शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : इंदिरा गांधींना दिली होती दुर्गेची उपमा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 05:03 IST

अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लोकसभेत दुर्गेची उपमा दिली होती. इंदिरा गांधी यांचा विषय येताच या वक्तव्याची आठवण काढली जाते.

इंदिरा गांधी यांनी १९७१ युद्धात अतुलनीय राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा दाखविला होता. या युद्धात पाकिस्तानची धूळधाण झाली. पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे हे यश इतके अद्वितीय होते की, अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना लोकभेत ‘दुर्गा’ म्हटले. त्यांचे हे भाषण तेव्हाच्या वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाले होते. वाजपेयी यांच्या या उमदेपणाची देशात सातत्याने चर्चा होत आली आहे. त्याकाळी संसदेतील कामकाजाच्या रेकॉर्डिंगची व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य रेकॉर्ड होऊ शकले नाही. ९० च्या दशकात राजकारणाची दिशा बदलल्यानंतर वाजपेयी यांच्या या वक्तव्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले. वाजपेयी खरोखर असे बोलले होते का, याबाबत संभ्रम निर्माण झाला.जाणकारांच्या मते, वाजपेयी यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसला फायदा होत आहे, अशी धारणा भाजपमध्ये निर्माण झाली. भाजप सत्तेच्या जवळ आल्यानंतर वाजपेयी यांचे हे वक्तव्य भाजपला अधिक जाचक वाटू लागले. काँग्रेसमधूनही या वक्तव्याचा लाभ उठविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे वाजपेयींनी इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा दिलीच नव्हती, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली. वाजपेयी यांचे सर्वाधिक निकटचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांनी ‘मेरा देश, मेरा जीवन’ या आपल्या आत्मचरित्रात या वक्तव्याचे खंडन केले आहे. इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा वाजपेयी यांनी नव्हे, तर अन्य एका सदस्याने दिली होती, असे अडवाणी यांनी या पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकाला स्वत: वाजपेयी यांनीच प्रस्तावना लिहिली आहे. स्वत: वाजपेयी यांनीही एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ‘दुर्गा’ वक्तव्याचा इन्कार केला होता. त्यांनी वाहिनीला सांगितले होते की, १९७१ च्या युद्धातील विजयाबद्दल मी इंदिरा गांधी यांची प्रशंसा केली होती. तथापि, त्यांना दुर्गेची उपमा दिली नव्हती; पण दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत मी त्यांना दुर्गा म्हटल्याचे छापून आले! हे कसे घडले मला माहिती नाही!!वाजपेयी यांचे वक्तव्य खंडन-मंडनात अडकले असले, तरी ते त्यांना कायमचे चिकटले आहे. इंदिरा गांधी यांचा विषय येताच या वक्तव्याची आठवण काढली जाते. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीIndira Gandhiइंदिरा गांधी