शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण, कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:44 IST

assam assembly election 2021: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले.

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ आसाम दौऱ्यावरश्रीरामांशिवाय भारत अपूर्ण - योगीकामाख्या मंदिरात जय श्रीराम ऐकून बरे वाटले - योगी

गुवाहाटी: आसाम विधानसभा निवडणुकांच्या (assam assembly election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाते आहेत. भाजपचे मुख्यमंत्री, नेते, मंत्री विविध राज्यांतील प्रचार मोहिमांमध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले. श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. (assam assembly election 2021 yogi adityanath says feeling glad to hear jay shri ram in assam)

गुवाहाटी येथील रॅलीच्या आधी योगी आदित्यनाथ यांनी कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कामाख्या मंदिरात जय श्रीराम अशा घोषणा ऐकून आनंद झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल. श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण आहे. श्रीरामाशिवाय भारतातील कामकाज सुरू राहू शकत नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

...तर कोरोनाला रोखणे कठीण होईल, चाचण्या वाढवल्या पाहिजेत; पंतप्रधान मोदींच्या सूचना

काँग्रेसवर सोडले टीकास्त्र

योगी आदित्यानाथ यांनी रॅलीत जनतेला संबोधित करताना काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करत आला आहे. त्यांनी ईशान्य भारतातील राज्यांकडे कधी लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. आसाममधील सरकार समृद्धी आणणारे सरकार असेल. पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवले. आता तर आसाममधील नागरिकही जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ शकतो, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

दरम्यान, केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका करत विधानसभा निवडणुकीत भाजपला मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी केले. आसाममध्ये अनेक बडे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र, राज्याचा विकास, गरिबांचे कल्याण झाले नाही. केवळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिले, असे इराणी यांनी नमूद केले. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाPoliticsराजकारण