शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Assam Assembly Election 2021 : कुछ तो गडबड है! फक्त 90 मतदारांची नोंद पण पडली तब्बल 171 मतं; मतदार यादीत मोठा घोळ, 5 अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 21:12 IST

Assam Assembly Election 2021 : मतदार यादीमध्ये फक्त 90 मतदारांची नोंद असताना तब्बल 171 मतं पडल्याची घटना आता समोर आली आहे.

आसाममध्ये काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठा घोटाळा झाल्याची घटना घडली आहे. मतदार यादीमध्ये फक्त 90 मतदारांची नोंद असताना तब्बल 171 मतं पडल्याची घटना आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मोठी गडबड झाली आहे. दीमा हसाओ जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. या मतदान केंद्रावर फक्त 90 मतदार आहेत. मात्र मतदानाच्या दिवशी 171 मतं पडली आहेत. हाफलोंग विधानसभेअंतर्गत हे मतदान केंद्र येतं. मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याची घटना समोर येताच पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गावच्या सरपंचाने निवडणूक आयोगाची मतदार यादी खरी असल्याचं म्हणण्यास नकार दिला आहे. त्याने आपली एक यादी समोर आणली आहे. त्यानुसारच गावातील लोकांनी मतदान केल्याचं म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असून मतदान केंद्रावरील सुरक्षेचा देखील तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन आढळून आल्यानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित केले होते. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आयोगाला सुनावलं होतं.

"क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?"; प्रियंका गांधी संतापल्या

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "क्या स्क्रिप्ट है? निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. ती गाडी भाजपा उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगाने त्यातूनच प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे काय प्रकरण आहे? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?" असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला होता. प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१AssamआसामElectionनिवडणूकVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग