शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत येणार तब्बल ४०० ‘वंदे भारत’, ५० हजार कोटींचा खर्च; मेक इन इंडियाही सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 06:51 IST

वंदे भारतच्या गतिशीलतेमुळे प्रवासवेळेत २५% बचत

ऋषिराज तायडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासी सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार पुढील तीन वर्षांत ४०० ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू करणार आहे. पूर्णतः भारतीय बनावटीच्या ‘वंदे भारत 2.0’ श्रेणीतील सेमी हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार आहे.

५० हजार कोटींचा खर्च

एक ‘वंदे भारत’ रेल्वे तयार करण्यासाठी किमान ११५ कोटींचा खर्च येतो. त्यानुसार पुढील ३ वर्षांत ४०० ‘वंदे भारत’ सेवेत आणण्यासाठी जवळपास ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे. तसेच या माध्यमातून रोजगारनिर्मिती वाढण्यास मदत होणार आहे.

वैशिष्ट्येः

  1. ‘वंदे भारत २.०’मध्ये कमाल वेगमर्यादा १८० कि.मी. प्रतितास तसेच रेल्वेचे वजन ४३० टनांवरून ३९२ टनांपर्यंत कमी केले.
  2. नव्या ‘वंदे भारत’मध्ये कवच (अपघातविरोधी प्रणाली) सुविधेसह ६५० मि.मी.पर्यंतच्या पुराचा सामना करण्यास सक्षम अशी डब्याखालील इलेक्ट्रिक उपकरणे 
  3. पूर्वीच्या १४५ सेकंदांच्या तुलनेत नव्या श्रेणीत अवघ्या १४० सेकंदांत १६० प्रतितास वेग गाठण्याची क्षमता.

‘वंदे भारत 2.0’ सेवेत

नवी दिल्ली ते वाराणसी या देशातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेला १५ नोव्हेंबर २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर ‘वंदे भारत 2.0’ ही अद्ययावत सेवा ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई ते गांधीनगरदरम्यान सुरू झाली.

  • २५% - प्रवासवेळेत बचत
  • ४०% - इतर रेल्वेंच्या तुलनेत अधिक वेगवान
  • ३०% - रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीमुळे वीजवापरात बचत

‘वंदे भारत 2.0’मध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यांना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.- प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस