शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण, कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:44 IST

assam assembly election 2021: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले.

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ आसाम दौऱ्यावरश्रीरामांशिवाय भारत अपूर्ण - योगीकामाख्या मंदिरात जय श्रीराम ऐकून बरे वाटले - योगी

गुवाहाटी: आसाम विधानसभा निवडणुकांच्या (assam assembly election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाते आहेत. भाजपचे मुख्यमंत्री, नेते, मंत्री विविध राज्यांतील प्रचार मोहिमांमध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले. श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. (assam assembly election 2021 yogi adityanath says feeling glad to hear jay shri ram in assam)

गुवाहाटी येथील रॅलीच्या आधी योगी आदित्यनाथ यांनी कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कामाख्या मंदिरात जय श्रीराम अशा घोषणा ऐकून आनंद झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल. श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण आहे. श्रीरामाशिवाय भारतातील कामकाज सुरू राहू शकत नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

...तर कोरोनाला रोखणे कठीण होईल, चाचण्या वाढवल्या पाहिजेत; पंतप्रधान मोदींच्या सूचना

काँग्रेसवर सोडले टीकास्त्र

योगी आदित्यानाथ यांनी रॅलीत जनतेला संबोधित करताना काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करत आला आहे. त्यांनी ईशान्य भारतातील राज्यांकडे कधी लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. आसाममधील सरकार समृद्धी आणणारे सरकार असेल. पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवले. आता तर आसाममधील नागरिकही जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ शकतो, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

दरम्यान, केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका करत विधानसभा निवडणुकीत भाजपला मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी केले. आसाममध्ये अनेक बडे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र, राज्याचा विकास, गरिबांचे कल्याण झाले नाही. केवळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिले, असे इराणी यांनी नमूद केले. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाPoliticsराजकारण