शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

आसाम, मणिपूर, त्रिपुरामध्ये पूरस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:59 IST

मुसळधार पावसामुळे इशान्य भारतातील आसाम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत निर्माण झालेल्या पुरस्थितीने अजून गंभीर स्वरुप धारण केले आहे.

गुवाहाटी : मुसळधार पावसामुळे इशान्य भारतातील आसाम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत निर्माण झालेल्या पुरस्थितीने अजून गंभीर स्वरुप धारण केले आहे. आसाममध्ये शनिवारी पूराच्या पाण्यात बुडून चार जण व दरड कोसळल्यामुळे एक जण मरण पावला. त्यामुळे या तीन राज्यांत पुरामुळे बुधवारपासून बळी गेलेल्यांची संख्या आता २४ झाली.आसाममधील आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४,२५,३७३ लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. कचर जिल्ह्यातील दोन तसेच हैलाकंडी, होजाई जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती पुरबळी ठरली आहे. अर्धा हैलाकंडी जिल्हा पूरग्रस्त आहे. इदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी घराच्या गच्चीवर जाऊन नमाज पढला. जिल्ह्यातील ३३१ पैैकी २३१ गावांना पुराने वेढले आहे. कटखल, धोलेश्वरी, बाराक या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.>त्रिपुराचा देशाशीअसलेला संपर्क तुटलात्रिपुरातील धरमनगर भागात दरडी कोसळल्याने या राज्याचा देशाच्या अन्य भागाशी असलेला संपर्क तात्पुरता तुटला आहे. या भागातूनच राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेमार्ग जातो. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लवकुमार देव यांनी राज्यातील पूरग्रस्त उदयपूर भागाला भेट दिली. पूरग्रस्त भागांमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा त्यांनी आढावा घेतला.वाहतूक कोलमडलीमणिपूर व आसामला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३७ व २ येथे पुरामुळे गेल्या तीन दिवसांपासून वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी तासनतास वाहने खोळंबून राहिल्याचेचित्र आहे. दरम्यान उचिवा व अन्य काही गावांना रविवारी पुराच्या पाण्याने वेढले आहे. मात्र इंफाळ शहर व परिसरात पुरामुळे बिघडलेल्या स्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे.> ५४,३६४ पूरग्रस्तांसाठी ८७ मदतशिबीरेहैलाकंडी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी ८७ मदतशिबीरे सुरु करण्यात आली असून त्यात सध्या ५४,३६४ पूरग्रस्त राहात आहेत. आपत्कालीन मदत दलाने पुराच्या पाण्यात बुडणाºया ३१६ जणांचे प्राण वाचविले आहेत. आसामच्या अन्य सहा जिल्ह्यांत १०४ मदतशिबीरे सुरु करण्यात आली असून त्यात ४५,६४६ पूरग्रस्त सध्या राहात आहेत. दिमा हसाव या जिल्ह्यात पावसामुळे माहुर, हरंगजाव, मैैलबंग या ठिकाणी दरडी कोसळल्या तसेच ११४ घरांची पडझड असून लुमडिंग ते बदरपूर दरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.