शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

Atrocity Act- दलित समाजाच्या संतापाचा भडका का ?

By तुळशीदास भोईटे | Updated: April 3, 2018 19:45 IST

गेल्या काही दिवसांपासून अॅट्रॉसिटीच्या कायद्यात सर्वोच्च न्यायालयानं बदल केल्यानं हिंसाचार उफाळून आलाय. या हिंसाचारात अनेकांचे बळी गेले आहेत. परंतु दलित समाज इतका का संतापलाय ?, त्यामागचा घेतलेला हा वेध.

नवी दिल्ली - देशभरातला दलित समाज खवळला आहे. त्यांच्या संतापाचा वणवा भडकलाय. देशातील 12 राज्यांमध्ये असंतोषाचा भडका उसळल्याचं दिसून आलं. लोकसभेतही त्याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये असंतोष व्यक्त करण्यासाठी निदर्शने झाली, मोर्चे काढण्यात आले. मात्र काही अपवाद वगळता तसा हिंसाचार झाला नाही. मात्र 12 राज्यांपैकी जेथे या वर्षाच्या अखेरीस निवडणुका आहेत तेथे सर्वात जास्त हिंसाचार उसळल्याचे दिसले. असे नेमके का झाले ? त्यावर सरळस्पष्ट बोलूच मात्र त्याआधी दलित नेमके का खवळले तेही समजून घेतले पाहिजे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नेमकं काय ?सर्वोच्च न्यायालयाने 20 मार्च रोजी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती अत्याचार निवारण अधिनियम – 1989 म्हणजेच अॅट्रॉसिटी या नावाने जास्त परिचित असणाऱ्या कायद्याच्या गैरवापर रोखण्यासाठी मार्गदर्शिका जारी केली. आपल्या महाराष्ट्रातल्या एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे पाऊल उचलले.अॅट्रॉसिटी गैरवापर रोखण्यासाठीची मार्गदर्शिकासरकारी कर्मचाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार दाखल झाल्यास त्वरित अटक नाही.सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच अटक करता येईल.सरकारी कर्मचाऱ्यांऐवजी जे सामान्य नागरिक आरोपी असतील तर त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने अटक करता येईल.गुन्हा नोंदवला गेल्यानंतर अटकपूर्व जामिनावर न्यायदंडाधिकारी म्हणजेच मॅजिस्ट्रेट विचार करतील, आपल्या विवेकाने ते मंजूर अथवा नामंजूर करतील.

दलितांचा संताप का?सामाजिक अन्याय, अत्याचार आजही होत असल्याने अॅट्रॉसिटी कायदा आजही आवश्यक आहे.दुरुपयोगाचा आरोप होत असला तरी मोठ्या प्रमाणावर नाही तेवढी चर्चा होते.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही सरकारने काहीच पावलं उचलली नाहीत.सरकारने त्वरित पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे होती.अॅट्रॉसिटी कायद्यातील पूर्वापार चालत आलेल्या तरतुदींनुसारच कारवाई होत राहावी.कोणत्याही परिस्थितीत अॅट्रॉसिटी कायद्यात बदल केले जाऊ नयेत.दलितांचा संतापाचा सर्वात जास्त भडका कुठे उडाला ते पाहिलं तर या मुद्द्यातही कुठेतरी राजकारण असल्याचे सहजच लक्षात येते. 12 राज्यांमध्ये दलितांचं प्राबल्य असणारे लोकसभेचे मतदारसंघ आहेत. तेथे संताप दिसला. मात्र सर्वात जास्त वणवा भडकला तो राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जेथे निवडणुका येऊ घातल्यात. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहारातही धग जाणवली. त्यामुळेच कालपासून राजकारण चांगलेच रंगले. आज लोकसभेतही पडसाद उमटले. राहुल गांधी यांनी ट्विट करून थेट हल्ला केला. ते म्हणाले “दलितांना भारतीय समाजाच्या सर्वात खालच्या थरात ठेवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या डीएनएमध्ये आहे. हजारो दलित बांधव-भगिनी रस्त्यावर उतरून मोदी सरकारकडून आपल्या हक्कांच्या रक्षणाची मागणी करत आहे. मी त्यांना सलाम करतो” राहुल गांधींच्या ट्विटला उत्तरही मिळाले. “काही लोक संघाच्या विरोधात विषारी दुष्प्रचार करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संघाला काहीच घेणं-देणं नाही.” या राजकारण्यांचं राजकारण होईल. मात्र आंदोलनातील दहापेक्षा जास्त बळी गेले त्यांचे प्राण परत येणार नाहीत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विचार आवश्यक. अॅट्रॉसिटी कायदा विरोधकांचा आरोप आहे की या कायद्याचा सातत्यानं दुरुपयोग होत असतो. मात्र मतांच्या राजकारणामुळे दुर्लक्ष केले जाते. एनसीआरबीचा 2016च्या अहवालानुसार देशभरात जातीवाचक शिवीगाळीच्या 11.060 तक्रारी दाखल झाल्या, त्यापैकी तपासानंतर 935 तक्रारी खोट्या निघाल्या. त्यांचं म्हणणं किमान दहा टक्के तरी प्रकरणात निरपराधांना विनाकारण जाच झाला. तर अॅट्रॉसिटी कायदा समर्थकांचा दावा आहे की 10 म्हणजेच फक्त 10 टक्केही तक्रारी खोट्या नाहीत, त्यामुळे दुरुपयोगाचा आरोप फोल ठरतो.दलितांच्या प्रश्नांचं राजकारण समजून घेण्यासाठी आकड्यांची मदत घेऊ यादेशात दलित फॅक्टरच महत्त्वाचं

देशात दलित-आदिवासी समाजाची लोकसंख्या –  20 कोटी

लोकसभेत राखीव मतदारसंघ  -  131

दलितांसाठी राखीव मतदारसंघ  - 084

आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ  - 047

जेथे आंदोलनाची तीव्रता जास्त तेथील दलित-आदिवासी मते परिणामकारक ठरतील असे मतदार संघ  - 71

भाजपाचे सर्वात जास्त खासदार याच वर्गातील  - 67अर्थात मुद्दा कोणताही असो. दोन बाजू असतातच असतात. त्यामुळे थेट कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या सारख्या विविधता असणाऱ्या देशात सर्वांना नाही पण किमान सर्व समाज घटकातील बहुसंख्यांना मान्य होईल किंवा स्वीकारणं अवघड ठरू नये, असा तोडगा काढला जावा. या प्रकरणातही न्यायालयाच्या निकालानंतर सरकारनेच योग्य पावलं उचलली असती तर असंतोषाचा वणवा भडकला नसता. मात्र काही वेळा तो जाणीवपूर्वकही भडकू दिला जातो. भडकवला जातो. हे केवळ याच प्रकरणाच्या बाबतीत नाही तर सर्वच मुद्द्यांवर घडावं. तसं घडत नाही. कारण मग राजकारणाची पोळी कशी भाजली जाईल? पक्ष कोणताही असो...दुर्दैवाने आपल्या देशात हेच सर्वात मोठे मेक इन इंडिया धोरण आहे... भडकू द्या वणवा...मरू द्या माणसं...पोळी भाजू या राजकारणाची...

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय