शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

काश्मीरात भडकली होती हिंसा, पाकनं रचलं 'असं' षडयंत्र; २ डॉक्टरांबाबत CBI चा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:20 IST

सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीर प्रशासनाने गुरुवारी २ सरकारी डॉक्टरांना निलंबित केले. या २ डॉक्टरांनी जे कृत्य केले ते ऐकून कुणाचाही संताप अनावर आहे. दोन्ही डॉक्टरांनी २००९ मध्ये शोपियात बुडून मृत पावलेल्या २ युवा काश्मिरी मुली आसिया जान आणि नीलोफर जान यांचा बनावट पोस्टमोर्टम रिपोर्ट बनवला होता. या मुलींचा बुडून नव्हे तर बलात्कारानंतर मृत्यू झाल्याचे त्यांनी रिपोर्टमध्ये म्हटलं. या प्रकरणानंतर जम्मू काश्मीरसह देशात हाहाकार माजला. 

या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता या २ डॉक्टरांनी केलेले कृत्य सगळ्यांसमोर आले आहे. पाकिस्तानच्या आयएसआयसोबत मिळून दोघांनी हे षडयंत्र रचले होते. दोन्ही डॉक्टरांनी मुलींच्या मृत्यू  रिपोर्टमध्ये बलात्कारानंतर हत्या दाखवून धार्मिक दंगली आणि काश्मीर खोऱ्यात हिंसाचार घडवण्याचा डाव होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. 

सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे. सीबीआयच्या तपासात आढळले की, डॉक्टरांनी पोस्टमोर्टम रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला होता. एम्स आणि सेंट्रल फॉरेन्सिक लॅबच्या निष्कर्षावरून या मुलींचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे आढळले. त्याचसोबत पाण्यात बुडण्यापूर्वी मुलींवर कुठलाही अत्याचार झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या मुली पाण्यात बुडाल्याने नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर कुठेही बलात्कार आणि बळजबरी केल्याचे पुरावे सापडले नाही. 

पाकिस्तानी एजेन्सीसाठी करत होते कामडॉ. निघत शाहीन चिलू एक स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्या चाडुरा, बडगाम इथं उपजिल्हा रुग्णालयात तैनात असतात. डॉ. बिलाल अहमद दलाल, वैद्यकीय अधिकारी आहेत. हे दोघेही शोपिया सरकारी रुग्णालयात काम करत होते. हे दोघेही पाकिस्तानी एजेन्सीसाठी काम करत असल्याचे सीबीआय तपासात उघड झाले. 

काश्मीरमध्ये भडकली होती हिंसाया दोन्ही डॉक्टरांनी चुकीचा रिपोर्ट बनवत दोन्ही महिलांसोबत बलात्कार आणि हत्या झाल्याचं सांगितले. हे भारताविरोधात एक षडयंत्र होते. दोन्ही डॉक्टरांची त्यात महत्त्वाची भूमिका होती. १७ वर्षीय आसिया जान आणि २२ वर्षीय नीलोफर जान यांच्या बलात्कार आणि हत्येच्या खोट्या बातमीनं काश्मीरमध्ये हिंसा भडकली होती. त्यानंतर अनेक भागात जमावाचा आणि सुरक्षा जवानांमध्ये झटापट झाली होती. या घटनेनंतर अनेक युवक दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते. 

६ हजार कोटींचे झाले नुकसानकाश्मीर हिंसाचारात ४२ ठिकाणी बंदचे आवाहन केले होते. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात ७ लोकांचा मृत्यू झाला होता. ३५ पोलीस, निमलष्करी दलातील जवानांसह १३५ लोक जखमी झाले होते. या काळात ६ हजार कोटींचे नुकसान झाले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर