शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

NRC ची अंमलबजावणी, ३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत; आसामसाठी भाजपचे संकल्पपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 12:31 IST

Assam Assembly Election 2021: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्पपत्र जाहीर केले आहे.

ठळक मुद्देआसाम विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीरNRC ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासनस्वामी विवेकानंद यांच्या नावाने नवीन योजना आखून स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार

गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीच्या (Assam Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, भाजपचे मंत्री, नेते विविध ठिकाणी जनतेला संबोधित करत आहेत. आसाममधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्पपत्र जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यांनी निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. आसाममध्ये योग्य पद्धतीने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (NRC) ची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. (assam assembly election 2021 bjp leader jp nadda release manifesto free education caa nrc brahmaputra)

जेपी नड्डा यांनी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र जाहीर करताना पुन्हा एकदा NRC च्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे. यासह विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, CAA, ३० लाख कुटुंबीयांना आर्थिक मदत अशा मोठ्या आश्वासनांचा यात समावेश आहे. 

मिशन ब्रह्मपुत्र, मोफत शिक्षण

आसाममध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यास सरकारी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल. तसेच आठवीनंतर विद्यार्थ्यांना सायकल दिली जाईल. मिशन ब्रह्मपुत्र अंतर्गत महापूर रोखण्यासाठी विशेष योजना आखली जाईल, जेणेकरून आसामवासीयांना महापुराची समस्या भेडसावणार नाही, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. 

महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण, CAA लागू होणार; प. बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर

३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत

स्वामी विवेकानंद यांच्या नावाने नवीन योजना आखून स्टार्टअपसाठी प्रोत्साहन दिले जाईल. अरुणोदय योजनेंतर्गत ३० लाख कुटुंबांना प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये देण्यात येतील. तसेच अडीच लाखांचीही मदत करण्यात येणार आहे. अवैध बांधकामे हटवण्यात येतील. आसाममधील परिसीमन प्रक्रियेची व्याप्ती वाढवली जाईल. सर्वांना जमिनीचा मालकी हक्क दिला जाईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. 

NRC आणि आत्मनिर्भर आसाम

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे योग्य पद्धतीने NRC ची अंमलबजावणी आसाममध्ये केली जाईल. घुसखोरांची ओळख पटवली जाईल. आत्मनिर्भर आसाम अभियान राबवले जाईल. प्रत्येक क्षेत्राला मदत आणि प्रोत्साहन दिले जाईल. सरकारी क्षेत्रात २ लाख रोजगार आणि ३० मार्च २०२२ पर्यंत एक लाख नोकऱ्या दिल्या जातील. तसेच खासगी क्षेत्रात ८ लाख रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन भाजपने आपल्या संकल्पपत्रातून दिले आहे. 

भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी; टीएमसीची टीका

दरम्यान, सर्वानंद सोनोवाल आणि हेमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली गेली ५ वर्षे भाजपचे सरकार आसाममध्ये आहे. भाजपकडून सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसकडूनही जोरात प्रचार केला जात आहे. आसाम विधानसभेच्या १२६ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७२ मार्चला, तर दुसऱ्या टप्प्यात ३९ जागांसाठी १ एप्रिलला आणि तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६ एप्रिलला मतदान होणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाPoliticsराजकारणNational Register of Citizensएनआरसीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021