शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दररोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होतं 'हे' शहर; कारण वाचून वाटेल अभिमान, तुम्हीही कराल सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 11:47 IST

देशभक्तीने या शहरातील लोकांची सुरुवात होते. 23 जानेवारी 2021 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि हळूहळू एक ट्रेंड सेट होऊ लागला. 

नवी दिल्ली - तेलंगणात एक असं शहर आहे जिथे लोक दररोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होतात. यामागचं खरं कारण समजल्यावर तुम्हालाही अभिमान वाटेल. देशभक्तीने या शहरातील लोकांची सुरुवात होते. रोज सकाळी 8.30 वाजता नलगोंडातील बारा प्रमुख ठिकाणी राष्ट्रगीत वाजतं आणि तिथले सर्वच लोक त्याच्या सन्मानार्थ उभे राहतात. नलगोंडा येथील जन गण मन उत्सव समितीने हा उपक्रम हाती घेतला आहे. 23 जानेवारी 2021 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि हळूहळू एक ट्रेंड सेट होऊ लागला. 

जन गण मन उत्सव समितीचे अध्यक्ष कर्णती विजय कुमार आणि त्यांच्या मित्रांची हा ट्रेंड सेट करण्यामागे कल्पना आहे. या समितीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक शहरात जर अशाप्रकारे रोज राष्ट्रगीत म्हणण्यात आलं तर अशाने लोकांच्या मनातील राष्ट्रभक्तीच्या भावनेला प्रोत्साहन मिळेल. गेल्या वर्षीपासून बरोबर 8.30 वाजता ठीक 52 सेकंदांसाठी सर्व नागरिक राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहतात. नलगोंडा येथे 12 प्रमुख ठिकाणी लाउडस्पीकरवर राष्ट्रगीत लावण्यात येतं.

2020 मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार होता. परंतु निवडणूक आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या दोन कारणांमुळे हा उपक्रम पुढं ढकलण्यात आला. हळूहळू नलगोंडाच्या आजूबाजूच्या गावांमध्येही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात तिप्परथ्थी (tipparthi) या नलगोंडाजवळील गावातही हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं समितीने सांगितलं. त्यानंतर शहराजवळील अजून काही गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरातील लोकांना 8.30 वाजता राष्ट्रगीत वाजण्याची सवयच झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Telanganaतेलंगणा