शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Video - '...तर मी त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन'; अरविंद केजरीवालांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 20:24 IST

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला आहे.

नवी दिल्ली - आज आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पंजाब निवडणुकीसाठी आपने उमेदवारीची तिकिटं विकल्याचा आरोप इतर पक्षांकडून केला जात आहे. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भ्रष्टाचाराविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. "एकही तिकीट विकलं गेलेलं नाही. जर तुम्ही कोणीही पुराव्यांनिशी सिद्ध करून दाखवू शकलात की अमुक एका व्यक्तीने तिकीट विकलं आणि अमुक एका व्यक्तीने ते खरेदी केलं, तर 24 तासांच्या आत त्याला पक्षातून काढून टाकेन" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

"मी काहीही सहन करू शकतो, पण भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. जर हे सिद्ध झालं की तिकिटाची खरेदी-विक्री झाली आहे, तर मी त्या दोघांना फक्त पक्षातून निलंबित करून थांबणार नाही, त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन. मी त्यांना सोडणार नाही. जेलमध्ये पाठवेन. सध्या ही फॅशन झाली आहे. सत्याचा मार्ग काट्यांचा असतो. सगळे पक्ष, लोकं आमच्यावर चिखलफेक करत आहेत की तिकिटं विकली. जर कोणी आपवर चुकीचे आरोप केले, तर त्याला देखील आम्ही सोडणार नाही. त्याच्यावरही गुन्हे दाखल करू, त्यांनाही तुरुंगात टाकू. जर तुम्ही सिद्ध केलं की तिकिट खरेदी-विक्री झाली आहे, तर मी त्यांना जेलमध्ये टाकेन. पण इतर कोणी खोटेनाटे आरोप केले, तर त्यांनाही जेलमध्ये टाकेन. त्यांना सोडणार नाही" असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

दिल्ली महापालिकांची निवडणूक काही महिन्यांवर आली असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा फॉर्म्युला अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत होम क्वारंटाइन असलेल्या 40 हजार कोरोनाबाधितांना योग व प्राणायामाचे मोफत ऑनलाइन वर्ग आयोजित केले जाणार आहेत. यासंदर्भात केजरीवाल यांनी घोषणा केली असून, योग व प्राणायमामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा केला आहे. 

केजरीवालांचा पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाचा फॉर्म्युला

दिल्लीतील नागरिकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे. लोकांना योग व प्राणायमाचा निश्चितपणे फायदा होईल, असा दावा त्यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम राबविला होता. याचा राजकीय फायदा आम आदमी पार्टीला मिळाल्याचे बोलले जाते. त्यावेळी सॉफ्ट हिंदुत्वाचा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या  राजकीय विरोधकांनी केला होता. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPoliticsराजकारणPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२