शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Assembly Election 2022: ज्येष्ठ नेत्यांना मोदींची वेळ मिळेना, स्पष्ट संदेश कळेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 11:59 IST

Assembly Election 2022: उत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते मागील चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागत आहेत. परंतु, आतापर्यंत त्यांच्यावर कृपा झालेली नाही. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या सुमारे ३०० उमेदवारांपैकी केवळ सहाजणांना त्यांच्या शिफारशीने तिकिटे देण्यात आली आहेत.

-   शरद गुप्ता 

वेळ मिळत नाहीउत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते मागील चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागत आहेत. परंतु, आतापर्यंत त्यांच्यावर कृपा झालेली नाही. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या सुमारे ३०० उमेदवारांपैकी केवळ सहाजणांना त्यांच्या शिफारशीने तिकिटे देण्यात आली आहेत. यात ते पंतप्रधानांचा हस्तक्षेप मागत आहेत. परंतु, पंतप्रधान त्यांना भेटीची वेळ न देऊन त्यांना कोणता संदेश देऊ इच्छित आहेत, ही एवढी साधी बाब त्यांच्या लक्षात येत नाही.  

हार-जीतचा मंत्रउत्तराखंडच्या रानीखेतमधून कोणताही पक्ष निवडणूक जिंकू इच्छित नाही. कारण जो पक्ष येथे जिंकला त्याचे सरकार राज्यात बनू शकलेले नाही. २००२ मध्ये व २०१२ मध्ये येथे भाजप विजयी झाला, तर सरकार काँग्रेसचे स्थापन झाले. तथापि, २००७ व २०१७मध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकले तेव्हा भाजपने सरकार बनविले. परंतु, तीन जागा अशा आहेत, जेथे कोणताही पक्ष पराभूत होऊ इच्छित नाही. गंगोत्री, बद्रीनाथ व रामनगर या जागा ज्या पक्षाने जिंकल्या, त्या पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले, असा इतिहास आहे.  

आपने दिला धक्काउत्तराखंडमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष त्रिकोणी बनविण्याचा आम आदमी पार्टीचा पुरेपूर प्रयत्न आहे. याच प्रयत्नांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप व काँग्रेसला या पक्षाने जबरदस्त धक्का दिला. नैनितालमध्ये अखेरच्या क्षणी भाजप नेते हेम आर्य यांना तिकीट दिले, तर प्रदेश महिला काँग्रेस सचिव राहिलेल्या मंजू तिवारी यांना कालाढूंगी येथून मैदानात उतरविले. दोन्ही जागांवर आधी जाहीर केलेले उमेदवार बदलून तेथे यांना उमेदवारी दिली गेली. या दोहोंनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी काही मिनिटे आपचे सदस्यत्व स्वीकारले.   

मुख्यमंत्री काय करीत होते? पंजाबमध्ये मागील सुमारे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंह निवडणुकीच्या प्रचारात त्यांचा जुना पक्ष काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करीत सुटले आहेत. मात्र, यामुळे तेच जास्त उघडे पडत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांना वाळू तस्करीला प्रोत्साहन दिल्याचा, तर नवज्योत सिंह सिद्धू यांनी वाळू तस्करांना अभय दिल्याचा आरोप केला. आता काँग्रेसचेच नेते सवाल उपस्थित करीत आहेत की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे हे आरोप खरे असतील तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोणतीच कारवाई का केलेली नाही?   

युवकांवर विश्वास नाहीभाजपने उत्तराखंडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजयुमो अध्यक्ष राहिलेले पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री केले. कारण पक्षाला धडाडीचे युवा नेतृत्व पाहिजे होते. परंतु, ७० सदस्यांच्या विधानसभेत आतापर्यंत जाहीर केलेल्या ६९ जागांपैकी एकाही जागेवर पक्षाने युवा मोर्चाच्या नेत्याला तिकीट दिलेले नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२