शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आसाम, मणिपूर, त्रिपुरामध्ये पूरस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:59 IST

मुसळधार पावसामुळे इशान्य भारतातील आसाम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत निर्माण झालेल्या पुरस्थितीने अजून गंभीर स्वरुप धारण केले आहे.

गुवाहाटी : मुसळधार पावसामुळे इशान्य भारतातील आसाम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत निर्माण झालेल्या पुरस्थितीने अजून गंभीर स्वरुप धारण केले आहे. आसाममध्ये शनिवारी पूराच्या पाण्यात बुडून चार जण व दरड कोसळल्यामुळे एक जण मरण पावला. त्यामुळे या तीन राज्यांत पुरामुळे बुधवारपासून बळी गेलेल्यांची संख्या आता २४ झाली.आसाममधील आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४,२५,३७३ लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. कचर जिल्ह्यातील दोन तसेच हैलाकंडी, होजाई जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती पुरबळी ठरली आहे. अर्धा हैलाकंडी जिल्हा पूरग्रस्त आहे. इदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी घराच्या गच्चीवर जाऊन नमाज पढला. जिल्ह्यातील ३३१ पैैकी २३१ गावांना पुराने वेढले आहे. कटखल, धोलेश्वरी, बाराक या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.>त्रिपुराचा देशाशीअसलेला संपर्क तुटलात्रिपुरातील धरमनगर भागात दरडी कोसळल्याने या राज्याचा देशाच्या अन्य भागाशी असलेला संपर्क तात्पुरता तुटला आहे. या भागातूनच राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेमार्ग जातो. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लवकुमार देव यांनी राज्यातील पूरग्रस्त उदयपूर भागाला भेट दिली. पूरग्रस्त भागांमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा त्यांनी आढावा घेतला.वाहतूक कोलमडलीमणिपूर व आसामला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३७ व २ येथे पुरामुळे गेल्या तीन दिवसांपासून वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी तासनतास वाहने खोळंबून राहिल्याचेचित्र आहे. दरम्यान उचिवा व अन्य काही गावांना रविवारी पुराच्या पाण्याने वेढले आहे. मात्र इंफाळ शहर व परिसरात पुरामुळे बिघडलेल्या स्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे.> ५४,३६४ पूरग्रस्तांसाठी ८७ मदतशिबीरेहैलाकंडी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी ८७ मदतशिबीरे सुरु करण्यात आली असून त्यात सध्या ५४,३६४ पूरग्रस्त राहात आहेत. आपत्कालीन मदत दलाने पुराच्या पाण्यात बुडणाºया ३१६ जणांचे प्राण वाचविले आहेत. आसामच्या अन्य सहा जिल्ह्यांत १०४ मदतशिबीरे सुरु करण्यात आली असून त्यात ४५,६४६ पूरग्रस्त सध्या राहात आहेत. दिमा हसाव या जिल्ह्यात पावसामुळे माहुर, हरंगजाव, मैैलबंग या ठिकाणी दरडी कोसळल्या तसेच ११४ घरांची पडझड असून लुमडिंग ते बदरपूर दरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.