शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

Assembly Election 2022: ज्येष्ठ नेत्यांना मोदींची वेळ मिळेना, स्पष्ट संदेश कळेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 11:59 IST

Assembly Election 2022: उत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते मागील चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागत आहेत. परंतु, आतापर्यंत त्यांच्यावर कृपा झालेली नाही. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या सुमारे ३०० उमेदवारांपैकी केवळ सहाजणांना त्यांच्या शिफारशीने तिकिटे देण्यात आली आहेत.

-   शरद गुप्ता 

वेळ मिळत नाहीउत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते मागील चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागत आहेत. परंतु, आतापर्यंत त्यांच्यावर कृपा झालेली नाही. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या सुमारे ३०० उमेदवारांपैकी केवळ सहाजणांना त्यांच्या शिफारशीने तिकिटे देण्यात आली आहेत. यात ते पंतप्रधानांचा हस्तक्षेप मागत आहेत. परंतु, पंतप्रधान त्यांना भेटीची वेळ न देऊन त्यांना कोणता संदेश देऊ इच्छित आहेत, ही एवढी साधी बाब त्यांच्या लक्षात येत नाही.  

हार-जीतचा मंत्रउत्तराखंडच्या रानीखेतमधून कोणताही पक्ष निवडणूक जिंकू इच्छित नाही. कारण जो पक्ष येथे जिंकला त्याचे सरकार राज्यात बनू शकलेले नाही. २००२ मध्ये व २०१२ मध्ये येथे भाजप विजयी झाला, तर सरकार काँग्रेसचे स्थापन झाले. तथापि, २००७ व २०१७मध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकले तेव्हा भाजपने सरकार बनविले. परंतु, तीन जागा अशा आहेत, जेथे कोणताही पक्ष पराभूत होऊ इच्छित नाही. गंगोत्री, बद्रीनाथ व रामनगर या जागा ज्या पक्षाने जिंकल्या, त्या पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले, असा इतिहास आहे.  

आपने दिला धक्काउत्तराखंडमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष त्रिकोणी बनविण्याचा आम आदमी पार्टीचा पुरेपूर प्रयत्न आहे. याच प्रयत्नांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप व काँग्रेसला या पक्षाने जबरदस्त धक्का दिला. नैनितालमध्ये अखेरच्या क्षणी भाजप नेते हेम आर्य यांना तिकीट दिले, तर प्रदेश महिला काँग्रेस सचिव राहिलेल्या मंजू तिवारी यांना कालाढूंगी येथून मैदानात उतरविले. दोन्ही जागांवर आधी जाहीर केलेले उमेदवार बदलून तेथे यांना उमेदवारी दिली गेली. या दोहोंनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी काही मिनिटे आपचे सदस्यत्व स्वीकारले.   

मुख्यमंत्री काय करीत होते? पंजाबमध्ये मागील सुमारे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंह निवडणुकीच्या प्रचारात त्यांचा जुना पक्ष काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करीत सुटले आहेत. मात्र, यामुळे तेच जास्त उघडे पडत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांना वाळू तस्करीला प्रोत्साहन दिल्याचा, तर नवज्योत सिंह सिद्धू यांनी वाळू तस्करांना अभय दिल्याचा आरोप केला. आता काँग्रेसचेच नेते सवाल उपस्थित करीत आहेत की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे हे आरोप खरे असतील तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोणतीच कारवाई का केलेली नाही?   

युवकांवर विश्वास नाहीभाजपने उत्तराखंडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजयुमो अध्यक्ष राहिलेले पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री केले. कारण पक्षाला धडाडीचे युवा नेतृत्व पाहिजे होते. परंतु, ७० सदस्यांच्या विधानसभेत आतापर्यंत जाहीर केलेल्या ६९ जागांपैकी एकाही जागेवर पक्षाने युवा मोर्चाच्या नेत्याला तिकीट दिलेले नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२