शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

“मुस्लिम असल्यामुळेच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवलं गेलं”: आसिफचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:29 IST

दिल्ली दंगलीप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या आसिफ इकबाल तन्हा याने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली: दिल्ली दंगलीप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या आसिफ इकबाल तन्हा याने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आसिफ जामिया मिलिया इस्लामियाचा विद्यार्थी आहे. दिल्ली दंगलीप्रकरणी आसिफला मे २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने आसिफसह नताशा नरवाल आणि देवांगना कलिता यांना जामीन मंजूर केला होता. यासंदर्भातल बोलताना, मुस्लिम असल्यामुळेच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवले गेले, असा दावा आसिफने केला आहे. (asif iqbal tanha claims that being a muslim made me a jihadist and anti national)

या कठीण प्रसंगी आई आणि वडिलांनी दिलेला पाठिंबा हा कोणत्याही शब्दांत वर्णन करता येणार नाही. जेलमध्ये जाणे सर्वांच्या नशिबी नसते, असे वडील म्हणायचे. तर, दुसरीकडे काही चुकीचे केले नाही, तर मला नक्की न्याय मिळेल, असा विश्वास आईने व्यक्त केला, असे आसिफ यावेळी बोलताना म्हणाला. 

“उपाशी, बेरोजगाराला योग करायला लावणं अत्यंत क्रूरपणाचं”; माजी न्यायमूर्तींचे ताशेरे

मुस्लिम असल्यामुळेच देशविरोधी ठरवलं गेलं

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आसिफ म्हणाला की, मी मूळचा झारखंडचा आहे. माझे प्रारंभिक शिक्षण मदरशात झाले आहे. पुढील शिक्षणासाठी मी दिल्लीला आलो. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्रवेश मिळाला. राजकीय कारकिर्दीची सुरुवात येथूनच झाली. कॅम्पसमध्ये दिलेल्या भाषणाचा उपस्थितांवर मोठा प्रभाव पडला. त्यामुळे तो एकदम प्रकाशझोतात आला. मी केवळ मुस्लिम आहे, म्हणूनच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवले गेले. मी मुसलमान असल्याची शिक्षा मला दिली जातेय, असा दावा आसिफने केला. 

“कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA विरोधी आंदोलनादरम्यान दिल्लीत उसळलेल्या दंगलीप्रकरणी जेएनयूसह अन्य विद्यापीठांच्या काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. आंदोलने, निषेध करण्याचा मूलभूत अधिकार आणि दहशतवादी कारवाया यांच्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. त्यामुळे निषेध करणे हा दहशतवाद नाही. सरकार आपल्या विरोधात निदर्शने करण्याचा अधिकार आणि दहशतवादी कारवाया यांच्यामध्ये फरक करुन शकत नाही? जर अशीच मानसिकता कायम राहिली तर भविष्यात लोकशाहीवर वाईट दिवस येतील, असे दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी म्हटले होते.  

टॅग्स :Politicsराजकारणjamia protestजामियाdelhi violenceदिल्ली