शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या पदरात निराशाच, सूट मिळणार नाही; रेल्वे मंत्र्यांनी संसदेत लेखाजोखाच मांडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:58 IST

रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात दिली जाणारी सवलत आता देणं परवडणारं असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत म्हटलं आहे.

नवी दिल्ली-

रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात दिली जाणारी सवलत आता देणं परवडणारं असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत म्हटलं आहे. यात्री सेवेसाठी गेल्यावर्षी तब्बल ५९,००० कोटी रुपयांची सब्सिडी दिली गेली असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी सभागृहात दिली. यासोबतच सार्वजनिक वाहतूकीतील कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन देखील खूप जास्त असल्याचं स्पष्ट शब्दात अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत पुन्हा केव्हा सुरू जाईल याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावरील उत्तरात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहासमोर रेल्वेच्या आर्थिक परिस्थिताचा लेखाजोखाच सादर केला. कोविड काळ सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात दिल्या सर्व सवलती बंद करण्यात आल्या होत्या. 

अश्विनी वैष्णव म्हणाले, रेल्वे प्रवाशांच्या सेवांसाठी गेल्या वर्षी ५९,००० कोटींची सब्सिडी दिली गेली आहे. जी खूप मोठी आहे. इतकी की देशातील काही राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पाएवढी आहे. रेल्वेचं वार्षिक पेन्शन बिल ६० हजार कोटी रुपये आहे. पगारावर ९७ हजार कोटींचा खर्च केला गेला आहे तर इंधनावर ४० हजार कोटी खर्च केले जात आहेत. 

आम्ही गेल्या वर्षी ५९ हजार कोटींची सब्सिडी दिली आहे. नव्या सुविधाही दिल्या आहेत. जर नवे निर्णय घ्यायचे असतील तर सध्या रेल्वेच्या आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रीत करावं लागेल, असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. 

प्रत्येक तिकीटावर ५५ टक्के सवलतकोरोना महामारी आधी रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि अधिस्विकृती धारक पत्रकारांना सूट मिळायची ती सरकार पुन्हा सुरू करणार आहे का?, असा प्रश्न लोकसभा खासदार सुरेश धानोरकर यांनी उपस्थित केला. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी आजही प्रत्येक रेल्वे प्रवाशाला तिकीटात जवळपास ५५ टक्के सूट दिली जात असल्याची माहिती दिली. जर एखाद्या प्रवाशासाठी रेल्वेला १.१६ रुपये प्रवास खर्च येत असेल तर त्यातून फक्त ४० ते ४८ पैसेच प्रवाशाकडून आकारले जातात. गेल्या वर्षी फक्त यात्री सेवा देण्यात एकूण ५९ हजार कोटींची सवलत दिली गेली आहे. 

रेल्वेचं दरवर्षी ५ हजार किमीहून अधिक मार्गाचं इलेक्ट्रिफिकेशन केलं जात आहे. तर दरदिवशी १२ किमी लांबीचे नवे रेल्वेरुळ बनवण्यात येत आहे. हाच दर यूपीए सरकारच्या काळात ४ किमी प्रतिदिन इतका होता, असंही वैष्णव म्हणाले. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वे