शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“मुस्लिम असल्यामुळेच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवलं गेलं”: आसिफचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:29 IST

दिल्ली दंगलीप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या आसिफ इकबाल तन्हा याने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली: दिल्ली दंगलीप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या आसिफ इकबाल तन्हा याने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आसिफ जामिया मिलिया इस्लामियाचा विद्यार्थी आहे. दिल्ली दंगलीप्रकरणी आसिफला मे २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने आसिफसह नताशा नरवाल आणि देवांगना कलिता यांना जामीन मंजूर केला होता. यासंदर्भातल बोलताना, मुस्लिम असल्यामुळेच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवले गेले, असा दावा आसिफने केला आहे. (asif iqbal tanha claims that being a muslim made me a jihadist and anti national)

या कठीण प्रसंगी आई आणि वडिलांनी दिलेला पाठिंबा हा कोणत्याही शब्दांत वर्णन करता येणार नाही. जेलमध्ये जाणे सर्वांच्या नशिबी नसते, असे वडील म्हणायचे. तर, दुसरीकडे काही चुकीचे केले नाही, तर मला नक्की न्याय मिळेल, असा विश्वास आईने व्यक्त केला, असे आसिफ यावेळी बोलताना म्हणाला. 

“उपाशी, बेरोजगाराला योग करायला लावणं अत्यंत क्रूरपणाचं”; माजी न्यायमूर्तींचे ताशेरे

मुस्लिम असल्यामुळेच देशविरोधी ठरवलं गेलं

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आसिफ म्हणाला की, मी मूळचा झारखंडचा आहे. माझे प्रारंभिक शिक्षण मदरशात झाले आहे. पुढील शिक्षणासाठी मी दिल्लीला आलो. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्रवेश मिळाला. राजकीय कारकिर्दीची सुरुवात येथूनच झाली. कॅम्पसमध्ये दिलेल्या भाषणाचा उपस्थितांवर मोठा प्रभाव पडला. त्यामुळे तो एकदम प्रकाशझोतात आला. मी केवळ मुस्लिम आहे, म्हणूनच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवले गेले. मी मुसलमान असल्याची शिक्षा मला दिली जातेय, असा दावा आसिफने केला. 

“कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA विरोधी आंदोलनादरम्यान दिल्लीत उसळलेल्या दंगलीप्रकरणी जेएनयूसह अन्य विद्यापीठांच्या काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. आंदोलने, निषेध करण्याचा मूलभूत अधिकार आणि दहशतवादी कारवाया यांच्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. त्यामुळे निषेध करणे हा दहशतवाद नाही. सरकार आपल्या विरोधात निदर्शने करण्याचा अधिकार आणि दहशतवादी कारवाया यांच्यामध्ये फरक करुन शकत नाही? जर अशीच मानसिकता कायम राहिली तर भविष्यात लोकशाहीवर वाईट दिवस येतील, असे दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी म्हटले होते.  

टॅग्स :Politicsराजकारणjamia protestजामियाdelhi violenceदिल्ली