शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

दररोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होतं 'हे' शहर; कारण वाचून वाटेल अभिमान, तुम्हीही कराल सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 11:47 IST

देशभक्तीने या शहरातील लोकांची सुरुवात होते. 23 जानेवारी 2021 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि हळूहळू एक ट्रेंड सेट होऊ लागला. 

नवी दिल्ली - तेलंगणात एक असं शहर आहे जिथे लोक दररोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होतात. यामागचं खरं कारण समजल्यावर तुम्हालाही अभिमान वाटेल. देशभक्तीने या शहरातील लोकांची सुरुवात होते. रोज सकाळी 8.30 वाजता नलगोंडातील बारा प्रमुख ठिकाणी राष्ट्रगीत वाजतं आणि तिथले सर्वच लोक त्याच्या सन्मानार्थ उभे राहतात. नलगोंडा येथील जन गण मन उत्सव समितीने हा उपक्रम हाती घेतला आहे. 23 जानेवारी 2021 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि हळूहळू एक ट्रेंड सेट होऊ लागला. 

जन गण मन उत्सव समितीचे अध्यक्ष कर्णती विजय कुमार आणि त्यांच्या मित्रांची हा ट्रेंड सेट करण्यामागे कल्पना आहे. या समितीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक शहरात जर अशाप्रकारे रोज राष्ट्रगीत म्हणण्यात आलं तर अशाने लोकांच्या मनातील राष्ट्रभक्तीच्या भावनेला प्रोत्साहन मिळेल. गेल्या वर्षीपासून बरोबर 8.30 वाजता ठीक 52 सेकंदांसाठी सर्व नागरिक राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहतात. नलगोंडा येथे 12 प्रमुख ठिकाणी लाउडस्पीकरवर राष्ट्रगीत लावण्यात येतं.

2020 मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार होता. परंतु निवडणूक आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या दोन कारणांमुळे हा उपक्रम पुढं ढकलण्यात आला. हळूहळू नलगोंडाच्या आजूबाजूच्या गावांमध्येही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात तिप्परथ्थी (tipparthi) या नलगोंडाजवळील गावातही हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं समितीने सांगितलं. त्यानंतर शहराजवळील अजून काही गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरातील लोकांना 8.30 वाजता राष्ट्रगीत वाजण्याची सवयच झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Telanganaतेलंगणा