शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

Atal Bihari Vajpayee: अटलजी... खंबीर बाण्याचे आदर्श नेते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 19:22 IST

कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते.

पत्रकार, प्रखर वक्ता, संवेदनशील कवी ते पंतप्रधान असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अटलबिहारी वाजपेयीजी यांनी जागतिक राजकारणावर अमीट ठसा उमटवला. वाजपेयी नावाच्या झंझावातासोबत विदेश दौरा करण्याचे भाग्य मला १९९९ मध्ये जी-१५ परिषदेच्या निमित्ताने लाभले. ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान त्रिनिदाद-टोबॅगो, जमैका, मोरोक्को या देशांच्या भेटीत मी त्यांच्यासोबत होतो. त्यांची उभी हयात आणि एकूण राजकीय कारकीर्द खरोखरच सर्वांसाठी आदर्श ठरावी. भारतीय जनसंघाचे खासदार ते विविध विरोधी पक्षांची खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मोट बांधणारे तीनवेळा पंतप्रधान हा प्रवास वाजपेयींनी स्वकर्तृत्वाने यशस्वी केला. त्यांनी शेवटपर्यंत संसदेत आपला दबदबा कायम ठेवला. 

विदेश दौऱ्यात वाजपेयीजी यांच्यातील अनेक पैलू  मला पाहता आले, प्रत्यक्ष अनुभवता आले. पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) येथे महात्मा गांधी सांस्कृतिक केंद्राची वाजपेयी यांनी पायाभरणी केली. महात्मा गांधींचा जन्म भारतात झाला असला तरी ते साऱ्या जगाचे होते आणि वसुधैव कुटुंबकम या वैदिक स्वप्नांचे साक्षात रूप बनले होते, अशी भावना वाजपेयीजी यांनी व्यक्त केली होती. भारतात त्यावेळी ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमके पोर्ट आॅफ स्पेनचे व्यासपीठ त्यांनी निवडले होते. कारण भारताप्रमाणे त्रिनिदाद हाही एक बहुधार्मिक देश आहे. त्यावेळी त्रिनिदाद व टोबॅगोची निम्मी लोकसंख्या भारतीय वंशाची होती आणि वासुदेव पांडे हे त्या देशाचे पंतप्रधान होते. यावेळी अटलजींमधील ठाम नेतृत्वाची झलक बघावयास मिळाली.

त्रिनिदादला पोहोचण्यासाठी तब्बल २० तासांची रात्र आणि १५ हजार कि.मी.चा प्रवास आम्ही अनुभवला. दिल्लीहून एअर इंडियाचे विशेष विमान आकाशात झेपावले तेव्हा रात्रीचे ९ वाजले होते. मध्ये इंधन घेण्यासाठी पोर्तुगालची राजधानी लिसबान येथे काही काळासाठी विमान उतरले होते. त्यानंतर त्रिनिदादला पोहोचेपर्यंत  अशी एकूण २० तासांची रात्र आम्ही पहिल्यांदाच अनुभवली. 

अटलजींच्या या दौऱ्यात भारतातील आम्ही एकूण १३ पत्रकार होतो. विमानात अटलजींनी मला भेटायला बोलावले. मी मराठी वृत्तपत्र लोकमतचा मुख्य संपादक अशी ओळख करताच अटलजी म्हणाले, दर्डाजी मुझे लोकमत के बारे मे मालूम है. वैसे आपके अखबार के विचार और हमारे विचार अलग है. लेकिन आपका अखबार अच्छा काम कर रहा है. आपल्या विचारांशी ज्याची नाळ जुळत नाही, त्यांचाही कसा आदर सन्मान करावा, हा उदारवाद मला अटलजींमध्ये बघावयास मिळाला.

इकडे आम्ही विदेशात असताना मागे देशात राजकीय घटनाक्रम वेगाने वेगवेगळे वळण घेत आहे, त्याचा अंत केंद्रातील सरकार पडण्यानेही होऊ शकतो, याचा किंचितही तणाव वाजपेयींच्या चेहऱ्यावर कधीही जाणवला नाही किंवा विचलित दिसले नाहीत. सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा देणारे ओमप्रकाश चौटाला यांना दूरध्वनी करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यास त्यांनी याच दौऱ्यात संमती दिली होती. या दौऱ्यावरून परतल्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी १६ एप्रिल १९९९ रोजी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने कोसळले. त्या एका मताची खंत आजही सर्वांच्या स्मरणात आहे. 

दांव पर सब कुछ लगा है, रुक नही सकते टूट सकते है मगर हम झुक नही सकते असे सांगणारे कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर संसदेत भाषण करताना एक पाऊल पुढे टाकून त्यांनी इंदिराजींना दुर्गा संबोधले होते. भारतीय जनता पार्टीतील एक उदारमतवादी नेता, पक्ष व धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. खंबीर बाण्याच्या या आदर्श नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली !

- राजेंद्र दर्डाएडिटर इन चीफ, लोकमत समूह

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRajendra Dardaराजेंद्र दर्डाLokmatलोकमतprime ministerपंतप्रधान