शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही', भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर रामचंद्र गुहा यांची प्रतिक्रिया

By सागर सिरसाट | Updated: September 12, 2017 13:15 IST

गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्दे भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही असं ट्विट गुहा यांनी केलं आहे.'भारतात आता स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचा आवाज दडपण्याचं काम सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांची हत्या देखील केली जात आहे. पण आम्ही याच्यावर अजिबात शांत बसणार नाही.

मुंबई, दि. 12 - गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही असं ट्विट गुहा यांनी केलं आहे.

'भारतात आता स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचा आवाज दडपण्याचं काम सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांची हत्या देखील केली जात आहे. पण आम्ही याच्यावर अजिबात शांत बसणार नाही. एखाद्या पुस्तकात किंवा लेखामध्ये केलेल्या लिखाणाचं उत्तर केवळ लेखाणातुनच देता येतं असं वाजपेयी म्हणाले होते. मात्र, आता वाजपेयींचा भारत राहिलेला नाही असं गुहा यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी त्यांच्या हत्येनंतर सुरू झालेले वाद आणि आरोप- प्रत्यारोपाचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. लंकेश यांच्या हत्योमध्ये भाजपा आणि संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप रामचंद्र गुहा यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना केला होता. रामचंद्र गुहा यांच्या आरोपांमुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी ही नोटीस बजावली आहे. तसेच राहुल गांधी यांनीही आरोप पुराव्यासकट करावेत, असे भाजपाने म्हटले आहे.

लंकेश यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा.स्व. संघ आणि भाजपाविरोधात बोलणा-या प्रत्येकावर दबाव आणला जातो किंवा मारझोड केली जाते किंवा सरळ संपवलेही जाते असे वक्तव्य केले होते. यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व खासदार बी.एस. येडियुरप्पा यांनी जर आपले आरोप सिद्ध करणारे पुरावे राहुल यांच्याकडे असतील तर ते त्यांनी सरळ समोर मांडावेत असे आवाहन गांधी यांना केले आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर स्पष्ट शब्दांमध्ये ८ सप्टेंबर रोजी टीका केली होती. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या बंगळुरु येथिल राहत्या घरी मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर मारेकरी कोण असावेत यावर विविध तर्कवितर्क लढवले जात असून डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. लंकेश यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या हत्येचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणMurderखूनCrimeगुन्हा