शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

Assam Assembly Election 2021 : कुछ तो गडबड है! फक्त 90 मतदारांची नोंद पण पडली तब्बल 171 मतं; मतदार यादीत मोठा घोळ, 5 अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 21:12 IST

Assam Assembly Election 2021 : मतदार यादीमध्ये फक्त 90 मतदारांची नोंद असताना तब्बल 171 मतं पडल्याची घटना आता समोर आली आहे.

आसाममध्ये काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठा घोटाळा झाल्याची घटना घडली आहे. मतदार यादीमध्ये फक्त 90 मतदारांची नोंद असताना तब्बल 171 मतं पडल्याची घटना आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मोठी गडबड झाली आहे. दीमा हसाओ जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. या मतदान केंद्रावर फक्त 90 मतदार आहेत. मात्र मतदानाच्या दिवशी 171 मतं पडली आहेत. हाफलोंग विधानसभेअंतर्गत हे मतदान केंद्र येतं. मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याची घटना समोर येताच पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गावच्या सरपंचाने निवडणूक आयोगाची मतदार यादी खरी असल्याचं म्हणण्यास नकार दिला आहे. त्याने आपली एक यादी समोर आणली आहे. त्यानुसारच गावातील लोकांनी मतदान केल्याचं म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असून मतदान केंद्रावरील सुरक्षेचा देखील तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन आढळून आल्यानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित केले होते. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आयोगाला सुनावलं होतं.

"क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?"; प्रियंका गांधी संतापल्या

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "क्या स्क्रिप्ट है? निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. ती गाडी भाजपा उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगाने त्यातूनच प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे काय प्रकरण आहे? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?" असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला होता. प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१AssamआसामElectionनिवडणूकVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग