शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भुकेसाठी 723 प्राण्यांची कत्तल होणार इतक्यात..., नामिबियातील प्राण्यांच्या रक्षणासाठी धावून आले अनंत अंबानी यांचे ‘वनतारा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:35 IST

Anant Ambani: आफ्रिका खंडातील नामिबिया या देशात तीव्र दुष्काळ असून, त्यामुळे तेथील वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. तेथील ७२३ प्राण्यांची कत्तल करण्यात येणार असून त्यांना वाचविण्यासाठी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या वनतारा फाउंडेशनने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.

नवी दिल्ली - आफ्रिका खंडातील नामिबिया या देशात तीव्र दुष्काळ असून, त्यामुळे तेथील वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. तेथील ७२३ प्राण्यांची कत्तल करण्यात येणार असून त्यांना वाचविण्यासाठी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या वनतारा फाउंडेशनने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.

नामिबियामध्ये दुष्काळामुळे वन्यप्राणी सांभाळणे, त्यांचे रक्षण करणे हे अवघड काम बनले आहे. त्यामुळे भूक मिटवण्यासाठी तेथील सरकारने ७२३ प्राण्यांची कत्तल करावी लागणार आहे. त्यामध्ये ३० गेंडे, ६० म्हशी, आफ्रिकेत इंपाला नावाने ओळखली जाणारी ५० काळवीटे, १०० ब्लू वाईल्टबीस्ट, ३०० झेब्रा, ८३ हत्ती, १०० इलँड यांचाही समावेश आहे. सर्व आव्हानांवर मात करून प्रत्येक प्राण्याचे संरक्षण करणे हा वनतारा फाउंडेशनचा मुख्य हेतू आहे.

नेमके काय करतात?संकटग्रस्त वन्यजीवांची काळजी व त्यांचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम गुजरातमधील वनतारा फाउंडेशन ही संस्था करते. गुजरातमधील जामनगर येथे ३५०० एकर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या या प्रकल्पांत दोन हजार तज्ज्ञांची मदत घेतली जाते. सुमारे दोन हजार प्रजातीच्या प्राण्यांचे संरक्षण व त्यांची काळजी घेण्यासाठी जामनगरमधील जागेत अतिशय आधुनिक सुविधा असलेले एक रुग्णालय व संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. याचा अनेक प्राण्यांना फायदा होत आहे.

काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध- वनतारा फाउंडेशनने म्हटले आहे की, प्राण्यांची कत्तल टाळण्यासाठी त्या प्राण्यांची त्यांच्या आयुष्यभर काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- संकटग्रस्त प्राण्यांची काळजी घेण्यासाठी नामिबिया सरकारबरोबर काम करण्याची वनतारा फाउंडेशनची इच्छा आहे. त्यामुळे आमच्या प्रस्तावाचा विचार करावा, असेही या फाउंडेशनने म्हटले आहे.

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानी