शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
3
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
4
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
5
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
8
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
9
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
10
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
11
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
12
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
13
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
14
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
15
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
16
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
17
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
18
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
19
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
20
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्यासाठी भारत देश मोठा आहे की तुमचं हिंदुत्व?" ओवेसींचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 15:13 IST

"एक चौकीदार, दुसरा दुकानदार"; एकाच वेळी मोदी, गांधींना टोला

Asaduddin Owaisi, No Confidence Motion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर मंगळवार पासून चर्चा सुरू असून आज संध्याकाळी मोदी त्यावर उत्तर देणार आहे. या चर्चेदरम्यान आज, एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर तोंडसुख घेतले. जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबार, मणिपूर हिंसाचार, हिजाबचा मुद्दा, UCC या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला त्यांनी घेरले. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत, त्यांना सरकारने अजून का आणले नाही?, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. यावेळी बोलताना, भारत देश महत्त्वाचा की हिंदुत्व महत्त्वाचे, असा सवाल त्यांनी केला. याशिवाय, एक चौकीदार तर दुसरा दुकानदार असे म्हणत त्यांनी एकाच वेळी दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्याची खिल्ली उडवली.

"बिलकिस बानो या देशाची मुलगी होती की नाही? तिच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची सुटका करण्यात आली. आज चीन सीमेवर काय सुरू आहे? तरीही शी जिनपिंगला अहमदाबादला बोलावून पाहुणचार केला जातो. कुलभूषण जाधव पाकिस्तानात आहेत, त्यांना परत का आणले जात नाही? या देशाला द्वेषाच्या राजकारणात ओढू नका, अल्पसंख्याकांचा बजेट ४० टक्क्यांनी कमी केले. फेलोशिप कमी केली. उच्च शिक्षणापासून मुस्लीम समाजातील तरूणाला वंचित ठेवले. मोदी सरकारमध्ये एकही मुस्लीम नाही हा कुठला न्याय? हरयाणा आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर ओवेसींनी टीका केली. कवितेतून टोमणा मारत ओवेसी म्हणाले की, तु्म्हाला आमच्या लोकांना न्याय देता येत नसेल, तुम्ही काही करू शकत नसाल, तर खाली का उतरत नाही? पंतप्रधान जेव्हा सभागृहात उत्तर देण्यासाठी येतील तेव्हा त्यांनी सांगावे की देश मोठा की हिंदुत्व? असा सवाल त्यांनी केला.

ट्रेनमध्ये लोकांची ओळख करून त्यांना मारले जाते. देशात राहायचे असेल तर मोदींना मत द्यावे लागेल असं धमकावतात. हे आपल्या देशात काय चाललंय? लोक कपडे, दाढी पाहून मारले जातात. नूंहमध्ये मुस्लिमांची घरे पाडली. मुस्लिमांसाठी द्वेष पसरवला जात आहे. हिजाबचा मुद्दा पुढे करून शिक्षणापासून तोडले जाते. चीन आपल्या देशात घुसून बसलाय त्यावर तुम्ही काही बोलत नाही, असा आरोप त्यांनी केला.

"तुम्ही म्हणत आहात की मणिपूरचे मुख्यमंत्री सहकार्य करत आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांना हटवायचे नाही. आसाम रायफल्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. महिलांवर अत्याचार होत आहेत. ट्रेन मध्ये नाव विचारून मारले जात आहे. देशात राहायचे असेल तर मोदींना मतदान करावे लागेल, असे सांगितले जात आहे. हे सर्व आपल्या देशात का होत आहे. हे सारं योग्य नाही", असा मुद्दाही त्यांनी संसदेत बोलताना मांडला.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी