आसाम हिंसाचार जोड :
By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST
राष्ट्रपतींकडून निंदा
आसाम हिंसाचार जोड :
राष्ट्रपतींकडून निंदानवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आसामच्या सोनितपूर व कोकराझर जिल्ह्यात एनडीएफबी बंडखोरांनी घडवून आणलेल्या हिंसाचाराची निंदा केली आहे़ या हिंसाचाराबाबत ऐकून अत्यंत दु:ख झाले़ मी या हिंसाचाराची निंदा करतो़ अशा दहशतवाद आणि हिंसाचाराचे कृत्य घडविणाऱ्यांना तत्काळ शिक्षा व्हावी, असे राष्ट्रपतींनी आसामचे राज्यपाल पी़बी़ आचार्य यांना पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे़बॉक्सराजनाथ यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाडगुवाहाटी : आसामातील हिंसाचारप्रभावित भागांचा दौरा करण्यासाठी निघालेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या हेलिकॉप्टरमध्ये गुरुवारी तांत्रिक बिघाड उद्भवला़ यानंतर तात्काळ हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत तेजपूर हवाईदलाच्या तळावर उतरविण्यात आले़ राजनाथसिंग हवाईदलाच्या तळावरून कोकराझरकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले होते़ अर्ध्या वाटेत हेलिकॉप्टरमध्ये बिघाड उद्भवला़ यानंतर ते तात्काळ माघारी वळविण्यात आले़ यानंतर कोकराझर येथून नवे हेलिकॉप्टर मागविण्यात आले व राजनाथसिंग रवाना झाले़ यामुळे त्यांचा दौरा तासाभराने लांबला़