शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

काश्मीरात भडकली होती हिंसा, पाकनं रचलं 'असं' षडयंत्र; २ डॉक्टरांबाबत CBI चा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:20 IST

सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीर प्रशासनाने गुरुवारी २ सरकारी डॉक्टरांना निलंबित केले. या २ डॉक्टरांनी जे कृत्य केले ते ऐकून कुणाचाही संताप अनावर आहे. दोन्ही डॉक्टरांनी २००९ मध्ये शोपियात बुडून मृत पावलेल्या २ युवा काश्मिरी मुली आसिया जान आणि नीलोफर जान यांचा बनावट पोस्टमोर्टम रिपोर्ट बनवला होता. या मुलींचा बुडून नव्हे तर बलात्कारानंतर मृत्यू झाल्याचे त्यांनी रिपोर्टमध्ये म्हटलं. या प्रकरणानंतर जम्मू काश्मीरसह देशात हाहाकार माजला. 

या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता या २ डॉक्टरांनी केलेले कृत्य सगळ्यांसमोर आले आहे. पाकिस्तानच्या आयएसआयसोबत मिळून दोघांनी हे षडयंत्र रचले होते. दोन्ही डॉक्टरांनी मुलींच्या मृत्यू  रिपोर्टमध्ये बलात्कारानंतर हत्या दाखवून धार्मिक दंगली आणि काश्मीर खोऱ्यात हिंसाचार घडवण्याचा डाव होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. 

सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे. सीबीआयच्या तपासात आढळले की, डॉक्टरांनी पोस्टमोर्टम रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला होता. एम्स आणि सेंट्रल फॉरेन्सिक लॅबच्या निष्कर्षावरून या मुलींचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे आढळले. त्याचसोबत पाण्यात बुडण्यापूर्वी मुलींवर कुठलाही अत्याचार झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या मुली पाण्यात बुडाल्याने नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर कुठेही बलात्कार आणि बळजबरी केल्याचे पुरावे सापडले नाही. 

पाकिस्तानी एजेन्सीसाठी करत होते कामडॉ. निघत शाहीन चिलू एक स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्या चाडुरा, बडगाम इथं उपजिल्हा रुग्णालयात तैनात असतात. डॉ. बिलाल अहमद दलाल, वैद्यकीय अधिकारी आहेत. हे दोघेही शोपिया सरकारी रुग्णालयात काम करत होते. हे दोघेही पाकिस्तानी एजेन्सीसाठी काम करत असल्याचे सीबीआय तपासात उघड झाले. 

काश्मीरमध्ये भडकली होती हिंसाया दोन्ही डॉक्टरांनी चुकीचा रिपोर्ट बनवत दोन्ही महिलांसोबत बलात्कार आणि हत्या झाल्याचं सांगितले. हे भारताविरोधात एक षडयंत्र होते. दोन्ही डॉक्टरांची त्यात महत्त्वाची भूमिका होती. १७ वर्षीय आसिया जान आणि २२ वर्षीय नीलोफर जान यांच्या बलात्कार आणि हत्येच्या खोट्या बातमीनं काश्मीरमध्ये हिंसा भडकली होती. त्यानंतर अनेक भागात जमावाचा आणि सुरक्षा जवानांमध्ये झटापट झाली होती. या घटनेनंतर अनेक युवक दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते. 

६ हजार कोटींचे झाले नुकसानकाश्मीर हिंसाचारात ४२ ठिकाणी बंदचे आवाहन केले होते. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात ७ लोकांचा मृत्यू झाला होता. ३५ पोलीस, निमलष्करी दलातील जवानांसह १३५ लोक जखमी झाले होते. या काळात ६ हजार कोटींचे नुकसान झाले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर