शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

'हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही', भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर रामचंद्र गुहा यांची प्रतिक्रिया

By सागर सिरसाट | Updated: September 12, 2017 13:15 IST

गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्दे भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही असं ट्विट गुहा यांनी केलं आहे.'भारतात आता स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचा आवाज दडपण्याचं काम सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांची हत्या देखील केली जात आहे. पण आम्ही याच्यावर अजिबात शांत बसणार नाही.

मुंबई, दि. 12 - गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही असं ट्विट गुहा यांनी केलं आहे.

'भारतात आता स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचा आवाज दडपण्याचं काम सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांची हत्या देखील केली जात आहे. पण आम्ही याच्यावर अजिबात शांत बसणार नाही. एखाद्या पुस्तकात किंवा लेखामध्ये केलेल्या लिखाणाचं उत्तर केवळ लेखाणातुनच देता येतं असं वाजपेयी म्हणाले होते. मात्र, आता वाजपेयींचा भारत राहिलेला नाही असं गुहा यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी त्यांच्या हत्येनंतर सुरू झालेले वाद आणि आरोप- प्रत्यारोपाचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. लंकेश यांच्या हत्योमध्ये भाजपा आणि संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप रामचंद्र गुहा यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना केला होता. रामचंद्र गुहा यांच्या आरोपांमुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी ही नोटीस बजावली आहे. तसेच राहुल गांधी यांनीही आरोप पुराव्यासकट करावेत, असे भाजपाने म्हटले आहे.

लंकेश यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा.स्व. संघ आणि भाजपाविरोधात बोलणा-या प्रत्येकावर दबाव आणला जातो किंवा मारझोड केली जाते किंवा सरळ संपवलेही जाते असे वक्तव्य केले होते. यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व खासदार बी.एस. येडियुरप्पा यांनी जर आपले आरोप सिद्ध करणारे पुरावे राहुल यांच्याकडे असतील तर ते त्यांनी सरळ समोर मांडावेत असे आवाहन गांधी यांना केले आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर स्पष्ट शब्दांमध्ये ८ सप्टेंबर रोजी टीका केली होती. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या बंगळुरु येथिल राहत्या घरी मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर मारेकरी कोण असावेत यावर विविध तर्कवितर्क लढवले जात असून डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. लंकेश यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या हत्येचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणMurderखूनCrimeगुन्हा