शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

RSS च्या शाखेत बॉल जाताच वाद पेटला, लाठ्या-काठ्यांनी हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 23:16 IST

जुही बारादेवी निवासी अनुराग पाल हे इंटरमिडीएटचे विद्यार्थी आहेत.

कानपूर - कानपूरच्या नौबस्ता येथील बालाजी पार्कमध्ये शनिवारी क्रिकेट खेळत असलेल्या विद्यार्थ्यांचा बॉल आर.आर.एसच्या ग्रुपमध्ये गेला. त्यामुळे, नाराज झालेल्या आर.एस.एसच्या स्वयंसेवकांनी या विद्यार्थ्यांना पळून-पळून लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर, काही वेळातच विद्यार्थ्यांच्या बाजुनेही मारहाण करण्यासाठी काही लोकं आली. त्यामुळे, दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीच्या गोंधळात तीनजण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जुही बारादेवी निवासी अनुराग पाल हे इंटरमिडीएटचे विद्यार्थी आहेत. अनुरागने मीडियाशी बोलताना सांगितले की, ते किदवई नगर ब्लॉकमध्ये कोचिंग शिकण्यासाठी जात होते. एक क्लास झाल्यानंतर दुसऱ्या क्लासच्या सुरु होण्यापूर्वी अर्ध्या तासाचा अवधी मिळतो. या अर्ध्या तासाच्या वेळेत आपल्या मित्रांसमवेत ते जवळच असलेल्या बालाजी पार्कमध्ये आपल्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळायला गेले होते. याचवेळी, पार्कमध्ये आरएसएसची शाखाही सुरू होती. दरम्यान, मॅच खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा चेंडू आरएसएसच्या शाखेत गेला. त्यामुळे, नाराज झालेल्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातूनच, तेथील 20 ते 25 जणांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यामध्ये, अनुराग पाल, आर्यन राजावत, आर्यन गुप्ता यांच्या डोक्याला जबर मार लागला.

याप्रकरणी, विद्यार्थ्यांनी 112 ला फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देण्यापूर्वीत मारहाण करणारे पळून गेले होते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. त्यानंतर, काही वेळातच आरएसएसचेही स्वयंसेवक तेथे आले, त्यांनीही विद्यार्थ्यांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक रत्नेश सिंह यांनी यासंदर्भात माहिती देताना गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचे सांगितले.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcricket off the fieldऑफ द फिल्डKanpur Policeकानपूर पोलीसPoliceपोलिस