शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Atmanirbhar Bharat Abhiyan: 'परवडणारी घरं' देणारी योजना आता मार्च 2021 पर्यंत; मध्यमवर्गीयांसाठी मोठी बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 17:42 IST

Atmanirbhar Bharat Abhiyan: गृहनिर्माण उद्योगाला चालना मिळेल, मध्यमवर्गाला परवडणारी घरं मिळतील; अर्थमंत्र्यांना विश्वास

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत महत्त्वाच्या घोषणा करताना स्थलांतरित मजूर, लहान शेतकरी, शेतमजूर यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी गृहनिर्माण आणि मध्यम वर्गासाठीही मोठी घोषणा केली. मध्यमवर्गीयांना 'परवडणारी घरं' देणारी योजना मार्च 2021 पर्यंत राबवण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.मध्यमवर्गासाठी 6-18 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी साधी, परवडणारी घरं मिळण्यासाठी क्रेडिट लिंक सबसिडी योजना लागू करण्यात आली होती. ही योजना मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत 3.3 लाख परिवारांना याचा फायदा झाला आहे. मात्र आता ही योजना मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आल्यानं आणखी 2.5 लाख परिवारांना फायदा होईल. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळेल. गृहनिर्माण क्षेत्रातली कामं सुरू झाल्यानं लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि मध्यमवर्गाला स्वस्तात घरं मिळतील, असं सीतारामन म्हणाल्या. काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी महत्त्वाच्या घोषणा करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी आज स्थलांतरित मजूर, शेतकरी, फेरीवाल्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. देशातील 3 कोटी शेतकऱ्यांनी 4 लाख 22 हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तीन महिन्यांचा दिलासा देण्यात आला आहे. किसान क्रेडीट कार्डद्वारे 25 हजार कोटी रुपये उपलब्ध करण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले.  पुढील दोन महिने स्थलांतरित कामगारांना मोफत जेवण देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा कामगारांना 5 किलो तांदूळ, किलो चणा डाळ मोफत देण्यात येणार आहे. 8 कोटी कामगारांना याचा फायदा होईल. यासाठी 3500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामगारांना धान्य मिळेल याची जबाबदारी राज्यांनी घ्यायची आहे, असे सीतारामन म्हणाल्या. Atmanirbhar Bharat Abhiyan देशात कुठेही रेशनचे धान्य मिळणार; कामगारांना परवडणारी भाडेकरारावर घरे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन