शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Arvind Kerjiwal : "केंद्र सरकार 8 वर्षांपासून खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचतंय"; केजरीवालांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 13:39 IST

Arvind Kerjiwal : अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकार गेल्या 8 वर्षांपासून त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचत आहे. त्यासाठी अनेकांवर दबाव टाकण्यात आला. माझ्याविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. जे मान्य करत नव्हते त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्याच्यावर विविध प्रकारचे अत्याचार करण्यात आले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत ट्विट केले आहे.

सीएम अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं की, ही 2015 ची घटना आहे. मोदी सरकार 2015 पासून मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकून त्यांना माझ्याविरोधात वक्तव्ये करण्यास सांगितले जाते. अनेकांवर अत्याचारही झाले. देशासाठी काम करण्याऐवजी पंतप्रधान 24 तास विरोधकांना खोट्या खटल्यात अडकवण्यासाठी कट रचत असतात.

आम आदमी पार्टीचे अनेक नेते तुरुंगात आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही तुरुंगात आहेत. याशिवाय नुकतेच आपचे खासदार संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली होती. आपल्या नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. 

2013 मध्ये दिल्लीत पहिल्यांदा आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं होतं. दोन वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्या, तेव्हा आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. 2020 मध्ये तिसऱ्यांदा 'आप'ला मोठा विजय मिळाला. पंजाबमध्येही आपचं सरकार स्थापन झालं आहे. 2013 मध्ये स्थापन झाल्यानंतर 10 वर्षातच आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष बनला आहे. त्यांच्या पक्षाच्या झपाट्याने वाढ होत असल्याने भाजपा घाबरला असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआप