शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

"अंजूचं काय करायचं ते अरविंद बघेल"; पाकिस्तानातून परतलेल्या लेकीचं नाव ऐकून संतापले वडील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 14:47 IST

अंजू भारतात परतल्यावर तिचे वडील प्रचंड संतापले.

प्रियकरासाठी भारत सोडून पाकिस्तानात गेलेली अंजू आता परत आली आहे. अंजू भारतात परतल्यावर तिचे वडील प्रचंड संतापले. "पाकिस्तानातून ती तोंडाला काळं फासून आली आहे. आता तिचं काय करायचं हे अरविंद आणि पोलीस पाहतील. माझा तिच्याशी काहीही संबंध नाही" असं अंजूचे वडील गयाप्रसाद थॉमस यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानातून चार महिन्यांनंतर भारतात परतलेली अंजू सध्या दिल्ली विमानतळावर आहे. वडील गयाप्रसाद यांनी तिला माझ्या घरात प्रवेश नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

'आज तक'शी बोलताना वडिलांनी सांगितलं की, "माझ्यासाठी ती ज्या दिवशी पाकिस्तानला गेली त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. आता ती तिथून तोंड काळं करून परतली आहे. अशा परिस्थितीत मी तिला माझ्या घरी येऊ देणार नाही. बाकी अरविंदला माहीत असेल कारण तो तिचा नवरा आहे. त्याला जे काही करायचे असेल ते त्याने करावं. पोलिसांनीही वाट्टेल ते करावे. माझा अंजूशी काहीही संबंध नाही. ती कुठे आहे किंवा ती कुठे जात आहे याने मला काही फरक पडत नाही."

"माझा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला आहे. मी आता घरी एकटा आहे. माझीही काही दिवसांपासून तब्येत खराब आहे. मी एवढेच म्हणेन की हे प्रकरण अंजू आणि अरविंद यांच्यातील आहे. गयाप्रसाद यांना अंजूने तुमची माफी मागितली आणि घरात राहण्याची परवानगी मागितली तर काय कराल? हा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, अंजूने केलेली चूक माफीच्या लायक नाही. ती माझ्या घरी अजिबात येणार नाही एवढेच मला माहीत आहे. कारण मी त्याला आधीच सांगितले होते की माझा तिच्याशी काही संबंध नाही."

“आता अंजू तिच्या मुलांसाठी आली आहे का? या आधी तिला आपल्या मुलांची आठवण झाली नाही का? तिने आपल्या मुलांचा इतका विचार केला असता तर ती कधीच पाकिस्तानात गेली नसती. पण आता जे व्हायचं होतं ते झालं आहे. ती आमच्यासाठी मेली आहे. मुलंही तिच्याशी बोलू इच्छित नाहीत" असं अंजूच्या वडिलांनी सांगितलं आहे. 

अंजू भारतात परतल्यानंतर तिने अरविंदशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिचं नाव ऐकताच तो संतापला. याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्याने स्पष्टपणे सांगितलं. अरविंद राजस्थानमधील अलवरच्या भिवडीमध्ये राहतो. अंजू पती अरविंद आणि दोन मुलांसह राजस्थानच्या भिवडी येथे राहत होती. ती टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला भेटायला गेली होती, पण नंतर ती खैबर पख्तुनख्वामध्ये राहणाऱ्या नसरुल्लाला भेटली.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान