शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Arvind Kejriwal: "...पण भारताशी गद्दारी करणार नाही", AAPच्या मंत्र्यावरील कारवाईनंतर केजरीवालांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 16:56 IST

Arvind Kejriwal: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपल्याच कॅबिनेट मंत्र्याची हकालपट्टी केली असून, पोलिसांनी मंत्र्याला अटकही केली आहे.

नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant maan) यांनी त्यांच्याच मंत्र्यावर केलेल्या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भगवंत मान यांच्या या निर्णयाचे कौतुक करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, "भगवंत मान यांचा आम्हाला अभिमान आहे. आम आदमी पक्ष आपले मुंडके छाटून घेईल, पण देशाशी गद्दारी कधीच करणार नाही."

'मान यांचा देशाला अभिमान'मीडियाशी संवाद साधताना सीएम केजरीवाल म्हणाले की, "पंजाबमधील या भ्रष्टाचाराची कोणालाही माहिती नव्हती. याची माहिती ना विरोधकांना होती ना मीडियाला. भगवंत मान यांना हवं असतं तर त्यांनी मंत्र्यांकडून स्वत:साठी वाटा मागितला असता. आत्तापर्यंत असे व्हायचे. मान यांना हवं असतं तर ते प्रकरण दाबू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनीच आपल्या मंत्र्यावर कारवाई केली. भगवंत, संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे."

ते पुढे म्हणाले की, ''2015 मध्ये दिल्लीत आपचे सरकार स्थापन झाले, तेव्हा मी माझ्या अन्नमंत्र्यांवर अशीच कारवाई केली होती. त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आले होते. तेव्हाही कोणालाच माहिती नव्हती, पण मी स्वतः त्यांच्यावर कारवाई केली. आम आदमी पार्टी हा कट्टर प्रामाणिक पक्ष आहे. भ्रष्टाचार करणाऱ्याला सोडलं जाणार नाही. आपल्याच लोकांच्या भ्रष्टाचारावर कारवाई करत असल्याचे  प्रथमच घडत आहे."

भगवंत मान यांची मंत्र्यांवर कारवाईपंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या विजय सिंगला यांची मंगळवारी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पंजाब सरकारमध्ये आरोग्यासारख्या महत्त्वाच्या खात्याचे ते मंत्री होते. पंजाब सरकारच्या या कारवाईनंतर काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंगला यांच्यावरही कारवाई केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेवरून एसीबीने विजय सिंगला याला अटक केली आहे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाब