शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

कोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही; भाजप मंत्र्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 14:10 IST

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.

ठळक मुद्देभाजप मंत्र्यांचा अजब दावाकोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही - सरमागरज असेल, तेव्हा मास्क घालायला सांगू - सरमा

गुवाहाटी: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. मात्र, आसाममधील आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाच्या संदर्भात अजब विधान केले आहे. (himanta biswa sarma react on corona)

हेमंत बिस्वा सरमा यांना निवडणूक आयोगाने २४ तास प्रचार करण्यापासून रोखले आहे. मात्र, पत्रकारांशी संवाद साधताना सरमा यांनी अजब तर्कट मांडले आहे. कोरोना पळून गेला आहे. आसाममध्ये तरी मास्क घालण्याची काहीही गरज नाही, असा अजब दावा सरमा यांनी यावेळी बोलताना केला आहे. 

चिंतेत भर! दिवसभरात तब्बल ९३ हजार नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा उच्चांक

गरज असेल, तेव्हा मास्क घालायला सांगू

आसाममधील नागरिकांना मास्क घालण्याची गरज नाही. मास्क घातल्यामुळे जनतेमधील भीती वाढली आहे. मास्क घालण्याची गरज असेल, तेव्हा शासनाकडून सांगण्यात येईल. मास्क घालून लोकं फिरायला लागले, तर ब्युटी पार्लर कसे चालणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

आचारसंहितेचे उल्लंघन

हेमंत बिस्वा सरमा यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने याची दखल घेत ४८ तासांपर्यंत निवडणूक प्रचार करता येणार नाही, असे निर्देश आयोगाने दिले. मात्र, याविरोधात सरमा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर आयोगाने प्रचार न करण्याचे निर्बंध २४ तासांवर आणले. तसेच आचारसंहितेचे पालन करण्याची हमी सरमा यांच्याकडून घेतली. 

लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट

दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, ६० हजार ०४८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ५१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत देशात ०१ कोटी २४ लाख, ८५ हजार ५०९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, यापैकी एकूण ०१ कोटी १६ लाख २९ हजार २८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७ कोटी ५९ लाख ७९ हजार ६५१ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्याElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग