शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Asaram Case Verdict: जोधपूर पोलिसांनी 11 दिवसात असं गाठलं आसाराम बापूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 13:04 IST

सुरूवातील कुटुंबाच्या तक्रारीवर मला विश्वास बसला नाही.

जोधपूर- स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला बुधवारी 2013मध्ये घडलेल्या बलात्कारी प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं. विशेष न्यायाधीश मधुसुधन शर्मा यांनी जोधपूर मध्यवर्ती कारागृह विशेष कोर्टात आसाराम बापूला दोषी ठरवलं. उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील असलेल्या आणि आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरजवळ असलेल्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला. 1 सप्टेंबर 2013 रोजी आसाराम बापूला अटक करत त्याची रवानगी जोधपूर कोर्टात करण्यात आली होती. तेव्हापासून आसाराम न्यायालयीन कोठडीत आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुलीच्या तक्रारीनंतर जोधपूर पोलिसांनी 11 दिवसात संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत आसारामला बेड्या ठोकल्या. 21 ऑगस्ट 2013 रोजी अल्पवयीन पीडित मुलगी, तिचे वडील दिल्ली पोलिसांच्या पथकासह पोलीस अधिकारी अजय लाल लांबा यांना भेटायला आले होते. त्यावेळी लांबा ऑफिसमध्ये होते. लांबा त्यावेळी पोलीस उपायुक्त होते. पीडित मुलीने त्यावेळी आसाराम बापूवर लैंगिक शोषणाचा आरोप करत तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यासाठीच ती जोधपूर पोलीस स्टेशनमध्ये आली होती. 

'सुरूवातील कुटुंबाच्या तक्रारीवर मला विश्वास बसला नाही. एका मोठ्या व्यक्तीची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असं मला सुरूवातीला वाटलं. माझा विचार चुकीचा आहे हे दाखवून देण्यासाठी त्या मुलीने मला जोधपूरपासून 38 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मनाई गावातील आसारामच्या आश्रमाचा संपूर्ण नकाशा सांगितला. त्याच आश्रमात मुलीवर बलात्कार झाला होता. जेथे गुन्हा घडला त्या ठिकाणी गेल्याशिवाय खोलीचा नकाशा देणं अशक्य असल्याचं आमच्या लक्षात आलं. तिथूनच आमच्या तपासाला सुरूवात झाली, असं लांबा यांनी सांगितलं. त्यानंतर मेरठमधील एक कुटुंब आमच्या संपर्कात आलं. त्या कुटुंबानेही आसाराम बापूवर स्थानिक पोलिसात अशाच प्रकारची तक्रार दाखल करायला गेले होते. त्या कुटुंबाला भेटल्यावर पोलीस तक्रार दाखल करुन घ्यायला तयार नसल्याचं आम्हाला समजलं.  तिथूनच आसारामच्या गुन्ह्याचा दुसरा धागा आम्हाला सापडला. 

आसाराम बापू कुठे आहे? याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नव्हती. पण तरीही आम्ही आमचं एक पथक इंदूरमधील त्याच्या आश्रमात पाठवलं. आश्रमात पथक असताना आम्ही जोधपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आसाराम बापू आमच्या रडारवर असल्याचं माध्यमांना सांगितलं. ही गोष्ट आसारामला समजल्यावर 31 ऑगस्ट 2013 रोजी दुपारच्या सुमारास तो भोपाळ एअरपोर्सवर आला. ही माहिती आम्ही माध्यमांपर्यंत पोहचविली.नंतर माध्यमांनी त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. इंदूरच्या आश्रमात पोलीस पथक असल्याची जराशीही कल्पना नसलेला आसाराम बापू इंदूर आश्रमात पोहचला. 

आसाराम व त्याच्या भक्तांनी आमिष दाखवून भुलविण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर भरमसाठ पैसा ते जीवे मारण्याची धमकी असं सगळं आसारामच्या समर्थकांनी केलं, असंही लांबा यांनी सांगितलं. आसारामला अटक केल्यानंतर लांबा यांना जीवे मारण्याची धमकी असलेली एकुण 1600 पत्रं मिळाली. 

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू