शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

“मुस्लिम असल्यामुळेच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवलं गेलं”: आसिफचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:29 IST

दिल्ली दंगलीप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या आसिफ इकबाल तन्हा याने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली: दिल्ली दंगलीप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या आसिफ इकबाल तन्हा याने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आसिफ जामिया मिलिया इस्लामियाचा विद्यार्थी आहे. दिल्ली दंगलीप्रकरणी आसिफला मे २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने आसिफसह नताशा नरवाल आणि देवांगना कलिता यांना जामीन मंजूर केला होता. यासंदर्भातल बोलताना, मुस्लिम असल्यामुळेच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवले गेले, असा दावा आसिफने केला आहे. (asif iqbal tanha claims that being a muslim made me a jihadist and anti national)

या कठीण प्रसंगी आई आणि वडिलांनी दिलेला पाठिंबा हा कोणत्याही शब्दांत वर्णन करता येणार नाही. जेलमध्ये जाणे सर्वांच्या नशिबी नसते, असे वडील म्हणायचे. तर, दुसरीकडे काही चुकीचे केले नाही, तर मला नक्की न्याय मिळेल, असा विश्वास आईने व्यक्त केला, असे आसिफ यावेळी बोलताना म्हणाला. 

“उपाशी, बेरोजगाराला योग करायला लावणं अत्यंत क्रूरपणाचं”; माजी न्यायमूर्तींचे ताशेरे

मुस्लिम असल्यामुळेच देशविरोधी ठरवलं गेलं

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आसिफ म्हणाला की, मी मूळचा झारखंडचा आहे. माझे प्रारंभिक शिक्षण मदरशात झाले आहे. पुढील शिक्षणासाठी मी दिल्लीला आलो. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्रवेश मिळाला. राजकीय कारकिर्दीची सुरुवात येथूनच झाली. कॅम्पसमध्ये दिलेल्या भाषणाचा उपस्थितांवर मोठा प्रभाव पडला. त्यामुळे तो एकदम प्रकाशझोतात आला. मी केवळ मुस्लिम आहे, म्हणूनच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवले गेले. मी मुसलमान असल्याची शिक्षा मला दिली जातेय, असा दावा आसिफने केला. 

“कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA विरोधी आंदोलनादरम्यान दिल्लीत उसळलेल्या दंगलीप्रकरणी जेएनयूसह अन्य विद्यापीठांच्या काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. आंदोलने, निषेध करण्याचा मूलभूत अधिकार आणि दहशतवादी कारवाया यांच्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. त्यामुळे निषेध करणे हा दहशतवाद नाही. सरकार आपल्या विरोधात निदर्शने करण्याचा अधिकार आणि दहशतवादी कारवाया यांच्यामध्ये फरक करुन शकत नाही? जर अशीच मानसिकता कायम राहिली तर भविष्यात लोकशाहीवर वाईट दिवस येतील, असे दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी म्हटले होते.  

टॅग्स :Politicsराजकारणjamia protestजामियाdelhi violenceदिल्ली