शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

"तुमच्यासाठी भारत देश मोठा आहे की तुमचं हिंदुत्व?" ओवेसींचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 15:13 IST

"एक चौकीदार, दुसरा दुकानदार"; एकाच वेळी मोदी, गांधींना टोला

Asaduddin Owaisi, No Confidence Motion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर मंगळवार पासून चर्चा सुरू असून आज संध्याकाळी मोदी त्यावर उत्तर देणार आहे. या चर्चेदरम्यान आज, एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर तोंडसुख घेतले. जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबार, मणिपूर हिंसाचार, हिजाबचा मुद्दा, UCC या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला त्यांनी घेरले. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत, त्यांना सरकारने अजून का आणले नाही?, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. यावेळी बोलताना, भारत देश महत्त्वाचा की हिंदुत्व महत्त्वाचे, असा सवाल त्यांनी केला. याशिवाय, एक चौकीदार तर दुसरा दुकानदार असे म्हणत त्यांनी एकाच वेळी दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्याची खिल्ली उडवली.

"बिलकिस बानो या देशाची मुलगी होती की नाही? तिच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची सुटका करण्यात आली. आज चीन सीमेवर काय सुरू आहे? तरीही शी जिनपिंगला अहमदाबादला बोलावून पाहुणचार केला जातो. कुलभूषण जाधव पाकिस्तानात आहेत, त्यांना परत का आणले जात नाही? या देशाला द्वेषाच्या राजकारणात ओढू नका, अल्पसंख्याकांचा बजेट ४० टक्क्यांनी कमी केले. फेलोशिप कमी केली. उच्च शिक्षणापासून मुस्लीम समाजातील तरूणाला वंचित ठेवले. मोदी सरकारमध्ये एकही मुस्लीम नाही हा कुठला न्याय? हरयाणा आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर ओवेसींनी टीका केली. कवितेतून टोमणा मारत ओवेसी म्हणाले की, तु्म्हाला आमच्या लोकांना न्याय देता येत नसेल, तुम्ही काही करू शकत नसाल, तर खाली का उतरत नाही? पंतप्रधान जेव्हा सभागृहात उत्तर देण्यासाठी येतील तेव्हा त्यांनी सांगावे की देश मोठा की हिंदुत्व? असा सवाल त्यांनी केला.

ट्रेनमध्ये लोकांची ओळख करून त्यांना मारले जाते. देशात राहायचे असेल तर मोदींना मत द्यावे लागेल असं धमकावतात. हे आपल्या देशात काय चाललंय? लोक कपडे, दाढी पाहून मारले जातात. नूंहमध्ये मुस्लिमांची घरे पाडली. मुस्लिमांसाठी द्वेष पसरवला जात आहे. हिजाबचा मुद्दा पुढे करून शिक्षणापासून तोडले जाते. चीन आपल्या देशात घुसून बसलाय त्यावर तुम्ही काही बोलत नाही, असा आरोप त्यांनी केला.

"तुम्ही म्हणत आहात की मणिपूरचे मुख्यमंत्री सहकार्य करत आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांना हटवायचे नाही. आसाम रायफल्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. महिलांवर अत्याचार होत आहेत. ट्रेन मध्ये नाव विचारून मारले जात आहे. देशात राहायचे असेल तर मोदींना मतदान करावे लागेल, असे सांगितले जात आहे. हे सर्व आपल्या देशात का होत आहे. हे सारं योग्य नाही", असा मुद्दाही त्यांनी संसदेत बोलताना मांडला.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी