शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

Atal Bihari Vajpayee Death: मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर असलेले अटलजी

By बाळकृष्ण परब | Updated: August 16, 2018 20:26 IST

Atal Bihari Vajpayee Death: धुरंधर राजकारणी, पत्रकार, लेखक, कवी आणि फर्डे वक्ते अशा बहुआयामी व्यक्तीत्वाचे धनी असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासीयत म्हणजे त्यांचा साधेपणा.

धुरंधर राजकारणी, पत्रकार, लेखक, कवी आणि फर्डे वक्ते अशा बहुआयामी व्यक्तीत्वाचे धनी असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासीयत म्हणजे त्यांचा साधेपणा. जनसंघाचा सर्वसामान्य कार्यकर्ता, भाजपाच्या संस्थापकांपैकी एक ते भारताचा पंतप्रधान अशा दीर्घ प्रवासात वाजपेयींच्या स्वभावात बदल झाला नाही. पण एरवी मेणाहून मऊ वाटणाऱ्या अटलजींनी वेळप्रसंगी वज्राहून कठोर स्वभावाचे दर्शन घडवले होते.संघ, जनसंघ आणि भाजपाच्या राजकारणाचा उदारमतवादी चेहरा म्हणून वाजपेयींकडे नेहमी पाहिले गेले. एकीकडे आपल्या मातृसंस्थांचे उग्र हिंदुत्व आणि दुसरीकडे आपले मृदू व्यक्तीत्व यांचा उत्तम मिलाफ अटलजींनी स्वतःच्या स्वभावात साधला होता. वाजपेयी हे भाजपाचे नेते आणि  कार्यकर्त्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले. त्यांचे नेतृत्व पक्ष आणि कार्यकर्त्यांना वटवृक्षाच्या छायेप्रमाणे वाटे. मात्र याच वाजपेयींनी वेळप्रसंगी आपल्या पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावण्यास मागेपुढे पाहिले नव्हते. 1990 च्या सुमारास अडवाणींची रथयात्रा ऐन भारात असताना "तुम्ही रामाच्या अयोध्येस जात आहात, रावणाच्या लंकेला नाही," असे  वाजपेयीनी सुनावले होते. पुढे 2002 साली गुजरात दंगलीमुळे पक्ष आणि सरकारची नाचक्की झाली असताना वाजपेयींनी आताचे पंतप्रधान आणि तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला सर्वासमक्ष दिला होता.

1959 साली प्रथमच संसदेत निवडून गेलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या वक्तृत्वाची छाप संसदेत पाडली होती. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानाही अटलजींनी सरकारच्या धोरणांबाबत संसदेत रोखठोक मते मांडली होती. तेव्हा त्यांच्या वक्तृत्वावर खुद्द नेहरूही प्रभावीत झाले होते. 1971 च्या युद्धात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचा पाडाव केल्यावर अटलजींनी इंदिराजींना दुर्गेची उपमा दिली. मात्र याच इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्यावर त्या निर्णयाला कडाडून विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये अटलबिहारी वाजपेयी आघाडीवर होते. त्यावेळी अटलजींनी इंदिरा गांधींवर कठोर शब्दात टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही.त्याकाळी भाजपाचे राजकारण आणि विचारसरणी हे टीकेचा विषय ठरत असत. कधीकधी लोकसभेत मिळालेल्या दोन जागांवरून खिल्ली उडवली जाई. मग या सर्वाला वाजपेयी आपल्या शैलीत उत्तर देत. 1996 आणि 1998 साली त्यांच्या सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावेळी त्यांनी केलेल्या भाषणांचे उदाहरण दिले जाते. "सत्ता का खेल चलता रहेगा!सरकारे आएंगी जाएंगी!पार्टीयां बनेंगी बिगडेंगी!पर ये देश रहना चाहिए!इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहीए!" या त्यांच्या उद्गारांचे उदाहरण आजही दिले जाते.त्यावेळी वाजपेयींचे सरकार पडले. पण त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अटलजींनी आपल्या पक्षाला विजय मिळवून दिला.केवळ पक्षीय राजकारणातच नाही तर पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजपेयींनी आपल्या कणखरतेचे दर्शन घडवले होते. 1998 साली भारताने केलेली अणुचाचणी हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणावे लागेल. त्याकाळी वाजपेयींनी दाखवलेल्या दृढनिश्चयामुळेच  अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारत अण्वस्त्रसज्ज बनला. एवढंच नाहीतर अण्वस्त्र चाचणीनंतर लादण्यात आलेल्या निर्बंधातून मार्ग काढणे वाजपेयींच्या धोरणामुळेच शक्य झाले होते.आपला शेजारी आणि पक्का वैरी असलेल्या पाकिस्तानबाबतच्या वाजपेयींच्या धोरणामध्ये या दोन्ही पैलूंचा अंतर्भाव आढळतो. 1999 साली पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करून वाजपेयी स्वतः लाहोरला गेले. पण त्यांची पावले दिल्लीला माघारी फिरण्यापूर्वीच कारगीलमध्ये घुसखोरी करून पाकिस्तानने भारताला मैत्रीचे रिटर्न गिफ्ट दिले. मग अटलजींनी कणखर बाणा दाखवत कारगीलच्या रणभूमीवर पाकिस्तानला धूळ चारली. या युद्धात केवळ रणभूमीवरच नाही तर मुत्सद्देगिरीमध्येही पाकिस्तानला चीत केले. कारगीलचा संघर्ष पेटलेला असताना अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव देत वाजपेयींना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले. तेव्हा वाजपेयींनी बाणेदारपणे अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावला. कारगिलमध्ये भारताचा विजय झाला. व्यक्तिमत्त्वात साधेपणा असला तरी हा साधेपणा आपला दुबळेपणा बनणार नाही याची खबरदारी वाजपेयींनी राजकारणात सक्रिय असेपर्यंत घेतली.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी