शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कारागृहात फाइल्स जाणे योग्य नाही, नैतिकता सांगते...; अरविंद केजरीवालांना SCच्या माजी न्यायमूर्तींचा मोठा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 18:21 IST

न्यायमूर्ती रस्तोगी म्हणाले, "लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 आणि 9 मध्ये अपात्रतेची तरतूद आहे. यात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे, दिल्लीमध्ये कैद्यांसाठी बनवण्यात आलेल्या कायद्यातही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

जर घटनाात्मक पदावर असलेली एखादी व्यक्ती कारागृहात असेल तर तिने पदावर राहणे योग्य नाही, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिला आहे. रस्तोगी म्हणाले, कुणी कारागृहात असूनही आपल्या पदावर कायम राहणे, चांगली गोष्ट नाही. महत्वाचे म्हणजे, भाजपसह एका वर्गाकडून अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच, रस्तोगी यांची टिप्पणी आली आहे. केजरीवाल यांना इडीने अटक केली असून दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ते सध्या तिहार कारागृहात आहेत.

न्यायमूर्ती रस्तोगी म्हणाले, "लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 आणि 9 मध्ये अपात्रतेची तरतूद आहे. यात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे, दिल्लीमध्ये कैद्यांसाठी बनवण्यात आलेल्या कायद्यातही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याअंतर्गत कुठल्याही कैद्यापर्यंत थोट पोहोचू शकत नाहीत. ते आधी कारागृह अधीक्षक बघतील आणि नंतर ते कैद्यापर्यंत पाठवले जातील. संवैधानिक पदाच्या शपथेत गोपनीयतेच्या शपथेचाही समावेश आहे. अशात दिल्लीमध्ये कैद्यांसाठी बनवण्यात आलेला हा नियम अरविंद केजरीवाल यांना कारागृहातूनच सरकार चालवणे आणि फाइल्सवर स्वाक्षरी करण्याची परवानगी देत नाही."

"जर असे नियम असतील तर, ही योग्य वेळ आहे, अरविंद केजरीवालांनी पदावर कायम राहायचे की नाही, हे ठरवायला हवे. शेवटी यामुळे कुणाला फायदा होणार? आपण मुख्यमंत्री पदावर आहात. ही सार्वजनिक आणि घटनात्मक जबाबदारी आहे. नैतिकतेनुसार त्यांनी राजीनामा द्यायला हवा. आपण यापूर्वीची उदाहरणेही बघू शकता. जयललिता आणि लालू प्रसाद यादव यांसारख्या नेत्यांनीही राजीनामा दिला होता. याशिवाय हेमंत सोरेन यांनीही राजीनामा दिला होता. आपण कारागृहात अथवा कोठडीत असताना मुख्यमंत्री म्हणून कुठल्याही पाइल्स मागवून स्वाक्षरी करू शकत नाही. माझे स्पष्ट मत आहे की, नैतिकतेनुसार राजीनामा द्यायला हवा," असेही न्यायमूर्ती रस्तोगी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती म्हणाले, "सरकारी कर्मचाऱ्यांना कायदेशीर संस्थांकडून अटक झाल्यास, जे नियम आहेत, तेही हेच सांगतात. सरकारी सेवा बघा, सरकारी कर्मचारी 48 तास पोलीस कोठडीत राहिल्यास त्याला निलंबित केले जाते. संबंधित खटल्याची योग्यता कुणी बघत नाही. आता आपण कोठडीत आहात आणि केव्हापर्यंत असाल? हे देवालाच माहीत. कोठडीत असताना पद सोडण्याची तरतूद घटनेत लिहिलेली नसली म्हणजे, पदावर कायम राहण्याचा अधिकार तर नाही ना मिळत."   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीjailतुरुंग