शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आसाम, मणिपूर, त्रिपुरामध्ये पूरस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:59 IST

मुसळधार पावसामुळे इशान्य भारतातील आसाम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत निर्माण झालेल्या पुरस्थितीने अजून गंभीर स्वरुप धारण केले आहे.

गुवाहाटी : मुसळधार पावसामुळे इशान्य भारतातील आसाम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत निर्माण झालेल्या पुरस्थितीने अजून गंभीर स्वरुप धारण केले आहे. आसाममध्ये शनिवारी पूराच्या पाण्यात बुडून चार जण व दरड कोसळल्यामुळे एक जण मरण पावला. त्यामुळे या तीन राज्यांत पुरामुळे बुधवारपासून बळी गेलेल्यांची संख्या आता २४ झाली.आसाममधील आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४,२५,३७३ लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. कचर जिल्ह्यातील दोन तसेच हैलाकंडी, होजाई जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती पुरबळी ठरली आहे. अर्धा हैलाकंडी जिल्हा पूरग्रस्त आहे. इदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी घराच्या गच्चीवर जाऊन नमाज पढला. जिल्ह्यातील ३३१ पैैकी २३१ गावांना पुराने वेढले आहे. कटखल, धोलेश्वरी, बाराक या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.>त्रिपुराचा देशाशीअसलेला संपर्क तुटलात्रिपुरातील धरमनगर भागात दरडी कोसळल्याने या राज्याचा देशाच्या अन्य भागाशी असलेला संपर्क तात्पुरता तुटला आहे. या भागातूनच राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेमार्ग जातो. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लवकुमार देव यांनी राज्यातील पूरग्रस्त उदयपूर भागाला भेट दिली. पूरग्रस्त भागांमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा त्यांनी आढावा घेतला.वाहतूक कोलमडलीमणिपूर व आसामला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३७ व २ येथे पुरामुळे गेल्या तीन दिवसांपासून वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी तासनतास वाहने खोळंबून राहिल्याचेचित्र आहे. दरम्यान उचिवा व अन्य काही गावांना रविवारी पुराच्या पाण्याने वेढले आहे. मात्र इंफाळ शहर व परिसरात पुरामुळे बिघडलेल्या स्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे.> ५४,३६४ पूरग्रस्तांसाठी ८७ मदतशिबीरेहैलाकंडी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी ८७ मदतशिबीरे सुरु करण्यात आली असून त्यात सध्या ५४,३६४ पूरग्रस्त राहात आहेत. आपत्कालीन मदत दलाने पुराच्या पाण्यात बुडणाºया ३१६ जणांचे प्राण वाचविले आहेत. आसामच्या अन्य सहा जिल्ह्यांत १०४ मदतशिबीरे सुरु करण्यात आली असून त्यात ४५,६४६ पूरग्रस्त सध्या राहात आहेत. दिमा हसाव या जिल्ह्यात पावसामुळे माहुर, हरंगजाव, मैैलबंग या ठिकाणी दरडी कोसळल्या तसेच ११४ घरांची पडझड असून लुमडिंग ते बदरपूर दरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.