शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : ...म्हणून त्यांनी इस्टेट बनवली नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 04:57 IST

राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते.

राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते. चार दशके राजकारणात राहूनही त्यांनी इस्टेट बनवली नाही. जमीन तर सोडा, त्यांचं स्वत:च घरही उरलेले नव्हतं. ग्वाल्हेरमधले वडिलोपार्जित घर त्यांनी फार पूर्वीच देऊन टाकलं. तिथे वाचनालय आहे.सत्तेचा त्यानी स्वत:साठी तर उपयोग केलाच नाही. पण आपल्या कुटुंबियांनाही त्या मोहापासून दूर ठेवले. ‘अपने दम पे खडे रहो. नही तो भांग पीकर पडे रहो’ असे त्यांचं घरच्यांना सांगणं असे. आग्रा येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे गॅस नव्हता. खासदारांना गॅस कनेक्शनचा कोटा असतो. पण त्या कोट्यातून अटलजींनी तिला गॅस दिला नाही आणि बहिणीनेही मागितला नाही. आता बोला! राजकीय जीवनात वावरताना अटलजींनी किती संयम राखला असेल याची कल्पना या लहानशा उदाहरणावरून यावी. ते म्हणतही. मी कशाला भीत नाही. भीतो तर बदनामीला.उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे अटलबिहारी यांचे मूळ गाव. बटेश्वरमध्ये प्राचीन काळी कान्यकुब्ज ब्राह्मणांपैकी कुणी वाजपेय यज्ञ केला . तेव्हापासून त्या परिवारात ‘वाजपेयी’ हे आडनाव पडलं असे मानलं जातं. पणजोबा, आजोबा, वडील... संस्कृतचे सारे विद्वान होते. साहित्यप्रेमी होते. बटेश्वरहून हे कुटुंब ग्वाल्हेरला आलं. अटलबिहारी यांचे वडील कृष्णबिहारी. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर संस्थानात ते राजमान्यकवी होते. व्यवसायाने शिक्षक होते. घरी श्रीमंती नसली तरी खाऊनपिऊन सुखी घर होतं. अटलबिहारींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. अवधबिहारी, सदाबहारी आणि प्रेमबिहारी. अटलबिहारी हे या तिघांच्या पाठीवर जन्माला आले. अटलबिहारी शाळेत हुशार होते. पण खोडकर होते. त्यासाठी त्यांनी वडिलांच्या हातचा मारही खाल्ला. घरचे लाडके. त्यांची आई त्यांना लाडाने ‘अटल्ला’ म्हणायची. आईच्या हातचे पदार्थ त्यांना खूप आवडायचे. मूगडाळीचे लाडू, बाजरीची शिळी भाकरी, दालबाटी... ग्वाल्हेरमधल्या एका ठिकाणचा समोसा, कचोरी त्यांना खूप आवडायची. ग्वाल्हेर तर जीव की प्राण. कुटुंबवत्सल होते. घरी गेले की, राजकारण विसरून जात. घरात कुणाचं लग्न, मुंज असो, हजर रहायचे. त्यांनी लग्न केले नाही. पण भावाबहिणींची मिळून दीडशे माणसं आहेत. इतर मुलांप्रमाणे अटलबिहारी यांनीही लग्न करावे, संसार थाटावा अशी त्यांच्या आईवडिलांची खूप इच्छा होती. आईनं तर अनेक वेळा रडून त्यांना राजी करू पाहिलं. पण अटलजी बधले नाहीत. पूर्ण वेळ संघाचं काम करण्यासाठी ते बाहेर पडले होते. त्यामुळे लग्नाचा विचार त्यांनी मनातून काढून टाकलाहोता.गर्दीत राहूनही एकटे ! साठच्या दशकापासून वाजपेयींनी कौल कुटुंबाला आणि त्या कुटुंबाने वाजपेयींना आपलं मानले. जणू अटलजींचं ‘दत्तक’ कुटुंब ! नमिता भट्टाचार्य ही मानलेली मुलगी दिल्लीतल्याच एका शाळेत शिक्षिका आहे. दत्तक नात नेहा ही त्यांची अतिशय लाडकी. लग्न न करताही कुटुंबवत्सल, सतत माणसांच्या गर्दीत राहूनही एकटे वाजपेयी, गेलेही एकटे एकटे....त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे -‘क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैंसंघर्ष पथ पर जो भी मिला, वो भी सही ये भी सही’

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधान