शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरात भडकली होती हिंसा, पाकनं रचलं 'असं' षडयंत्र; २ डॉक्टरांबाबत CBI चा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:20 IST

सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीर प्रशासनाने गुरुवारी २ सरकारी डॉक्टरांना निलंबित केले. या २ डॉक्टरांनी जे कृत्य केले ते ऐकून कुणाचाही संताप अनावर आहे. दोन्ही डॉक्टरांनी २००९ मध्ये शोपियात बुडून मृत पावलेल्या २ युवा काश्मिरी मुली आसिया जान आणि नीलोफर जान यांचा बनावट पोस्टमोर्टम रिपोर्ट बनवला होता. या मुलींचा बुडून नव्हे तर बलात्कारानंतर मृत्यू झाल्याचे त्यांनी रिपोर्टमध्ये म्हटलं. या प्रकरणानंतर जम्मू काश्मीरसह देशात हाहाकार माजला. 

या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता या २ डॉक्टरांनी केलेले कृत्य सगळ्यांसमोर आले आहे. पाकिस्तानच्या आयएसआयसोबत मिळून दोघांनी हे षडयंत्र रचले होते. दोन्ही डॉक्टरांनी मुलींच्या मृत्यू  रिपोर्टमध्ये बलात्कारानंतर हत्या दाखवून धार्मिक दंगली आणि काश्मीर खोऱ्यात हिंसाचार घडवण्याचा डाव होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. 

सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे. सीबीआयच्या तपासात आढळले की, डॉक्टरांनी पोस्टमोर्टम रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला होता. एम्स आणि सेंट्रल फॉरेन्सिक लॅबच्या निष्कर्षावरून या मुलींचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे आढळले. त्याचसोबत पाण्यात बुडण्यापूर्वी मुलींवर कुठलाही अत्याचार झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या मुली पाण्यात बुडाल्याने नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर कुठेही बलात्कार आणि बळजबरी केल्याचे पुरावे सापडले नाही. 

पाकिस्तानी एजेन्सीसाठी करत होते कामडॉ. निघत शाहीन चिलू एक स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्या चाडुरा, बडगाम इथं उपजिल्हा रुग्णालयात तैनात असतात. डॉ. बिलाल अहमद दलाल, वैद्यकीय अधिकारी आहेत. हे दोघेही शोपिया सरकारी रुग्णालयात काम करत होते. हे दोघेही पाकिस्तानी एजेन्सीसाठी काम करत असल्याचे सीबीआय तपासात उघड झाले. 

काश्मीरमध्ये भडकली होती हिंसाया दोन्ही डॉक्टरांनी चुकीचा रिपोर्ट बनवत दोन्ही महिलांसोबत बलात्कार आणि हत्या झाल्याचं सांगितले. हे भारताविरोधात एक षडयंत्र होते. दोन्ही डॉक्टरांची त्यात महत्त्वाची भूमिका होती. १७ वर्षीय आसिया जान आणि २२ वर्षीय नीलोफर जान यांच्या बलात्कार आणि हत्येच्या खोट्या बातमीनं काश्मीरमध्ये हिंसा भडकली होती. त्यानंतर अनेक भागात जमावाचा आणि सुरक्षा जवानांमध्ये झटापट झाली होती. या घटनेनंतर अनेक युवक दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते. 

६ हजार कोटींचे झाले नुकसानकाश्मीर हिंसाचारात ४२ ठिकाणी बंदचे आवाहन केले होते. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात ७ लोकांचा मृत्यू झाला होता. ३५ पोलीस, निमलष्करी दलातील जवानांसह १३५ लोक जखमी झाले होते. या काळात ६ हजार कोटींचे नुकसान झाले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर