शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विवाहित असूनही दुसरं लग्न केल्यास दंडात्मक कारवाई होणार; आसाम सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 15:58 IST

आसाम सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : आसामसरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्याचा जोडीदार जिवंत असेपर्यंत त्याला इतर कोणाशीही लग्न करता येणार नाही आणि असे केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. खरं तर जोडीदार जिवंत असतानाही दुसरं लग्न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. आसाम सरकारच्या कार्मिक विभागाने जारी केलेल्या आदेशात कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, पती किंवा पत्नी हयात असताना दुसरं लग्न करायचे असल्यास परवानगी घेणे बंधनकारक असेल. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गोलाघाटमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी मोठा दावा केला होता. गोलाघाट येथील तिहेरी हत्याकांड हे 'लव्ह जिहाद'चे प्रकरण असल्याचे त्यांनी म्हटले होते. मुस्लिम पुरुषांनी हिंदू महिलांना फूस लावून धर्मांतर करण्याच्या मोहिमेसाठी अलीकडे हा शब्द माध्यमांमध्ये झळकत आहे. उजव्या विचारसरणीचे नेत्यांनी आरोप करताना अनेकदा याचा वापर केला आहे. सरमा यांनी आरोपींविरुद्धचा खटला जलद गतीने चालवण्याच्या उद्देशाने १५ दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासन दिले होते. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधताना सांगितले होते की, हे पूर्णपणे लव्ह जिहादचे प्रकरण आहे. मृत कुटुंब हिंदू असून आरोपी मुस्लिम समाजातील आहे. आरोपीने याआधी फेसबुकवर हिंदू नावाने स्वतःची ओळख करून दिली होती. जेव्हा हे जोडपे कोलकाता येथे पळून गेले तेव्हा संबंधित महिला ड्रग्ज घेण्यास शिकली. माहितीनुसार, संजीव घोष, जुनू घोष आणि संघमित्रा घोष अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्या. सोमवारी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता.

टॅग्स :AssamआसामGovernmentसरकार