शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

Atal Bihari Vajpayee : ...म्हणून त्यांनी इस्टेट बनवली नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 04:57 IST

राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते.

राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते. चार दशके राजकारणात राहूनही त्यांनी इस्टेट बनवली नाही. जमीन तर सोडा, त्यांचं स्वत:च घरही उरलेले नव्हतं. ग्वाल्हेरमधले वडिलोपार्जित घर त्यांनी फार पूर्वीच देऊन टाकलं. तिथे वाचनालय आहे.सत्तेचा त्यानी स्वत:साठी तर उपयोग केलाच नाही. पण आपल्या कुटुंबियांनाही त्या मोहापासून दूर ठेवले. ‘अपने दम पे खडे रहो. नही तो भांग पीकर पडे रहो’ असे त्यांचं घरच्यांना सांगणं असे. आग्रा येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे गॅस नव्हता. खासदारांना गॅस कनेक्शनचा कोटा असतो. पण त्या कोट्यातून अटलजींनी तिला गॅस दिला नाही आणि बहिणीनेही मागितला नाही. आता बोला! राजकीय जीवनात वावरताना अटलजींनी किती संयम राखला असेल याची कल्पना या लहानशा उदाहरणावरून यावी. ते म्हणतही. मी कशाला भीत नाही. भीतो तर बदनामीला.उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे अटलबिहारी यांचे मूळ गाव. बटेश्वरमध्ये प्राचीन काळी कान्यकुब्ज ब्राह्मणांपैकी कुणी वाजपेय यज्ञ केला . तेव्हापासून त्या परिवारात ‘वाजपेयी’ हे आडनाव पडलं असे मानलं जातं. पणजोबा, आजोबा, वडील... संस्कृतचे सारे विद्वान होते. साहित्यप्रेमी होते. बटेश्वरहून हे कुटुंब ग्वाल्हेरला आलं. अटलबिहारी यांचे वडील कृष्णबिहारी. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर संस्थानात ते राजमान्यकवी होते. व्यवसायाने शिक्षक होते. घरी श्रीमंती नसली तरी खाऊनपिऊन सुखी घर होतं. अटलबिहारींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. अवधबिहारी, सदाबहारी आणि प्रेमबिहारी. अटलबिहारी हे या तिघांच्या पाठीवर जन्माला आले. अटलबिहारी शाळेत हुशार होते. पण खोडकर होते. त्यासाठी त्यांनी वडिलांच्या हातचा मारही खाल्ला. घरचे लाडके. त्यांची आई त्यांना लाडाने ‘अटल्ला’ म्हणायची. आईच्या हातचे पदार्थ त्यांना खूप आवडायचे. मूगडाळीचे लाडू, बाजरीची शिळी भाकरी, दालबाटी... ग्वाल्हेरमधल्या एका ठिकाणचा समोसा, कचोरी त्यांना खूप आवडायची. ग्वाल्हेर तर जीव की प्राण. कुटुंबवत्सल होते. घरी गेले की, राजकारण विसरून जात. घरात कुणाचं लग्न, मुंज असो, हजर रहायचे. त्यांनी लग्न केले नाही. पण भावाबहिणींची मिळून दीडशे माणसं आहेत. इतर मुलांप्रमाणे अटलबिहारी यांनीही लग्न करावे, संसार थाटावा अशी त्यांच्या आईवडिलांची खूप इच्छा होती. आईनं तर अनेक वेळा रडून त्यांना राजी करू पाहिलं. पण अटलजी बधले नाहीत. पूर्ण वेळ संघाचं काम करण्यासाठी ते बाहेर पडले होते. त्यामुळे लग्नाचा विचार त्यांनी मनातून काढून टाकलाहोता.गर्दीत राहूनही एकटे ! साठच्या दशकापासून वाजपेयींनी कौल कुटुंबाला आणि त्या कुटुंबाने वाजपेयींना आपलं मानले. जणू अटलजींचं ‘दत्तक’ कुटुंब ! नमिता भट्टाचार्य ही मानलेली मुलगी दिल्लीतल्याच एका शाळेत शिक्षिका आहे. दत्तक नात नेहा ही त्यांची अतिशय लाडकी. लग्न न करताही कुटुंबवत्सल, सतत माणसांच्या गर्दीत राहूनही एकटे वाजपेयी, गेलेही एकटे एकटे....त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे -‘क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैंसंघर्ष पथ पर जो भी मिला, वो भी सही ये भी सही’

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधान