शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

Atal Bihari Vajpayee : इंदिरा गांधींना दिली होती दुर्गेची उपमा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 05:03 IST

अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लोकसभेत दुर्गेची उपमा दिली होती. इंदिरा गांधी यांचा विषय येताच या वक्तव्याची आठवण काढली जाते.

इंदिरा गांधी यांनी १९७१ युद्धात अतुलनीय राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा दाखविला होता. या युद्धात पाकिस्तानची धूळधाण झाली. पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे हे यश इतके अद्वितीय होते की, अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना लोकभेत ‘दुर्गा’ म्हटले. त्यांचे हे भाषण तेव्हाच्या वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाले होते. वाजपेयी यांच्या या उमदेपणाची देशात सातत्याने चर्चा होत आली आहे. त्याकाळी संसदेतील कामकाजाच्या रेकॉर्डिंगची व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य रेकॉर्ड होऊ शकले नाही. ९० च्या दशकात राजकारणाची दिशा बदलल्यानंतर वाजपेयी यांच्या या वक्तव्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले. वाजपेयी खरोखर असे बोलले होते का, याबाबत संभ्रम निर्माण झाला.जाणकारांच्या मते, वाजपेयी यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसला फायदा होत आहे, अशी धारणा भाजपमध्ये निर्माण झाली. भाजप सत्तेच्या जवळ आल्यानंतर वाजपेयी यांचे हे वक्तव्य भाजपला अधिक जाचक वाटू लागले. काँग्रेसमधूनही या वक्तव्याचा लाभ उठविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे वाजपेयींनी इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा दिलीच नव्हती, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली. वाजपेयी यांचे सर्वाधिक निकटचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांनी ‘मेरा देश, मेरा जीवन’ या आपल्या आत्मचरित्रात या वक्तव्याचे खंडन केले आहे. इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा वाजपेयी यांनी नव्हे, तर अन्य एका सदस्याने दिली होती, असे अडवाणी यांनी या पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकाला स्वत: वाजपेयी यांनीच प्रस्तावना लिहिली आहे. स्वत: वाजपेयी यांनीही एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ‘दुर्गा’ वक्तव्याचा इन्कार केला होता. त्यांनी वाहिनीला सांगितले होते की, १९७१ च्या युद्धातील विजयाबद्दल मी इंदिरा गांधी यांची प्रशंसा केली होती. तथापि, त्यांना दुर्गेची उपमा दिली नव्हती; पण दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत मी त्यांना दुर्गा म्हटल्याचे छापून आले! हे कसे घडले मला माहिती नाही!!वाजपेयी यांचे वक्तव्य खंडन-मंडनात अडकले असले, तरी ते त्यांना कायमचे चिकटले आहे. इंदिरा गांधी यांचा विषय येताच या वक्तव्याची आठवण काढली जाते. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीIndira Gandhiइंदिरा गांधी