शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Arvind Kerjiwal : "केंद्र सरकार 8 वर्षांपासून खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचतंय"; केजरीवालांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 13:39 IST

Arvind Kerjiwal : अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकार गेल्या 8 वर्षांपासून त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचत आहे. त्यासाठी अनेकांवर दबाव टाकण्यात आला. माझ्याविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. जे मान्य करत नव्हते त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्याच्यावर विविध प्रकारचे अत्याचार करण्यात आले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत ट्विट केले आहे.

सीएम अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं की, ही 2015 ची घटना आहे. मोदी सरकार 2015 पासून मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकून त्यांना माझ्याविरोधात वक्तव्ये करण्यास सांगितले जाते. अनेकांवर अत्याचारही झाले. देशासाठी काम करण्याऐवजी पंतप्रधान 24 तास विरोधकांना खोट्या खटल्यात अडकवण्यासाठी कट रचत असतात.

आम आदमी पार्टीचे अनेक नेते तुरुंगात आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही तुरुंगात आहेत. याशिवाय नुकतेच आपचे खासदार संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली होती. आपल्या नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. 

2013 मध्ये दिल्लीत पहिल्यांदा आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं होतं. दोन वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्या, तेव्हा आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. 2020 मध्ये तिसऱ्यांदा 'आप'ला मोठा विजय मिळाला. पंजाबमध्येही आपचं सरकार स्थापन झालं आहे. 2013 मध्ये स्थापन झाल्यानंतर 10 वर्षातच आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष बनला आहे. त्यांच्या पक्षाच्या झपाट्याने वाढ होत असल्याने भाजपा घाबरला असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआप