शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

किमान हमी भावाला कायद्याची हमी सरकार देऊ शकते, वरुण गांधींनी मांडलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 06:10 IST

Varun Gandhi: नोटाबंदीचा उद्देश सफल झाला नाही व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. मी मुदत ठेव मोडून कोरोनाकाळात लोकांची मदत केली. तरुण, शेतकरी, छोटे व्यापारी आणि कष्टकऱ्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे मत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी व्यक्त केले

 नवी दिल्ली : नोटाबंदीचा उद्देश सफल झाला नाही व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. मी मुदत ठेव मोडून कोरोनाकाळात लोकांची मदत केली. तरुण, शेतकरी, छोटे व्यापारी आणि कष्टकऱ्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे मत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी व्यक्त केले. वरूण गांधी यांची राजकारण आणि राजकीय भविष्याबद्दल वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत.प्रश्न : तुम्ही बेरोजगारी, उसाला भाव यासारख्या विषयांवर आपल्याच सरकारवर विरोधकांसारखी टीका करता.उत्तर : बेरोजगारी हा आज देशातील महाप्रचंड प्रश्न आहे. त्यावर बोलले तर ती टीका समजली जाऊ नये.  प्रश्न : तुमचे पक्षाशी काही मतभेद आहेत का? तुम्ही आणि मनेका गांधी यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांमध्ये घेतले गेले नाही.उत्तर : राष्ट्रहित आणि जनहित माझ्यासाठी सर्वोच्च आहे. मी कधी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप केले नाहीत. स्टार प्रचारक तर लोक बनवतात. प्रश्न : तुम्ही कृषी कायद्यांना विरोधाबाबत बरेच स्पष्ट आहात. हा विरोध मूल्यांचा होता की वैयक्तिक हितासाठी? उत्तर : आधीच संकटातून जात असलेल्या शेतकऱ्यांसाठी तीन कृषी कायदे अत्याचार सिद्ध झाले असते. शेतकऱ्यांची बाजू घेणे हे माझे कर्तव्य होते. जर त्यांचे आंदोलन चूक होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे कधी परत घेतले नसते. प्रश्न : किमान हमीभावाची (एमएसपी) कायदेशीर हमी देणे सरकारला आर्थिकदृष्ट्या शक्य आहे? उत्तर : पिकांना लाभकारी भाव हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. मी केलेल्या अभ्यासानुसार हे सांगू शकतो की, सरकार कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा न उचलता हे करू शकते.

प्रश्न : येत्या दोन वर्षांत तुम्हाला देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जाताना दिसते? उत्तर : येत्या काळात देशाची दिशा आणि राजकीय दशा या देशाचा तरुण, शेतकरी, लहान व्यापारी आणि मजूर ठरवतील. प्रदीर्घ काळापर्यंत या वर्गांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

प्रश्न : सध्याच्या राजकारणात तुम्ही स्वत:ला कोठे बघता? उत्तर : मी राजकारणात स्वत:साठी एक आचारसंहिता लागू केलेली आहे. गेल्या १३ वर्षांपासून माझे खासदाराचे पूर्ण वेतन ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या करणे भाग पडले त्यांच्या कुटुंबाच्या कामाला आली.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीPoliticsराजकारणBJPभाजपा