शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

तीन वर्षांत येणार तब्बल ४०० ‘वंदे भारत’, ५० हजार कोटींचा खर्च; मेक इन इंडियाही सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 06:51 IST

वंदे भारतच्या गतिशीलतेमुळे प्रवासवेळेत २५% बचत

ऋषिराज तायडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासी सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार पुढील तीन वर्षांत ४०० ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू करणार आहे. पूर्णतः भारतीय बनावटीच्या ‘वंदे भारत 2.0’ श्रेणीतील सेमी हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार आहे.

५० हजार कोटींचा खर्च

एक ‘वंदे भारत’ रेल्वे तयार करण्यासाठी किमान ११५ कोटींचा खर्च येतो. त्यानुसार पुढील ३ वर्षांत ४०० ‘वंदे भारत’ सेवेत आणण्यासाठी जवळपास ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे. तसेच या माध्यमातून रोजगारनिर्मिती वाढण्यास मदत होणार आहे.

वैशिष्ट्येः

  1. ‘वंदे भारत २.०’मध्ये कमाल वेगमर्यादा १८० कि.मी. प्रतितास तसेच रेल्वेचे वजन ४३० टनांवरून ३९२ टनांपर्यंत कमी केले.
  2. नव्या ‘वंदे भारत’मध्ये कवच (अपघातविरोधी प्रणाली) सुविधेसह ६५० मि.मी.पर्यंतच्या पुराचा सामना करण्यास सक्षम अशी डब्याखालील इलेक्ट्रिक उपकरणे 
  3. पूर्वीच्या १४५ सेकंदांच्या तुलनेत नव्या श्रेणीत अवघ्या १४० सेकंदांत १६० प्रतितास वेग गाठण्याची क्षमता.

‘वंदे भारत 2.0’ सेवेत

नवी दिल्ली ते वाराणसी या देशातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेला १५ नोव्हेंबर २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर ‘वंदे भारत 2.0’ ही अद्ययावत सेवा ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई ते गांधीनगरदरम्यान सुरू झाली.

  • २५% - प्रवासवेळेत बचत
  • ४०% - इतर रेल्वेंच्या तुलनेत अधिक वेगवान
  • ३०% - रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीमुळे वीजवापरात बचत

‘वंदे भारत 2.0’मध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यांना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.- प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस