शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Atal Bihari Vajpayee: अटलजी... खंबीर बाण्याचे आदर्श नेते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 19:22 IST

कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते.

पत्रकार, प्रखर वक्ता, संवेदनशील कवी ते पंतप्रधान असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अटलबिहारी वाजपेयीजी यांनी जागतिक राजकारणावर अमीट ठसा उमटवला. वाजपेयी नावाच्या झंझावातासोबत विदेश दौरा करण्याचे भाग्य मला १९९९ मध्ये जी-१५ परिषदेच्या निमित्ताने लाभले. ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान त्रिनिदाद-टोबॅगो, जमैका, मोरोक्को या देशांच्या भेटीत मी त्यांच्यासोबत होतो. त्यांची उभी हयात आणि एकूण राजकीय कारकीर्द खरोखरच सर्वांसाठी आदर्श ठरावी. भारतीय जनसंघाचे खासदार ते विविध विरोधी पक्षांची खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मोट बांधणारे तीनवेळा पंतप्रधान हा प्रवास वाजपेयींनी स्वकर्तृत्वाने यशस्वी केला. त्यांनी शेवटपर्यंत संसदेत आपला दबदबा कायम ठेवला. 

विदेश दौऱ्यात वाजपेयीजी यांच्यातील अनेक पैलू  मला पाहता आले, प्रत्यक्ष अनुभवता आले. पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) येथे महात्मा गांधी सांस्कृतिक केंद्राची वाजपेयी यांनी पायाभरणी केली. महात्मा गांधींचा जन्म भारतात झाला असला तरी ते साऱ्या जगाचे होते आणि वसुधैव कुटुंबकम या वैदिक स्वप्नांचे साक्षात रूप बनले होते, अशी भावना वाजपेयीजी यांनी व्यक्त केली होती. भारतात त्यावेळी ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमके पोर्ट आॅफ स्पेनचे व्यासपीठ त्यांनी निवडले होते. कारण भारताप्रमाणे त्रिनिदाद हाही एक बहुधार्मिक देश आहे. त्यावेळी त्रिनिदाद व टोबॅगोची निम्मी लोकसंख्या भारतीय वंशाची होती आणि वासुदेव पांडे हे त्या देशाचे पंतप्रधान होते. यावेळी अटलजींमधील ठाम नेतृत्वाची झलक बघावयास मिळाली.

त्रिनिदादला पोहोचण्यासाठी तब्बल २० तासांची रात्र आणि १५ हजार कि.मी.चा प्रवास आम्ही अनुभवला. दिल्लीहून एअर इंडियाचे विशेष विमान आकाशात झेपावले तेव्हा रात्रीचे ९ वाजले होते. मध्ये इंधन घेण्यासाठी पोर्तुगालची राजधानी लिसबान येथे काही काळासाठी विमान उतरले होते. त्यानंतर त्रिनिदादला पोहोचेपर्यंत  अशी एकूण २० तासांची रात्र आम्ही पहिल्यांदाच अनुभवली. 

अटलजींच्या या दौऱ्यात भारतातील आम्ही एकूण १३ पत्रकार होतो. विमानात अटलजींनी मला भेटायला बोलावले. मी मराठी वृत्तपत्र लोकमतचा मुख्य संपादक अशी ओळख करताच अटलजी म्हणाले, दर्डाजी मुझे लोकमत के बारे मे मालूम है. वैसे आपके अखबार के विचार और हमारे विचार अलग है. लेकिन आपका अखबार अच्छा काम कर रहा है. आपल्या विचारांशी ज्याची नाळ जुळत नाही, त्यांचाही कसा आदर सन्मान करावा, हा उदारवाद मला अटलजींमध्ये बघावयास मिळाला.

इकडे आम्ही विदेशात असताना मागे देशात राजकीय घटनाक्रम वेगाने वेगवेगळे वळण घेत आहे, त्याचा अंत केंद्रातील सरकार पडण्यानेही होऊ शकतो, याचा किंचितही तणाव वाजपेयींच्या चेहऱ्यावर कधीही जाणवला नाही किंवा विचलित दिसले नाहीत. सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा देणारे ओमप्रकाश चौटाला यांना दूरध्वनी करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यास त्यांनी याच दौऱ्यात संमती दिली होती. या दौऱ्यावरून परतल्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी १६ एप्रिल १९९९ रोजी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने कोसळले. त्या एका मताची खंत आजही सर्वांच्या स्मरणात आहे. 

दांव पर सब कुछ लगा है, रुक नही सकते टूट सकते है मगर हम झुक नही सकते असे सांगणारे कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर संसदेत भाषण करताना एक पाऊल पुढे टाकून त्यांनी इंदिराजींना दुर्गा संबोधले होते. भारतीय जनता पार्टीतील एक उदारमतवादी नेता, पक्ष व धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. खंबीर बाण्याच्या या आदर्श नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली !

- राजेंद्र दर्डाएडिटर इन चीफ, लोकमत समूह

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRajendra Dardaराजेंद्र दर्डाLokmatलोकमतprime ministerपंतप्रधान