शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

“कोण आहेत राहुल गांधी? मी त्यांना ओळखत नाही”; असदुद्दीन ओवेसींची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 10:40 IST

आगामी दोन ते तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

नवी दिल्ली: आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यापैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. एका कार्यक्रमात बोलताना एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच राहुल गांधींना (Rahul Gandhi) ओळखत नसल्याचे सांगत निशाणा साधला. 

ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसविरहीत आघाडीचे सूतोवाच केले होते. त्यानंतर यासंदर्भात देशभरात चर्चा सुरू झाली असून, अनेक काँग्रेस नेत्यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. यातच आता आजतक आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी यांनी राहुल गांधींना ओळखत नसल्याचे सांगत काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

कोण आहेत राहुल गांधी? मी ओळखत नाही

गेली काही वर्षे काँग्रेससोबत राहिल्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की, आगामी दोन ते तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला. तसेच कोण आहेत राहुल गांधी? मी ओळखत नाही. तो कोण आहे हे तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा, असा खोचक टोलाही लगावला. आम्हाला प्रत्येक पक्षाची बी-टीम म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही राहुल गांधींना इथे बोलावले, तर ते भाजपासारखीच भाषा बोलतील आणि तशीच भाषा अखिलेश यादवही बोलतील, असे ओवेसी म्हणाले. 

त्यांनी इतर राज्यांमध्ये लढत राहावे

ममता बॅनर्जी प्रमुख असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष आता पश्चिम बंगालच्या बाहेर पडत त्रिपुरा, गोव्यासह अन्य राज्यांमध्ये विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, त्यांनी इतर राज्यांमध्ये लढत राहावे. आता ममता बॅनर्जी यांना बी-टीम बनवण्यात आले आहे, मी यावर आक्षेप घेतला आहे. बी-टीम असणे हा माझा टॅग आहे. पण आता काँग्रेस त्यांना भाजपाची बी-टीम म्हणत आहे. गोव्यात त्यांचा कसा सामना होईल हे पाहणे मनोरंजक ठरेल, असे ओवेसी यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी असदुद्दीन ओवेसी यांना प्रत्युत्तर दिले. एआयएमआयएमसारखे पक्ष आणि ओवेसींसारखे नेते काँग्रेसने केरळमधून उभे केले. जिथे त्यांनी मुस्लिम लीगशी युती केली, बंगालमध्ये जिथे त्यांनी अब्बास पीरजादा यांच्या पक्षाशी युती केली आणि आसाममध्ये जिथे बद्रुद्दीन अजमलच्या पक्षाशी काँग्रेसने युती केली, असा पलटवार केला.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRahul Gandhiराहुल गांधी