शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal vs Pm Narendra Modi: "मोदीजी, जा... जाऊन त्यांना विचारा, केजरीवाल फुकटच्या रेवड्या वाटतो की..."; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 22:14 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असं का म्हणाले... वाचा सविस्तर

Arvind Kejriwal vs Pm Narendra Modi: मोफत रेवड्या वाटून मते गोळा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोदींच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला. मुलांना मोफत शिक्षण आणि लोकांना मोफत उपचार देणे याला  रेवड्या वाटणं म्हणत नाहीत, असा सणसणीत टोला अरविंद केजरीवाल यांनी मोदींना लगावला.

"१८ लाख मुले सरकारी शाळांमध्ये शिकतात. देशभरातील सरकारी शाळांची जी वाईट अवस्था होती, त्यासारखीच अवस्था दिल्लीतील शाळांची होती. १८ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात होते. अशा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हा माझा गुन्हा आहे का? आपल्या देशातील विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणं तसेच गरजू लोकांवर मोफत उपचार करणं याला फुकट रेवड्या वाटणं म्हणत नाहीत. आम्ही एका विकसित आणि गौरवशाली भारताचा पाया निर्माण करण्यासाठी धडपडत आहोत. खरं तर हे काम ७५ वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं", अशा शब्दांत केजरीवाल यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं.

"नेतेमंडळींना लोकांना ४ ते ५ हजार युनिट वीज मिळाली तर चालते. पण गरीब जनतेला २०० ते ३०० यूनिट वीज मिळत असेल तर त्याची तुम्हाला अडचण का वाटते? दिल्ली हे असे एकमेव शहर आहे जेथे २ करोड गरजू लोकांचे मोफत उपचार होतात. आम्ही या योजनांच्या मार्फत सुमारे १३ हजार लोकांचे जीव वाचवले आहेत. त्या लोकांच्या कुटुंबीयांना जाऊन विचारा की केजरीवाल फुकटच्या रेवड्या वाटतोय की पुण्यकर्म करतोय", असेही केजरीवाल यांनी ठणकावून सांगितले.

“एका कंपनीने अनेक बँकांकडून कर्ज घेऊन पैसे खाल्ले. बँक दिवाळखोरीत निघाली आणि त्या कंपनीने काही कोटी रुपये एका राजकीय पक्षाला दिले आणि सरकारने त्या कंपनीवर कोणतीही कारवाई केली नाही. तेव्हा तुम्ही परदेशात तुमच्या मित्रांसाठी गेला होतात", असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीEducationशिक्षण