शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

'हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही', भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर रामचंद्र गुहा यांची प्रतिक्रिया

By सागर सिरसाट | Updated: September 12, 2017 13:15 IST

गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्दे भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही असं ट्विट गुहा यांनी केलं आहे.'भारतात आता स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचा आवाज दडपण्याचं काम सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांची हत्या देखील केली जात आहे. पण आम्ही याच्यावर अजिबात शांत बसणार नाही.

मुंबई, दि. 12 - गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर हा अटल बिहारी वाजपेयींचा भारत नाही असं ट्विट गुहा यांनी केलं आहे.

'भारतात आता स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचा आवाज दडपण्याचं काम सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांची हत्या देखील केली जात आहे. पण आम्ही याच्यावर अजिबात शांत बसणार नाही. एखाद्या पुस्तकात किंवा लेखामध्ये केलेल्या लिखाणाचं उत्तर केवळ लेखाणातुनच देता येतं असं वाजपेयी म्हणाले होते. मात्र, आता वाजपेयींचा भारत राहिलेला नाही असं गुहा यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी त्यांच्या हत्येनंतर सुरू झालेले वाद आणि आरोप- प्रत्यारोपाचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. लंकेश यांच्या हत्योमध्ये भाजपा आणि संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप रामचंद्र गुहा यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना केला होता. रामचंद्र गुहा यांच्या आरोपांमुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी ही नोटीस बजावली आहे. तसेच राहुल गांधी यांनीही आरोप पुराव्यासकट करावेत, असे भाजपाने म्हटले आहे.

लंकेश यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा.स्व. संघ आणि भाजपाविरोधात बोलणा-या प्रत्येकावर दबाव आणला जातो किंवा मारझोड केली जाते किंवा सरळ संपवलेही जाते असे वक्तव्य केले होते. यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व खासदार बी.एस. येडियुरप्पा यांनी जर आपले आरोप सिद्ध करणारे पुरावे राहुल यांच्याकडे असतील तर ते त्यांनी सरळ समोर मांडावेत असे आवाहन गांधी यांना केले आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर स्पष्ट शब्दांमध्ये ८ सप्टेंबर रोजी टीका केली होती. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या बंगळुरु येथिल राहत्या घरी मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर मारेकरी कोण असावेत यावर विविध तर्कवितर्क लढवले जात असून डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. लंकेश यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या हत्येचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणMurderखूनCrimeगुन्हा