शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भुकेसाठी 723 प्राण्यांची कत्तल होणार इतक्यात..., नामिबियातील प्राण्यांच्या रक्षणासाठी धावून आले अनंत अंबानी यांचे ‘वनतारा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:35 IST

Anant Ambani: आफ्रिका खंडातील नामिबिया या देशात तीव्र दुष्काळ असून, त्यामुळे तेथील वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. तेथील ७२३ प्राण्यांची कत्तल करण्यात येणार असून त्यांना वाचविण्यासाठी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या वनतारा फाउंडेशनने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.

नवी दिल्ली - आफ्रिका खंडातील नामिबिया या देशात तीव्र दुष्काळ असून, त्यामुळे तेथील वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. तेथील ७२३ प्राण्यांची कत्तल करण्यात येणार असून त्यांना वाचविण्यासाठी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या वनतारा फाउंडेशनने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.

नामिबियामध्ये दुष्काळामुळे वन्यप्राणी सांभाळणे, त्यांचे रक्षण करणे हे अवघड काम बनले आहे. त्यामुळे भूक मिटवण्यासाठी तेथील सरकारने ७२३ प्राण्यांची कत्तल करावी लागणार आहे. त्यामध्ये ३० गेंडे, ६० म्हशी, आफ्रिकेत इंपाला नावाने ओळखली जाणारी ५० काळवीटे, १०० ब्लू वाईल्टबीस्ट, ३०० झेब्रा, ८३ हत्ती, १०० इलँड यांचाही समावेश आहे. सर्व आव्हानांवर मात करून प्रत्येक प्राण्याचे संरक्षण करणे हा वनतारा फाउंडेशनचा मुख्य हेतू आहे.

नेमके काय करतात?संकटग्रस्त वन्यजीवांची काळजी व त्यांचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम गुजरातमधील वनतारा फाउंडेशन ही संस्था करते. गुजरातमधील जामनगर येथे ३५०० एकर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या या प्रकल्पांत दोन हजार तज्ज्ञांची मदत घेतली जाते. सुमारे दोन हजार प्रजातीच्या प्राण्यांचे संरक्षण व त्यांची काळजी घेण्यासाठी जामनगरमधील जागेत अतिशय आधुनिक सुविधा असलेले एक रुग्णालय व संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. याचा अनेक प्राण्यांना फायदा होत आहे.

काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध- वनतारा फाउंडेशनने म्हटले आहे की, प्राण्यांची कत्तल टाळण्यासाठी त्या प्राण्यांची त्यांच्या आयुष्यभर काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- संकटग्रस्त प्राण्यांची काळजी घेण्यासाठी नामिबिया सरकारबरोबर काम करण्याची वनतारा फाउंडेशनची इच्छा आहे. त्यामुळे आमच्या प्रस्तावाचा विचार करावा, असेही या फाउंडेशनने म्हटले आहे.

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानी