शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

बिष्णोई टोळीत तब्बल ७०० गुंड, दाऊद टोळीची जागा घेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 07:12 IST

अंडरवर्ल्डवर हुकूमत गाजवण्याच्या हालचाली संपूर्ण बॉलिवूडला दहशतीखाली ठेवणाऱ्या दाऊद टोळीची जागा घेण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या बलकरण बरार उर्फ लॉरेन्स बिष्णोई याच्या टोळीने केली, असे पोलिस तपासात आढळून आले आहे. काळवीट हत्या प्रकरणातील आरोपी सलमान खान याचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करणारी बिष्णोई टोळी आता संपूर्ण बॉलिवूडलाच आपल्या दहशतीखाली ठेवण्याच्या प्रयत्नांत आहे. दाऊद इब्राहिमच्या टोळीची जागा घेऊ पाहणाऱ्या बिष्णोई टोळीत सुमारे ७०० गुंडांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

१९९८ साली काळवीट हत्या प्रकरण घडले त्यावेळी लॉरेन्स बिष्णोई व त्याचे साथीदार कोणालाही माहीत नव्हते. त्यानंतर २६ वर्षांनी बिष्णोईच्या टोळीने देशभर हातपाय पसरायला सुरुवात केली. सलमान खानचे मित्र व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या करून त्या टोळीने आपले इरादे स्पष्ट केले. जो सलमान खान व दाऊद गँगला मदत करेल त्याचा बंदोबस्त करण्याची धमकी बिष्णोई टोळीने फेसबुकवरील एका पोस्टमध्ये दिली.

तुरुंगात असूनही लॉरेन्स बिष्णोई इतरांच्या हत्येचे कट आखतो व त्याप्रमाणे त्याचे साथीदार कारवाया करतात, असा आरोप आहे. २०२२ साली पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची, तर सुखदेवसिंग गोगामेडी याची २०२३ मध्ये बिष्णोई टोळीने हत्या केली. गायक ए. पी. धिल्लन, गिप्पी ग्रेवाल यासारख्या नामवंतांच्या घराबाहेर या टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता. (वृत्तसंस्था)

सलमान खानशी जुने वैरपोलिसांनी सांगितले की, अभिनेता सलमान खान व बिष्णोई गँगमध्ये वैर असल्याची गोष्ट २०१८ साली प्रथम उघडकीस आली. बिष्णोई याने जोधपूर न्यायालयात तसे सांगितले होते. आम्ही सलमान खानची हत्या करणार आहोत. तसे पाऊल उचलले की सर्वांना ते कळेलच. मात्र मी आतापर्यंत त्या दिशेने काहीही पावले उचलली नाहीत. तरीही काही गुन्ह्यांत मला विनाकारण गोवण्यात आले आहे, असे लॉरेन्स बिष्णोईने म्हटले होते. यंदा एप्रिल महिन्यात सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर दोन जणांनी गोळीबार केला होता.

‘लॉरेन्सने स्वत: एकही हत्या केली नाही’लॉरेन्स बिष्णोईने आतापर्यंत स्वत: एकाही व्यक्तीची हत्या केलेली नाही. तरीही तो गुजरात तुरुंगात आपल्या टोळीची सूत्रे हलवत असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या टोळीत शार्पशूटरसह ७०० गुंड आहेत. अनेक युवक बिष्णोई टोळीमध्ये शार्पशूटरचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.