शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

NRC ची अंमलबजावणी, ३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत; आसामसाठी भाजपचे संकल्पपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 12:31 IST

Assam Assembly Election 2021: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्पपत्र जाहीर केले आहे.

ठळक मुद्देआसाम विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीरNRC ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासनस्वामी विवेकानंद यांच्या नावाने नवीन योजना आखून स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार

गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीच्या (Assam Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, भाजपचे मंत्री, नेते विविध ठिकाणी जनतेला संबोधित करत आहेत. आसाममधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्पपत्र जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यांनी निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. आसाममध्ये योग्य पद्धतीने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (NRC) ची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. (assam assembly election 2021 bjp leader jp nadda release manifesto free education caa nrc brahmaputra)

जेपी नड्डा यांनी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र जाहीर करताना पुन्हा एकदा NRC च्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे. यासह विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, CAA, ३० लाख कुटुंबीयांना आर्थिक मदत अशा मोठ्या आश्वासनांचा यात समावेश आहे. 

मिशन ब्रह्मपुत्र, मोफत शिक्षण

आसाममध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यास सरकारी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल. तसेच आठवीनंतर विद्यार्थ्यांना सायकल दिली जाईल. मिशन ब्रह्मपुत्र अंतर्गत महापूर रोखण्यासाठी विशेष योजना आखली जाईल, जेणेकरून आसामवासीयांना महापुराची समस्या भेडसावणार नाही, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. 

महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण, CAA लागू होणार; प. बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर

३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत

स्वामी विवेकानंद यांच्या नावाने नवीन योजना आखून स्टार्टअपसाठी प्रोत्साहन दिले जाईल. अरुणोदय योजनेंतर्गत ३० लाख कुटुंबांना प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये देण्यात येतील. तसेच अडीच लाखांचीही मदत करण्यात येणार आहे. अवैध बांधकामे हटवण्यात येतील. आसाममधील परिसीमन प्रक्रियेची व्याप्ती वाढवली जाईल. सर्वांना जमिनीचा मालकी हक्क दिला जाईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. 

NRC आणि आत्मनिर्भर आसाम

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे योग्य पद्धतीने NRC ची अंमलबजावणी आसाममध्ये केली जाईल. घुसखोरांची ओळख पटवली जाईल. आत्मनिर्भर आसाम अभियान राबवले जाईल. प्रत्येक क्षेत्राला मदत आणि प्रोत्साहन दिले जाईल. सरकारी क्षेत्रात २ लाख रोजगार आणि ३० मार्च २०२२ पर्यंत एक लाख नोकऱ्या दिल्या जातील. तसेच खासगी क्षेत्रात ८ लाख रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन भाजपने आपल्या संकल्पपत्रातून दिले आहे. 

भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी; टीएमसीची टीका

दरम्यान, सर्वानंद सोनोवाल आणि हेमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली गेली ५ वर्षे भाजपचे सरकार आसाममध्ये आहे. भाजपकडून सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसकडूनही जोरात प्रचार केला जात आहे. आसाम विधानसभेच्या १२६ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७२ मार्चला, तर दुसऱ्या टप्प्यात ३९ जागांसाठी १ एप्रिलला आणि तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६ एप्रिलला मतदान होणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाPoliticsराजकारणNational Register of Citizensएनआरसीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021