शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह 6 जणांना आजन्म तुरुंगवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 07:31 IST

24 वर्ष जुन्या बनावट चकमक प्रकरणात लष्करी न्यायालयानं सुनावली शिक्षा

नवी दिल्ली: आसाममध्ये 24 वर्षांपूर्वी झालेल्या एका बनावट चकमक प्रकरणात लष्कराच्या न्यायालयानं मेजर जनरलसह 6 जणांना दोषी ठरवलं आहे. 1994 मध्ये आसाममध्ये झालेल्या बनावट चकमकीत 5 तरुणांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात लष्करी न्यायालयानं दोषींना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यात 1994 मध्ये बनावट चकमक झाली होती. त्या प्रकरणात 7 जण दोषी आढळले आहेत. यामध्ये मेजर जनरल ए. के. लाल, कर्नल थॉमस मॅथ्यू, कर्नल आर. एस. सिबिरेन, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स आणि नॉन कमिशन्ड ऑफिसर्स दिलीप सिंह, जगदेव सिंह, अलबिंदर सिंह आणि शिवेंदर सिंह यांचा समावेश आहे. लष्करी न्यायालयानं दोषी ठरवलेले हे सर्व अधिकारी या निकालाविरोधात आर्म्ड फोर्सेस ट्रिब्युनल आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. 1994 मध्ये एका अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात 18 फेब्रुवारी 1994 मध्ये तिनसुकिया जिल्ह्याच्या विविध भागांमधून लष्कराच्या जवानांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील पाच जणांना बनावट चकमकीत ठार करण्यात आलं. हे पाच जण उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) संघटनेचे सदस्य असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. तर ताब्यात घेण्यात आलेल्या चार जणांना सोडून देण्यात आलं होतं, अशी माहिती आसाम सरकारमध्ये मंत्री असलेले भाजपा नेते जगदिश भुयान यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. जगदिश भुयान यांनी 1994 मध्ये या प्रकरणात गुवाहाटी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर उच्च न्यायालयानं लष्कराला ऑल इंडिया स्टुडंट युनियनच्या 9 बेपत्ता कार्यकर्त्यांना जवळच्या पोलीस ठाण्यात हजर करण्याच्या सूचना केल्या. यानंतर लष्करानं लष्करानं पाच जणांचे मृतदेह तिनसुकियाच्या ढोला पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणात 16 जुलैला कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू झाली. 27 जुलैला या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान