शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

Video - '...तर मी त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन'; अरविंद केजरीवालांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 20:24 IST

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला आहे.

नवी दिल्ली - आज आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पंजाब निवडणुकीसाठी आपने उमेदवारीची तिकिटं विकल्याचा आरोप इतर पक्षांकडून केला जात आहे. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भ्रष्टाचाराविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. "एकही तिकीट विकलं गेलेलं नाही. जर तुम्ही कोणीही पुराव्यांनिशी सिद्ध करून दाखवू शकलात की अमुक एका व्यक्तीने तिकीट विकलं आणि अमुक एका व्यक्तीने ते खरेदी केलं, तर 24 तासांच्या आत त्याला पक्षातून काढून टाकेन" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

"मी काहीही सहन करू शकतो, पण भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. जर हे सिद्ध झालं की तिकिटाची खरेदी-विक्री झाली आहे, तर मी त्या दोघांना फक्त पक्षातून निलंबित करून थांबणार नाही, त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन. मी त्यांना सोडणार नाही. जेलमध्ये पाठवेन. सध्या ही फॅशन झाली आहे. सत्याचा मार्ग काट्यांचा असतो. सगळे पक्ष, लोकं आमच्यावर चिखलफेक करत आहेत की तिकिटं विकली. जर कोणी आपवर चुकीचे आरोप केले, तर त्याला देखील आम्ही सोडणार नाही. त्याच्यावरही गुन्हे दाखल करू, त्यांनाही तुरुंगात टाकू. जर तुम्ही सिद्ध केलं की तिकिट खरेदी-विक्री झाली आहे, तर मी त्यांना जेलमध्ये टाकेन. पण इतर कोणी खोटेनाटे आरोप केले, तर त्यांनाही जेलमध्ये टाकेन. त्यांना सोडणार नाही" असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

दिल्ली महापालिकांची निवडणूक काही महिन्यांवर आली असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा फॉर्म्युला अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत होम क्वारंटाइन असलेल्या 40 हजार कोरोनाबाधितांना योग व प्राणायामाचे मोफत ऑनलाइन वर्ग आयोजित केले जाणार आहेत. यासंदर्भात केजरीवाल यांनी घोषणा केली असून, योग व प्राणायमामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा केला आहे. 

केजरीवालांचा पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाचा फॉर्म्युला

दिल्लीतील नागरिकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे. लोकांना योग व प्राणायमाचा निश्चितपणे फायदा होईल, असा दावा त्यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम राबविला होता. याचा राजकीय फायदा आम आदमी पार्टीला मिळाल्याचे बोलले जाते. त्यावेळी सॉफ्ट हिंदुत्वाचा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या  राजकीय विरोधकांनी केला होता. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPoliticsराजकारणPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२