शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण, कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:44 IST

assam assembly election 2021: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले.

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ आसाम दौऱ्यावरश्रीरामांशिवाय भारत अपूर्ण - योगीकामाख्या मंदिरात जय श्रीराम ऐकून बरे वाटले - योगी

गुवाहाटी: आसाम विधानसभा निवडणुकांच्या (assam assembly election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाते आहेत. भाजपचे मुख्यमंत्री, नेते, मंत्री विविध राज्यांतील प्रचार मोहिमांमध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले. श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. (assam assembly election 2021 yogi adityanath says feeling glad to hear jay shri ram in assam)

गुवाहाटी येथील रॅलीच्या आधी योगी आदित्यनाथ यांनी कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कामाख्या मंदिरात जय श्रीराम अशा घोषणा ऐकून आनंद झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल. श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण आहे. श्रीरामाशिवाय भारतातील कामकाज सुरू राहू शकत नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

...तर कोरोनाला रोखणे कठीण होईल, चाचण्या वाढवल्या पाहिजेत; पंतप्रधान मोदींच्या सूचना

काँग्रेसवर सोडले टीकास्त्र

योगी आदित्यानाथ यांनी रॅलीत जनतेला संबोधित करताना काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करत आला आहे. त्यांनी ईशान्य भारतातील राज्यांकडे कधी लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. आसाममधील सरकार समृद्धी आणणारे सरकार असेल. पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवले. आता तर आसाममधील नागरिकही जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ शकतो, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

दरम्यान, केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका करत विधानसभा निवडणुकीत भाजपला मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी केले. आसाममध्ये अनेक बडे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र, राज्याचा विकास, गरिबांचे कल्याण झाले नाही. केवळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिले, असे इराणी यांनी नमूद केले. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाPoliticsराजकारण