शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई विकास बँकेनेही केली भारताच्या विकास दरामध्ये घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 04:07 IST

आता ५.१ टक्केच; औद्योगिक मंदी, रोखीचे संकट कारणीभूत

नवी दिल्ली : भारताचा या आर्थिक वर्षाचा विकासाचा दर ५.१ टक्के इतकाच असेल, असा अंदाज आशियाई विकास बँकेने व्यक्त केला असून, आर्थिक मंदी व बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्थेची वाढ संथ असेल, असेल असे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. पुढील वर्षीही विकासाच्या दरात वाढ शक्य आहे, असे, आशियाई विकास बँकेने म्हटले आहे.

मूडीज, फिंच, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या सर्वांनीही भारताचा विकासाचा दर कमी असेल, असे या आधी म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने विकास दर ५ टक्के राहील, असे गेल्याच आठवड्यात पतधोरण बैठकीनंतर म्हटले होते. त्या आधी हा दर ६.१ टक्के असेल, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. आशियाई बँकेने, तसेच मत व्यक्त करताना भारताबरोबरच चीनच्या विकास दरातही घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे रोजगारनिर्मितीला खिळ बसली आहे, तसेच रोखीचे संकटही गडद होत चालले आहे. त्यामुळे विकास दरात वाढ होण्यात अडचणी येत आहे, असे या बँकेने नमूद केले आहे. भारत व चीन या दोन मोठ्या देशांतील मंदीचा परिणाम आशियाई देशांवर होत असल्याचेही या बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. संपूर्ण आशिया खंडात सध्या मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे आशियाई खंडाचा विकास दर ५.२ राहील, असे बँकेचे मत आहे. या आधी हा दर ५.४ टक्के असेल, असे बँकेने म्हटले होते.

व्यापारी युद्धाचा चीनला फटका

आशियाई विकास बँकेने चीनचा विकासदर या वर्षी ६.१ टक्के, तर पुढील वर्षी त्यात आणखी घट होऊ न ५.८ असेल, असे मत व्यक्त केले आहे. अमेरिका व चीनमध्ये सध्या जे व्यापारयुद्ध सुरू आहे, त्याचा चीनचा व्यापार आणि उद्योग यांच्यावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे बँकेने पुढील वर्षी त्या देशाच्या विकास दरात आणखी घट होईल, असे म्हटले आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाbankबँकIndiaभारतReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक