शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Asaram Case Verdict: जोधपूर पोलिसांनी 11 दिवसात असं गाठलं आसाराम बापूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 13:04 IST

सुरूवातील कुटुंबाच्या तक्रारीवर मला विश्वास बसला नाही.

जोधपूर- स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला बुधवारी 2013मध्ये घडलेल्या बलात्कारी प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं. विशेष न्यायाधीश मधुसुधन शर्मा यांनी जोधपूर मध्यवर्ती कारागृह विशेष कोर्टात आसाराम बापूला दोषी ठरवलं. उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील असलेल्या आणि आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरजवळ असलेल्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला. 1 सप्टेंबर 2013 रोजी आसाराम बापूला अटक करत त्याची रवानगी जोधपूर कोर्टात करण्यात आली होती. तेव्हापासून आसाराम न्यायालयीन कोठडीत आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुलीच्या तक्रारीनंतर जोधपूर पोलिसांनी 11 दिवसात संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत आसारामला बेड्या ठोकल्या. 21 ऑगस्ट 2013 रोजी अल्पवयीन पीडित मुलगी, तिचे वडील दिल्ली पोलिसांच्या पथकासह पोलीस अधिकारी अजय लाल लांबा यांना भेटायला आले होते. त्यावेळी लांबा ऑफिसमध्ये होते. लांबा त्यावेळी पोलीस उपायुक्त होते. पीडित मुलीने त्यावेळी आसाराम बापूवर लैंगिक शोषणाचा आरोप करत तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यासाठीच ती जोधपूर पोलीस स्टेशनमध्ये आली होती. 

'सुरूवातील कुटुंबाच्या तक्रारीवर मला विश्वास बसला नाही. एका मोठ्या व्यक्तीची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असं मला सुरूवातीला वाटलं. माझा विचार चुकीचा आहे हे दाखवून देण्यासाठी त्या मुलीने मला जोधपूरपासून 38 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मनाई गावातील आसारामच्या आश्रमाचा संपूर्ण नकाशा सांगितला. त्याच आश्रमात मुलीवर बलात्कार झाला होता. जेथे गुन्हा घडला त्या ठिकाणी गेल्याशिवाय खोलीचा नकाशा देणं अशक्य असल्याचं आमच्या लक्षात आलं. तिथूनच आमच्या तपासाला सुरूवात झाली, असं लांबा यांनी सांगितलं. त्यानंतर मेरठमधील एक कुटुंब आमच्या संपर्कात आलं. त्या कुटुंबानेही आसाराम बापूवर स्थानिक पोलिसात अशाच प्रकारची तक्रार दाखल करायला गेले होते. त्या कुटुंबाला भेटल्यावर पोलीस तक्रार दाखल करुन घ्यायला तयार नसल्याचं आम्हाला समजलं.  तिथूनच आसारामच्या गुन्ह्याचा दुसरा धागा आम्हाला सापडला. 

आसाराम बापू कुठे आहे? याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नव्हती. पण तरीही आम्ही आमचं एक पथक इंदूरमधील त्याच्या आश्रमात पाठवलं. आश्रमात पथक असताना आम्ही जोधपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आसाराम बापू आमच्या रडारवर असल्याचं माध्यमांना सांगितलं. ही गोष्ट आसारामला समजल्यावर 31 ऑगस्ट 2013 रोजी दुपारच्या सुमारास तो भोपाळ एअरपोर्सवर आला. ही माहिती आम्ही माध्यमांपर्यंत पोहचविली.नंतर माध्यमांनी त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. इंदूरच्या आश्रमात पोलीस पथक असल्याची जराशीही कल्पना नसलेला आसाराम बापू इंदूर आश्रमात पोहचला. 

आसाराम व त्याच्या भक्तांनी आमिष दाखवून भुलविण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर भरमसाठ पैसा ते जीवे मारण्याची धमकी असं सगळं आसारामच्या समर्थकांनी केलं, असंही लांबा यांनी सांगितलं. आसारामला अटक केल्यानंतर लांबा यांना जीवे मारण्याची धमकी असलेली एकुण 1600 पत्रं मिळाली. 

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू