शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Assam Assembly Election 2021 : कुछ तो गडबड है! फक्त 90 मतदारांची नोंद पण पडली तब्बल 171 मतं; मतदार यादीत मोठा घोळ, 5 अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 21:12 IST

Assam Assembly Election 2021 : मतदार यादीमध्ये फक्त 90 मतदारांची नोंद असताना तब्बल 171 मतं पडल्याची घटना आता समोर आली आहे.

आसाममध्ये काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठा घोटाळा झाल्याची घटना घडली आहे. मतदार यादीमध्ये फक्त 90 मतदारांची नोंद असताना तब्बल 171 मतं पडल्याची घटना आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मोठी गडबड झाली आहे. दीमा हसाओ जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. या मतदान केंद्रावर फक्त 90 मतदार आहेत. मात्र मतदानाच्या दिवशी 171 मतं पडली आहेत. हाफलोंग विधानसभेअंतर्गत हे मतदान केंद्र येतं. मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याची घटना समोर येताच पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गावच्या सरपंचाने निवडणूक आयोगाची मतदार यादी खरी असल्याचं म्हणण्यास नकार दिला आहे. त्याने आपली एक यादी समोर आणली आहे. त्यानुसारच गावातील लोकांनी मतदान केल्याचं म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असून मतदान केंद्रावरील सुरक्षेचा देखील तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन आढळून आल्यानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित केले होते. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आयोगाला सुनावलं होतं.

"क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?"; प्रियंका गांधी संतापल्या

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "क्या स्क्रिप्ट है? निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. ती गाडी भाजपा उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगाने त्यातूनच प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे काय प्रकरण आहे? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?" असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला होता. प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१AssamआसामElectionनिवडणूकVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग