शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण, कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:44 IST

assam assembly election 2021: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले.

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ आसाम दौऱ्यावरश्रीरामांशिवाय भारत अपूर्ण - योगीकामाख्या मंदिरात जय श्रीराम ऐकून बरे वाटले - योगी

गुवाहाटी: आसाम विधानसभा निवडणुकांच्या (assam assembly election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाते आहेत. भाजपचे मुख्यमंत्री, नेते, मंत्री विविध राज्यांतील प्रचार मोहिमांमध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) आसाम दौऱ्यावर असून, गुवाहाटी आणि होजाई येथे त्यांनी रॅलीला संबोधित केले. श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. (assam assembly election 2021 yogi adityanath says feeling glad to hear jay shri ram in assam)

गुवाहाटी येथील रॅलीच्या आधी योगी आदित्यनाथ यांनी कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कामाख्या मंदिरात जय श्रीराम अशा घोषणा ऐकून आनंद झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल. श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण आहे. श्रीरामाशिवाय भारतातील कामकाज सुरू राहू शकत नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

...तर कोरोनाला रोखणे कठीण होईल, चाचण्या वाढवल्या पाहिजेत; पंतप्रधान मोदींच्या सूचना

काँग्रेसवर सोडले टीकास्त्र

योगी आदित्यानाथ यांनी रॅलीत जनतेला संबोधित करताना काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करत आला आहे. त्यांनी ईशान्य भारतातील राज्यांकडे कधी लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. आसाममधील सरकार समृद्धी आणणारे सरकार असेल. पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवले. आता तर आसाममधील नागरिकही जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ शकतो, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

दरम्यान, केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका करत विधानसभा निवडणुकीत भाजपला मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी केले. आसाममध्ये अनेक बडे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र, राज्याचा विकास, गरिबांचे कल्याण झाले नाही. केवळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिले, असे इराणी यांनी नमूद केले. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाPoliticsराजकारण