शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

विवाहित असूनही दुसरं लग्न केल्यास दंडात्मक कारवाई होणार; आसाम सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 15:58 IST

आसाम सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : आसामसरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्याचा जोडीदार जिवंत असेपर्यंत त्याला इतर कोणाशीही लग्न करता येणार नाही आणि असे केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. खरं तर जोडीदार जिवंत असतानाही दुसरं लग्न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. आसाम सरकारच्या कार्मिक विभागाने जारी केलेल्या आदेशात कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, पती किंवा पत्नी हयात असताना दुसरं लग्न करायचे असल्यास परवानगी घेणे बंधनकारक असेल. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गोलाघाटमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी मोठा दावा केला होता. गोलाघाट येथील तिहेरी हत्याकांड हे 'लव्ह जिहाद'चे प्रकरण असल्याचे त्यांनी म्हटले होते. मुस्लिम पुरुषांनी हिंदू महिलांना फूस लावून धर्मांतर करण्याच्या मोहिमेसाठी अलीकडे हा शब्द माध्यमांमध्ये झळकत आहे. उजव्या विचारसरणीचे नेत्यांनी आरोप करताना अनेकदा याचा वापर केला आहे. सरमा यांनी आरोपींविरुद्धचा खटला जलद गतीने चालवण्याच्या उद्देशाने १५ दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासन दिले होते. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधताना सांगितले होते की, हे पूर्णपणे लव्ह जिहादचे प्रकरण आहे. मृत कुटुंब हिंदू असून आरोपी मुस्लिम समाजातील आहे. आरोपीने याआधी फेसबुकवर हिंदू नावाने स्वतःची ओळख करून दिली होती. जेव्हा हे जोडपे कोलकाता येथे पळून गेले तेव्हा संबंधित महिला ड्रग्ज घेण्यास शिकली. माहितीनुसार, संजीव घोष, जुनू घोष आणि संघमित्रा घोष अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्या. सोमवारी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता.

टॅग्स :AssamआसामGovernmentसरकार