शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
3
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
4
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
5
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
6
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
7
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
8
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
9
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
10
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
12
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
13
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
14
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
15
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
16
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
17
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
18
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
19
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
20
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

कोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही; भाजप मंत्र्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 14:10 IST

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.

ठळक मुद्देभाजप मंत्र्यांचा अजब दावाकोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही - सरमागरज असेल, तेव्हा मास्क घालायला सांगू - सरमा

गुवाहाटी: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. मात्र, आसाममधील आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाच्या संदर्भात अजब विधान केले आहे. (himanta biswa sarma react on corona)

हेमंत बिस्वा सरमा यांना निवडणूक आयोगाने २४ तास प्रचार करण्यापासून रोखले आहे. मात्र, पत्रकारांशी संवाद साधताना सरमा यांनी अजब तर्कट मांडले आहे. कोरोना पळून गेला आहे. आसाममध्ये तरी मास्क घालण्याची काहीही गरज नाही, असा अजब दावा सरमा यांनी यावेळी बोलताना केला आहे. 

चिंतेत भर! दिवसभरात तब्बल ९३ हजार नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा उच्चांक

गरज असेल, तेव्हा मास्क घालायला सांगू

आसाममधील नागरिकांना मास्क घालण्याची गरज नाही. मास्क घातल्यामुळे जनतेमधील भीती वाढली आहे. मास्क घालण्याची गरज असेल, तेव्हा शासनाकडून सांगण्यात येईल. मास्क घालून लोकं फिरायला लागले, तर ब्युटी पार्लर कसे चालणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

आचारसंहितेचे उल्लंघन

हेमंत बिस्वा सरमा यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने याची दखल घेत ४८ तासांपर्यंत निवडणूक प्रचार करता येणार नाही, असे निर्देश आयोगाने दिले. मात्र, याविरोधात सरमा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर आयोगाने प्रचार न करण्याचे निर्बंध २४ तासांवर आणले. तसेच आचारसंहितेचे पालन करण्याची हमी सरमा यांच्याकडून घेतली. 

लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट

दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, ६० हजार ०४८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ५१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत देशात ०१ कोटी २४ लाख, ८५ हजार ५०९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, यापैकी एकूण ०१ कोटी १६ लाख २९ हजार २८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७ कोटी ५९ लाख ७९ हजार ६५१ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्याElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग