शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित असूनही दुसरं लग्न केल्यास दंडात्मक कारवाई होणार; आसाम सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 15:58 IST

आसाम सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : आसामसरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्याचा जोडीदार जिवंत असेपर्यंत त्याला इतर कोणाशीही लग्न करता येणार नाही आणि असे केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. खरं तर जोडीदार जिवंत असतानाही दुसरं लग्न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. आसाम सरकारच्या कार्मिक विभागाने जारी केलेल्या आदेशात कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, पती किंवा पत्नी हयात असताना दुसरं लग्न करायचे असल्यास परवानगी घेणे बंधनकारक असेल. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गोलाघाटमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी मोठा दावा केला होता. गोलाघाट येथील तिहेरी हत्याकांड हे 'लव्ह जिहाद'चे प्रकरण असल्याचे त्यांनी म्हटले होते. मुस्लिम पुरुषांनी हिंदू महिलांना फूस लावून धर्मांतर करण्याच्या मोहिमेसाठी अलीकडे हा शब्द माध्यमांमध्ये झळकत आहे. उजव्या विचारसरणीचे नेत्यांनी आरोप करताना अनेकदा याचा वापर केला आहे. सरमा यांनी आरोपींविरुद्धचा खटला जलद गतीने चालवण्याच्या उद्देशाने १५ दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासन दिले होते. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधताना सांगितले होते की, हे पूर्णपणे लव्ह जिहादचे प्रकरण आहे. मृत कुटुंब हिंदू असून आरोपी मुस्लिम समाजातील आहे. आरोपीने याआधी फेसबुकवर हिंदू नावाने स्वतःची ओळख करून दिली होती. जेव्हा हे जोडपे कोलकाता येथे पळून गेले तेव्हा संबंधित महिला ड्रग्ज घेण्यास शिकली. माहितीनुसार, संजीव घोष, जुनू घोष आणि संघमित्रा घोष अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्या. सोमवारी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता.

टॅग्स :AssamआसामGovernmentसरकार