आहे.आरोपीस अटक करण्यास सरसकट बंदी नाही. ‘अ‍ॅट्रॉसिटी’खेरीज इतरही गुन्ह्यांची फिर्याद असेल तर त्यासाठी अटक करता येईल. शहानिशा केल्यानंतर ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्हे जोडता येतील.सोमवारी रस्त्यांवर उतरलेल्यांनी आमचा निकाल वाचलेला नाही वा त्यांची दिशाभूल केली गेली.आजी-माजी आमदाराची घरे दिली पेटवूनराजस्थानात करौलीजवळील हिंडौन येथे लोकांनी मंगळवारी भाजपाचे आमदार राजकुमारी जाटव व काँग्रेसचे माजी आमदार भरौसीलाल जाटव यांची घरे पेटवली. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर राजस्थानात काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली.मोदी सरकारच्या काळातवाढले दलितांवरील अत्याचारमोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात दलितांवरील अत्याचारांच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र, विशेष बाब ही आहे की, अत्याचाराची प्रकरणे तर वाढली, पण शिक्षा होण्याचे प्रमाण घटल्याची सरकारचीच आकडेवारी आहे. 

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत