शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

आसाममध्ये २.५ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात; ९.२ लाख शेतकऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 06:18 IST

शेतकऱ्यांवर यंदा दुहेरी संकट

आसामातील मोरीगाव जिल्ह्यातील भुरागाव येथील ३६ वर्षीय शेतकरी अन्वर हुसैन यांची दोन एकर भात शेती ब्रह्मपुत्रेला आलेल्या पुरात जलमय झाली आहे. आपले १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले, असे हुसैन यांनी सांगितले. ब्रह्मपुत्रेच्या आजूबाजूला शेती असलेल्या असंख्य शेतकºयांची स्थितीही हुसैन यांच्यापेक्षा वेगळी नाही. सर्वांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. कृषी महासंचालनालयाच्या अंदाजानुसार, यंदा ब्रह्मपुत्रेच्या पुरात २.५ लाख हेक्टरवरील पिके बुडाली आहेत. ९.२ लाख शेतकºयांना याचा फटका बसला आहे. १५ मे आणि १४ जुलै या काळातील ही स्थिती आहे.

मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू होण्याच्या सात महिने आधी हुसैन यांनी आपल्या शेतात मका लावला होता. शेतात पिकलेला मका ते दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये विकतात. या काळात त्यांना चांगला भाव मिळतो; पण यंदा नेमके या काळात लॉकडाऊन लागले. त्यामुळे त्यांच्या मक्याला फटका बसला. ते अक्षरश: कफल्लक झाले. त्यामुळे त्यांना आपली एक गाय ४३ हजार रुपयांना विकावी लागली.

बारपेटा जिल्ह्यातील सत्राकनाडा गावातील २५ वर्षीय शेतकरी नूर जमाल यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे मी माझा भाजीपाला आणि ताग विकू शकलेलो नाही. आता माझ्या शेतातील भातात पुराचे पाणी शिरले आहे. त्यातून माझे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आसामातील बहुतांश शेतकºयांची हीच कैफियत आहे. यंदा त्यांना लॉकडाऊन आणि नेहमीपेक्षा लवकर आलेला पूर, असा दुहेरी फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याची पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे आधीचे तयार पीक विकले गेले नाही.

आता नवीन आलेले पीक पुरामुळे नष्ट झाले आहे. राज्याचे कृषी व फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव राजेश प्रसाद यांनी सांगितले की, आमच्याकडे पुराच्या पाण्यात टिकून राहणाºया पिकांच्या जाती आहेत. सुमारे १५ दिवसपर्यंत त्या पुराच्या पाण्यात तग धरू शकतात. तथापि, यंदा पूर नेहमीपेक्षा खूपच लवकर आला आहे. त्यामुळे नुकसान होणे अटळ आहे. पूर ओसरल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज कळू शकेल. नेहमीपेक्षा यंदा नुकसान थोडे जास्त असेल, असा आमचा अंदाज आहे.राज्याचे कृषी, फलोत्पादन आणि अन्न प्रक्रियामंत्री अतुल बोरा यांनी सांगितले की, यंदा आसामातील शेतकºयांना मोठा फटका बसला आहे, यात शंका नाही. आधी कोविड-१९ लॉकडाऊनमुळे त्यांना नुकसान सोसावे लागले. फळे व इतर पिकांचे सुमारे ४० कोटींचे नुकसान यात झाले असावे, असा अंदाज आहे. आता पुराचा तडाखा शेतकºयांना बसला आहे. पुरातील नुकसानीचा आकडा आताच सांगता येणार नाही. पूर ओसरल्यानंतरच त्याचा आढावा घेतला जाऊ शकेल.

उत्तराखंड, राजस्थानात पावसाचा इशारा

उत्तराखंड, उत्तर राजस्थानात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सॅटेलाइट छायाचित्रावरुन असे दिसून येते की, उत्तराखंड, उत्तर राजस्थान, दक्षिण पंजाब, हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :floodपूर